शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

महापुरामुळे झालेल्या नुकसानीचे आतापर्यंत सोळा हजारांहून अधिक पंचनामे - जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2021 22:29 IST

Sangli : जिल्ह्यात महापुरामुळे तसेच अतिवृष्टीमुळे , ओढ्यांना जादा पाणी आल्याने मिरज, वाळवा, पलूस व शिराळा या चार तालुक्यातील 113 गावे बाधित झाले आहेत.

सांगली : जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे सांगली जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असून  जिल्हयात महापूरामुळे बाधित झालेल्या 113 गावांमधील  आतापर्यंत 16 हजार 879 कुटुंबांचे पंचनामे झाले आहेत. बाधित गावातील कुंटुंबे, कृषी, पशुधन व व्यावसायिक नुकसानीचे पंचनामे  युद्धपातळीवर  पूर्ण  करण्यासाठी यंत्रणा गतीने कार्यरत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.

जिल्ह्यात महापुरामुळे तसेच अतिवृष्टीमुळे , ओढ्यांना जादा पाणी आल्याने मिरज, वाळवा, पलूस व शिराळा या चार तालुक्यातील 113 गावे बाधित झाले आहेत. महापालिका क्षेत्र तसेच ग्रामीण क्षेत्रातील एकूण 45 हजार 352 कुटुंबे बाधित झाली आहेत. शासन निर्देशानुसार बाधित गावातील कुटुंबे, कृषी, पशुधन व व्यावसायिक नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करण्यात येत आहेत.

यामध्ये आज अखेरआज अखेर 16 हजार 879 कुटुंबांचे पंचनामे करण्यात आले आहेत. त्यामध्ये पूर्ण नष्ट झालेली कच्ची घरे 279, पक्की घरे 8, अशंत नष्ट झालेली कच्ची घरे 1 हजार 78, पक्की घरे 320, नुकसान झालेल्या झोपड्या 34 व गोठे 619 आहेत. अजूनही पंचनामे सुरू असून ते गतीने पूर्ण करण्यासाठी यंत्रणांना निर्देश देण्यात आले आहेत.

आज अखेर मयत पशुधनापैकी 96 लहान, माठे जनावरे व 49508 पक्षांचे पंचनामे करण्यात आले आहेत. तसेच आज अखेर 27 कारागीरांचे सहयंत्राचे, 39 कारागीरांच्यां कच्चा व तयार मालाचे व 2279 छोटे उद्योग, दुकाने, टपरीधारक, हातगाडीधारक इत्यादीचे पंचनामे नुसार नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. या बाबींचे पंचनामेदेखील अजूनही सुरू आहेत.

जिल्ह्यात महापूरामुळे 274 गावांतील 97 हजार 486 शेतकऱ्यांचे 40 हजार 671 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. आज अखेर 174 गावांतील 24 हजार 781 शेतकऱ्यांचे 8 हजार 508.72 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.    

मिरज तालुक्यातील 26 गावांतील 29 हजार 117 शेतकऱ्यांचे 10 हजार 340 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे त्यापैकी 21 गावांतील 3 हजार 712 शेतकऱ्यांचे 1 हजार 728.64 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.

वाळवा तालुक्यातील 98 गावांतील 31 हजार 245 शेतकऱ्यांचे 13 हजार 495 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे त्यापैकी 41गावांतील 7 हजार 701 शेतकऱ्यांचे 2 हजार 697.60 हेक्टर पंचनामे पूर्ण झाले आहेत.

शिराळा तालुक्यातील 95 गावांतील 15 हजार 350 शेतकऱ्यांचे 6 हजार 631 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे त्यापैकी  87 गावांतील 8 हजार 786 शेतकऱ्यांचे 1 हजार 893.61 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.

पलूस तालुक्यातील 26 गावांतील 21 हजार 595 शेतकऱ्यांचे 10 हजार 146 हेक्टर बाधित झाले आहे त्यापैकी  23 गावांतील 4 हजार 523 शेतकऱ्यांचे 2 हजार 162.18 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.

तासगाव  तालुक्यातील 2 गावांतील 179  शेतकऱ्यांचे 59 हेक्टर बाधित झाले आहे त्यापैकी  2 गावांतील 59 शेतकऱ्यांचे 26.69 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.

टॅग्स :Sangli Floodसांगली पूरSangliसांगली