शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

शासनाचा सहकारात गरजेपेक्षा जास्त हस्तक्षेप

By admin | Updated: March 23, 2015 00:44 IST

जे. एफ . पाटील : संस्था बनल्या राजकारणाचे केंद्र; कुंडलमधील कार्यशाळेमध्ये टीका

कुंडल : सहकार हा चांगला विचार व साधन आहे. सहकाराला पुन्हा उर्जितावस्था आणावयाची असेल तर, प्रत्येक माणसाने आपल्यात चांगला बदल केला पाहिजे, असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांनी व्यक्त केले.क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड महाविद्यालयात अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत ‘सहकार क्षेत्रापुढील आव्हाने’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्ही. वाय. पाटील होते. डॉ. पाटील पुढे म्हणाले, गरजेपेक्षा अधिक प्रमाणात सहकार क्षेत्रात सरकारने हस्तक्षेप केला आहे. सहकारी क्षेत्रात भांडवल उभारणीची पद्धत चुकीची आहे. सरकारकडून सहकारी संस्था उभारणीसाठी भांडवल घेऊ नये. सहकारी संस्थांनी ज्या कारणासाठी पैसे वापरावयाचे आहेत, त्यासाठी वापरले नाहीत. सहकारात गरजेपेक्षा जास्त नोकर भरती केली जाते. सहकारी संस्था राजकारणाचे केंद्र बनल्या आहेत. आदी कारणांमुळे सहकार अडचणीत आला आहे. विसरून गेला आहे. क्रांती उद्योग व शिक्षण समूहाचे प्रमुख अरुण लाड म्हणाले, १९९० पासून सहकार बिघडत गेला आहे. सहकारावर शेती अवलंबून आहे. शेतीसाठी अर्थसंकल्पात तरतूद नाही. सहकारी संस्था मोडीत निघाल्यास शेतीवर अवलंबून असणारे उद्योग बंद पडतील. सहकार वाचविण्याचे आव्हान आपल्या तरुण पिढीवर आहे.प्रा. सुभाष दगडे म्हणाले, लोकांमधून सहकारी चळवळीचे नेतृत्व करावयास पाहिजे. सहकारी संस्था विकासाचे एक केंद्र आहे. सहकाराचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींनीच खासगी उद्योग सुरू करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. प्राचार्य डॉ. प्रताप लाड यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सहसचिव सी. एल. रोकडे, संपतराव पवार, विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. आभार एम. जी. सदामते यांनी मानले. डॉ. डी. एम. होनमाने यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)