शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

शासनाचा सहकारात गरजेपेक्षा जास्त हस्तक्षेप

By admin | Updated: March 23, 2015 00:44 IST

जे. एफ . पाटील : संस्था बनल्या राजकारणाचे केंद्र; कुंडलमधील कार्यशाळेमध्ये टीका

कुंडल : सहकार हा चांगला विचार व साधन आहे. सहकाराला पुन्हा उर्जितावस्था आणावयाची असेल तर, प्रत्येक माणसाने आपल्यात चांगला बदल केला पाहिजे, असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांनी व्यक्त केले.क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड महाविद्यालयात अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत ‘सहकार क्षेत्रापुढील आव्हाने’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्ही. वाय. पाटील होते. डॉ. पाटील पुढे म्हणाले, गरजेपेक्षा अधिक प्रमाणात सहकार क्षेत्रात सरकारने हस्तक्षेप केला आहे. सहकारी क्षेत्रात भांडवल उभारणीची पद्धत चुकीची आहे. सरकारकडून सहकारी संस्था उभारणीसाठी भांडवल घेऊ नये. सहकारी संस्थांनी ज्या कारणासाठी पैसे वापरावयाचे आहेत, त्यासाठी वापरले नाहीत. सहकारात गरजेपेक्षा जास्त नोकर भरती केली जाते. सहकारी संस्था राजकारणाचे केंद्र बनल्या आहेत. आदी कारणांमुळे सहकार अडचणीत आला आहे. विसरून गेला आहे. क्रांती उद्योग व शिक्षण समूहाचे प्रमुख अरुण लाड म्हणाले, १९९० पासून सहकार बिघडत गेला आहे. सहकारावर शेती अवलंबून आहे. शेतीसाठी अर्थसंकल्पात तरतूद नाही. सहकारी संस्था मोडीत निघाल्यास शेतीवर अवलंबून असणारे उद्योग बंद पडतील. सहकार वाचविण्याचे आव्हान आपल्या तरुण पिढीवर आहे.प्रा. सुभाष दगडे म्हणाले, लोकांमधून सहकारी चळवळीचे नेतृत्व करावयास पाहिजे. सहकारी संस्था विकासाचे एक केंद्र आहे. सहकाराचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींनीच खासगी उद्योग सुरू करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. प्राचार्य डॉ. प्रताप लाड यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सहसचिव सी. एल. रोकडे, संपतराव पवार, विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. आभार एम. जी. सदामते यांनी मानले. डॉ. डी. एम. होनमाने यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)