शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

मोहनराव, संग्रामसिंह बाजी मारणार का?

By admin | Updated: April 30, 2015 00:24 IST

जिल्हा बॅँक निवडणूक : दोघांनाही संधी मिळण्याची शक्यता, कडेगाव तालुक्यात चर्चेला उधाण

प्रताप महाडिक -कडेगाव --सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या निवडणुकीत कडेगाव तालुका विकास सोसायटी गटातून कॉँग्रेसचे उमेदवार मोहनराव कदम यांच्याविरोधात भाजपचे धोंडीराम महिंद यांनी दंड थोपटले आहेत. येथे कॉँग्रेसची मोठी ताकद असल्याने कदम बाजी मारतील, अशी शक्यता आहे. क ४ मतदारसंघात शेतकरी पॅनेलमधून संग्रामसिंंह देशमुख निवडणूक लढवित आहेत. येथे मजूर आणि औद्योगिक संस्थांतील जिल्ह्यातील मतदारांशी असलेला देशमुख यांचा संपर्क आणि पाठीशी असलेली राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना आणि कॉँग्रेसमधील मदन पाटील गटाची ताकद, यामुळे देशमुखही बाजी मारतील, अशी शक्यता आहे.बॅँकेच्या संचालक मंडळावर तीन वेळा बिनविरोध आणि एकवेळा निवडणुकीत विजय मिळवून सलग २० वर्षे संचालक असलेले ज्येष्ठ नेते मोहनराव कदम यांच्या नेतृत्वाखाली रयत सहकार परिवर्तन पॅनेल निवडणूक लढवित आहे. कदम यांना तालुक्यातच शह देण्याच्या निर्धाराने शेतकरी सहकारी पॅनेलमधून धोंडीराम महिंद निवडणूक लढवित आहेत. त्यांना काटशह देऊन मोहनराव बाजी मारणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. विकास सोसायटी गटातून ६२ मतदार आहेत. यापैकी बहुतांशी मतदारांची ताकद आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे येथे निश्चितपणे विजय मिळेल, अशी खात्री कदम व्यक्त करीत आहेत.क्र. ४ मतदारसंघात शेतकरी पॅनेलचे संग्रामसिंंह देशमुख आणि विष्णू माने यांच्या विरोधात रयत सहकार परिवर्तन पॅनेलचे सी. बी. पाटील व विलास बेले उमेदवार आहेत. या गटामध्ये मजूर आणि औद्योगिक संस्थांतील सर्व जिल्ह्यातील जवळपास तीनशेहून अधिक मतदार आहेत. गत निवडणुकीतही संग्रामसिंंह देशमुख यांना याच गटातून संधी मिळाली होती. देशमुख यांचा मतदारांशी असलेला संपर्क आणि पॅनेलची ताकद यामुळे तेही या निवडणुकीत बाजी मारतील अशी चर्चा आहे.कडेगाव तालुक्यात कदम आणि देशमुख यांच्या साखर कारखाने, सहकारी संस्था, सूतगिरण्या यामुळे जिल्हा मध्यवर्ती बॅँकेची उलाढाल वाढली आहे आणि बॅँकेला उर्जितावस्था आली आहे. तालुक्यातील बॅँकेच्या सर्व शाखा प्रगतीकडे वाटचाल करीत आहेत. त्यामुळे तालुक्यातील मोहनराव कदम व संग्रामसिंह देशमुख हे प्रभावशाली नेते जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळावर निवडले जातील, अशी शक्यता तालुक्यातील राजकीय जाणकार कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.मोहनराव कदम २0 वर्षे संचालककॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहनराव कदम सोसायटी गटातून सलग तीनवेळा बिनविरोध व एकवेळा निवडणूक लढवून जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळात काम करीत आहेत. सहकारात मजबूत पायावर उभा असल्याने हे शक्य झाले, असे ते सांगतात. होमग्राऊंडवर त्यांना तब्बल २० वर्षे संचालक म्हणून कामकाजाची संधी मिळाली आहे. आताही संधीची शक्यता व्यक्त होत आहे.