शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
4
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
5
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
6
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
7
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
8
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
9
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
10
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
11
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
12
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
13
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
14
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
15
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
16
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
17
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
18
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
19
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
20
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !

आमदारांना जनाची नाही, मनाची तरी..!

By admin | Updated: January 9, 2017 22:49 IST

मानसिंगराव नाईक : शिरशीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्र्रचाराचा प्रारंभ; शिवाजीराव नाईक यांच्यावर टीका

शिराळा : येथील लोकप्र्रतिनिधींनी अडीच वर्षात एकही मोठ्या कामाला मंजुरी आणली नाही आणि आम्ही केलेली कामे मुख्यमंत्री, इतर मंत्र्यांना आणून आपणच केल्याचा आव आणत आहेत. आपण जे काम केलेच नाही, त्या कामाचा नारळ फोडताना जनाची नाही, तर मनाची तरी बाळगायची, अशा शब्दात माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी आमदार शिवाजीराव नाईक यांच्यावर नाव न घेता टीका केली. शिरशी (ता. शिराळा) येथे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा प्रचार प्रारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, अडीच वर्षात एकही ठोस विकास काम हे लोकप्रतिनिधी करू शकले नाहीत. त्यांच्या पंधरा वर्षांच्या काळातील विकास कामांपेक्षा जास्त कामे आपण पाच वर्षांत मंजूर करून आणली आहेत. माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या सहकार्याने केलेल्या विकासकामांचा प्रारंभ व उद्घाटन करीत ते सुटले आहेत. बसस्थानक, प्र्रशासकीय इमारत, उपजिल्हा रुग्णालय, गिरजवडे प्रकल्प ही कामे आम्ही केली आहेत आणि उद्घाटन मात्र ते करीत आहेत.ते म्हणाले की, वाकुर्डेला आता टप्प्याटप्प्याने २०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली असली तरी, हा निधी कधी मिळणार, हे त्यांनाही माहिती नाही. या लोकप्र्रतिनिधींचा नाकर्तेपणा त्यांच्या पक्षातील नेत्यांनाही माहीत आहे. त्यामुळे त्यांना निवडून या, मंत्री करतो आणि आता जिल्हा परिषद, पंचायत समिती जिंका, मग मंत्री करतो, अशा घोषणा भाजपचे नेते करीत आहेत.यावेळी युवा नेते विराज नाईक, हरिष पाटील, विजय झिमूर, माजी जि. प. सदस्य के. डी. पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हणमंतराव पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे, पंचायत समिती सभापती सम्राटसिंह नाईक आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अशोकराव पाटील, माजी पं. स. सभापती बाळासाहेब पाटील, तानाजी महिंद, दिनकर महिंद, डॉ. संपतराव पाटील, विश्वास पाटील, निवृत्ती महिंद, एम. बी. भोसले, शारदा घारगे, प्रवीण शेटे आदी उपस्थित होते. तानाजी कुंभार यांनी प्र्रास्ताविक केले. (वार्ताहर)नेत्यांचा विश्वासघातसह्याद्री संघाचे अध्यक्ष संपतराव देशमुख म्हणाले की, सध्याचे आमदार विश्वासघातकी आहेत. पहिल्यांदा शिवाजीराव देशमुख, नंतर फत्तेसिंगराव नाईक, आ. जयंत पाटील, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह अनेकांचा विश्वासघात करून पदे मिळविण्याचा ते प्र्रयत्न करीत आहेत.