शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

जागतिकीकरणाच्या रेट्यातून देशात भांडवलदारांची मक्तेदारी वाढली

By admin | Updated: October 29, 2014 00:12 IST

नाना पाटील व्याख्यानमाला : राजा माळगी यांची टीका

कवठेएकंद : गेल्या वीस वर्षांच्या काळात देशाने विविध क्षेत्रात प्रगती साधली आहे. पण गॅट करारानंतर जागतिकीकरणाच्या रेट्यातून देशात भांडवलदारांची मक्तेदारी वाढली आहे, अशी टीका प्रा. राजा माळगी यांनी केली.येथील क्रांतिसिंह नाना पाटील ज्ञानप्रबोधिनी, सार्वजनिक वाचनालयाच्या व्याख्यानमालेत ते ‘आता जागे होऊ या’ या विषयावर बोलत होते. प्रा. राजा माळगी म्हणाले की, १९९४ च्या गॅट करारापासून जागतिकरणाच्या नावाने भारताची अंतर्गत संरचना खिळखिळी करण्याचा प्रयत्न भांडवली शक्तीतून केला जात आहे. कृषीजन्य संस्कृती असणाऱ्या देशातील परंपरा, संस्कृती, इतिहास आणि आदर्शाचा जाणीवपूर्वक ऱ्हास करण्याची व्यवस्था टेलिव्हिजन आणि मोबाईलसारख्या व्यवस्थाद्वारे करण्याचा प्रयत्न होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील मालिकांसाठी प्रायोजक मिळत नाही; परंतु इतर सासू-सुनांच्या भांडणाच्या मालिका वर्षानुवर्षे चालविल्या जातात. माणसांच्या मन, मेंदू-मनगटात ऊर्जा येऊ नये, अशी जाणीवपूर्वक व्यवस्था केली जात आहे. याचा विचार डोळसपणे होणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले. व्याख्यानमालेवेळी सूर्यकांत पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष शंकरराव माळी, प्रा. बाबूराव लगारे, वासुदेव गुरव आदी उपस्थित होते. स्वागत राजाराम माळी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अनिल देशमाने, अभार विठ्ठल कुंभार यांनी मानले. व्याख्यानमालेवेळी सूर्यकांत पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष शंकरराव माळी, प्रा. बाबूराव लगारे, वासुदेव गुरव आदी उपस्थित होते. स्वागत राजाराम माळी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अनिल देशमाने, आभार विठ्ठल कुंभार यांनी मानले. (वार्ताहर)‘शुभंकरोती’च्या जागी रिमोट!सायंकाळी घरोघरी असणारी ‘शुभंकरोती’ विस्मृतीत गेली असून, घरच्या गृहिणींच्या हाती आता टीव्हीचे रिमोट आले आहे. सायंकाळी ७ ते १० या प्राईम टाईममध्ये प्रत्येक घराघरातील माणसांमध्ये विष पेरणारी यंत्रणाच टीव्ही माध्यमातून होते आहे. या सर्व घटकांच्या आहारी कितपत जायचे, हे समजले पाहिजे. तरच संस्कारक्षम घर राहू शकेल.