शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

MLA Anil Babar passed away: सर्वसामान्य जनता अन् कार्यकर्त्याच्या हक्काचे भाऊ गेले

By हणमंत पाटील | Updated: February 1, 2024 13:33 IST

..त्यामुळे भाऊंच्या कामाकडे दुर्लक्ष करणे अथवा टाळाटाळ करण्याची कोणत्याही अधिकाऱ्याची हिम्मत होत नव्हती.

हणमंत पाटीलसांगली : पहिल्याच रिंगमध्ये मोबाईल उचलल्याने, कॉल करणाराच गडबडतो. भाऊ आहेत का ? हो बोला भाऊच बोलतोय. समोरच्याचे काम समजून घेऊन थोड्या वेळाने सांगतो म्हणायचे. मग, कॉल करणारा कोण आहे, आपल्या पार्टीचा आहे की विरोधक आहे, याविषयी विचारणा करीत नसत. माझे आताच बोलणे झाले आहे, तुम्ही त्या अधिकाऱ्याला भेटा म्हणून पुन्हा आवर्जून कॉल करून सांगत असत. मग कॉल करणारा विरोधी पार्टीचा असेल, तर तो ओशाळून जायचा. पुढे तो हमखास भाऊचा कार्यकर्ता व्हायचा.कार्यकर्त्याला कधीही अडचण येऊ दे, मध्यरात्री भाऊ कॉल घेणारच याची खात्री असायची. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक असो की कार्यकर्ता त्यांना भाऊ हक्काचे वाटायचे. कामाच्या निमित्ताने एखादा माणूस भाऊंच्या संपर्कात आला की पुढे तो त्याचा एक तर हक्काचा मतदार अथवा कार्यकर्ता होतो. त्यामुळे आतापर्यंत भाऊंना सोडून कोणताही कार्यकर्ता दुसऱ्या पार्टीत गेला नाही. अपवादाने एखादा गेलाच तर त्याला पुढे पश्चाताप व्हायचा.कोरोना काळातही भाऊ कधीही घरी बसले नाहीत. कारण कार्यकर्तेच काय, मतदार संघाबाहेरील त्यांचे नातेवाईकही हक्काने भाऊंना कॉल करायचे. आम्हाला हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेत नाहीत. रेमडेसिव्हरचे इंजेक्शन मिळत नाही. हा नानाचा पाडा थांबवून भाऊ म्हणायचे सांगतो. मग काय थोड्या वेळात संबंधित हॉस्पिटलमधून कॉल यायचा. तुम्ही भाऊंना कॉल केला होता का, तुमच्यासाठी बेडची व्यवस्था केली आहे. इतका वचक प्रशासनावर कायम राहिला.

ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकापासून ते जिल्हाधिकाऱ्यापर्यंत अधिकारी वरिष्ठ असो की कनिष्ठ. भाऊचा कॉल आला की अधिकारी सतर्क व्ह्ययचे. कारण जनतेच्या कामाशिवाय भाऊ कधीही कॉल करणार नाहीत, याची त्यांना खात्री असायची. शिवाय भाऊ केवळ कार्यकर्त्याला खुश करण्यासाठी तोंडदेखले कॉल करीत नाहीत. काम मार्गी लागेपर्यंत ते पाठपुरावा करतात, हे त्यांना माहिती असते. त्यामुळे भाऊंच्या कामाकडे दुर्लक्ष करणे अथवा टाळाटाळ करण्याची कोणत्याही अधिकाऱ्याची हिम्मत होत नव्हती.एखादा अधिकारी नवीन असेल, तर त्याला बाजूचे कर्मचारी सतर्क करायचे. भाऊंचे काम असेल, तर ते करावेच लागेल, अन्यथा काही खरे नाही. इतका प्रशासनावर भाऊंचा वचक शेवटपर्यंत राहिला. त्यामुळे भाऊंकडे गेलेल्या कार्यकर्त्यांचे काम हमखास व्ह्यायचेच. त्यामुळेच भाऊ, प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्यालाही हक्काचे वाटत राहिले. भाऊ गेल्याची बातमी समजल्यानंतर खानापूर- आटपाडी मतदारसंघातील प्रत्येक कार्यकर्ता अंत्यदर्शनासाठी धाव घेतली.

टॅग्स :Sangliसांगली