शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
3
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
4
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
5
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
6
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
7
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
8
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
9
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
10
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
11
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
12
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
13
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
14
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
15
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
16
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
17
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
18
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
19
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
20
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर

MLA Anil Babar passed away: सर्वसामान्य जनता अन् कार्यकर्त्याच्या हक्काचे भाऊ गेले

By हणमंत पाटील | Updated: February 1, 2024 13:33 IST

..त्यामुळे भाऊंच्या कामाकडे दुर्लक्ष करणे अथवा टाळाटाळ करण्याची कोणत्याही अधिकाऱ्याची हिम्मत होत नव्हती.

हणमंत पाटीलसांगली : पहिल्याच रिंगमध्ये मोबाईल उचलल्याने, कॉल करणाराच गडबडतो. भाऊ आहेत का ? हो बोला भाऊच बोलतोय. समोरच्याचे काम समजून घेऊन थोड्या वेळाने सांगतो म्हणायचे. मग, कॉल करणारा कोण आहे, आपल्या पार्टीचा आहे की विरोधक आहे, याविषयी विचारणा करीत नसत. माझे आताच बोलणे झाले आहे, तुम्ही त्या अधिकाऱ्याला भेटा म्हणून पुन्हा आवर्जून कॉल करून सांगत असत. मग कॉल करणारा विरोधी पार्टीचा असेल, तर तो ओशाळून जायचा. पुढे तो हमखास भाऊचा कार्यकर्ता व्हायचा.कार्यकर्त्याला कधीही अडचण येऊ दे, मध्यरात्री भाऊ कॉल घेणारच याची खात्री असायची. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक असो की कार्यकर्ता त्यांना भाऊ हक्काचे वाटायचे. कामाच्या निमित्ताने एखादा माणूस भाऊंच्या संपर्कात आला की पुढे तो त्याचा एक तर हक्काचा मतदार अथवा कार्यकर्ता होतो. त्यामुळे आतापर्यंत भाऊंना सोडून कोणताही कार्यकर्ता दुसऱ्या पार्टीत गेला नाही. अपवादाने एखादा गेलाच तर त्याला पुढे पश्चाताप व्हायचा.कोरोना काळातही भाऊ कधीही घरी बसले नाहीत. कारण कार्यकर्तेच काय, मतदार संघाबाहेरील त्यांचे नातेवाईकही हक्काने भाऊंना कॉल करायचे. आम्हाला हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेत नाहीत. रेमडेसिव्हरचे इंजेक्शन मिळत नाही. हा नानाचा पाडा थांबवून भाऊ म्हणायचे सांगतो. मग काय थोड्या वेळात संबंधित हॉस्पिटलमधून कॉल यायचा. तुम्ही भाऊंना कॉल केला होता का, तुमच्यासाठी बेडची व्यवस्था केली आहे. इतका वचक प्रशासनावर कायम राहिला.

ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकापासून ते जिल्हाधिकाऱ्यापर्यंत अधिकारी वरिष्ठ असो की कनिष्ठ. भाऊचा कॉल आला की अधिकारी सतर्क व्ह्ययचे. कारण जनतेच्या कामाशिवाय भाऊ कधीही कॉल करणार नाहीत, याची त्यांना खात्री असायची. शिवाय भाऊ केवळ कार्यकर्त्याला खुश करण्यासाठी तोंडदेखले कॉल करीत नाहीत. काम मार्गी लागेपर्यंत ते पाठपुरावा करतात, हे त्यांना माहिती असते. त्यामुळे भाऊंच्या कामाकडे दुर्लक्ष करणे अथवा टाळाटाळ करण्याची कोणत्याही अधिकाऱ्याची हिम्मत होत नव्हती.एखादा अधिकारी नवीन असेल, तर त्याला बाजूचे कर्मचारी सतर्क करायचे. भाऊंचे काम असेल, तर ते करावेच लागेल, अन्यथा काही खरे नाही. इतका प्रशासनावर भाऊंचा वचक शेवटपर्यंत राहिला. त्यामुळे भाऊंकडे गेलेल्या कार्यकर्त्यांचे काम हमखास व्ह्यायचेच. त्यामुळेच भाऊ, प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्यालाही हक्काचे वाटत राहिले. भाऊ गेल्याची बातमी समजल्यानंतर खानापूर- आटपाडी मतदारसंघातील प्रत्येक कार्यकर्ता अंत्यदर्शनासाठी धाव घेतली.

टॅग्स :Sangliसांगली