शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

MLA Anil Babar passed away: सर्वसामान्य जनता अन् कार्यकर्त्याच्या हक्काचे भाऊ गेले

By हणमंत पाटील | Updated: February 1, 2024 13:33 IST

..त्यामुळे भाऊंच्या कामाकडे दुर्लक्ष करणे अथवा टाळाटाळ करण्याची कोणत्याही अधिकाऱ्याची हिम्मत होत नव्हती.

हणमंत पाटीलसांगली : पहिल्याच रिंगमध्ये मोबाईल उचलल्याने, कॉल करणाराच गडबडतो. भाऊ आहेत का ? हो बोला भाऊच बोलतोय. समोरच्याचे काम समजून घेऊन थोड्या वेळाने सांगतो म्हणायचे. मग, कॉल करणारा कोण आहे, आपल्या पार्टीचा आहे की विरोधक आहे, याविषयी विचारणा करीत नसत. माझे आताच बोलणे झाले आहे, तुम्ही त्या अधिकाऱ्याला भेटा म्हणून पुन्हा आवर्जून कॉल करून सांगत असत. मग कॉल करणारा विरोधी पार्टीचा असेल, तर तो ओशाळून जायचा. पुढे तो हमखास भाऊचा कार्यकर्ता व्हायचा.कार्यकर्त्याला कधीही अडचण येऊ दे, मध्यरात्री भाऊ कॉल घेणारच याची खात्री असायची. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक असो की कार्यकर्ता त्यांना भाऊ हक्काचे वाटायचे. कामाच्या निमित्ताने एखादा माणूस भाऊंच्या संपर्कात आला की पुढे तो त्याचा एक तर हक्काचा मतदार अथवा कार्यकर्ता होतो. त्यामुळे आतापर्यंत भाऊंना सोडून कोणताही कार्यकर्ता दुसऱ्या पार्टीत गेला नाही. अपवादाने एखादा गेलाच तर त्याला पुढे पश्चाताप व्हायचा.कोरोना काळातही भाऊ कधीही घरी बसले नाहीत. कारण कार्यकर्तेच काय, मतदार संघाबाहेरील त्यांचे नातेवाईकही हक्काने भाऊंना कॉल करायचे. आम्हाला हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेत नाहीत. रेमडेसिव्हरचे इंजेक्शन मिळत नाही. हा नानाचा पाडा थांबवून भाऊ म्हणायचे सांगतो. मग काय थोड्या वेळात संबंधित हॉस्पिटलमधून कॉल यायचा. तुम्ही भाऊंना कॉल केला होता का, तुमच्यासाठी बेडची व्यवस्था केली आहे. इतका वचक प्रशासनावर कायम राहिला.

ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकापासून ते जिल्हाधिकाऱ्यापर्यंत अधिकारी वरिष्ठ असो की कनिष्ठ. भाऊचा कॉल आला की अधिकारी सतर्क व्ह्ययचे. कारण जनतेच्या कामाशिवाय भाऊ कधीही कॉल करणार नाहीत, याची त्यांना खात्री असायची. शिवाय भाऊ केवळ कार्यकर्त्याला खुश करण्यासाठी तोंडदेखले कॉल करीत नाहीत. काम मार्गी लागेपर्यंत ते पाठपुरावा करतात, हे त्यांना माहिती असते. त्यामुळे भाऊंच्या कामाकडे दुर्लक्ष करणे अथवा टाळाटाळ करण्याची कोणत्याही अधिकाऱ्याची हिम्मत होत नव्हती.एखादा अधिकारी नवीन असेल, तर त्याला बाजूचे कर्मचारी सतर्क करायचे. भाऊंचे काम असेल, तर ते करावेच लागेल, अन्यथा काही खरे नाही. इतका प्रशासनावर भाऊंचा वचक शेवटपर्यंत राहिला. त्यामुळे भाऊंकडे गेलेल्या कार्यकर्त्यांचे काम हमखास व्ह्यायचेच. त्यामुळेच भाऊ, प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्यालाही हक्काचे वाटत राहिले. भाऊ गेल्याची बातमी समजल्यानंतर खानापूर- आटपाडी मतदारसंघातील प्रत्येक कार्यकर्ता अंत्यदर्शनासाठी धाव घेतली.

टॅग्स :Sangliसांगली