शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

आमदार अनिल बाबर यांचे मंत्रिपदाचे स्वप्न अधुरेच राहिले!

By अशोक डोंबाळे | Updated: February 1, 2024 13:25 IST

कार्यकर्त्यांना आठवणीने हुंदका आवरेना : चारवेळा मंत्रिपदाच्या शर्यतीत

अशोक डोंबाळेसांगली : खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात पाणी आणल्यामुळे पीक हिरवीगार झाली. पण, खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाला मंत्रीपद मिळवून तोही दुष्काळ हटवायचा आहे, अशी भूमिका आमदार अनिल बाबर नेहमी मांडायचे. त्यांना महाविकास आघाडी आणि महायुती सरकारमध्ये चारवेळा मंत्रीपद निश्चित झाल्यानंतर अचानक हुलकावणी दिली. अखेर बुधवार दि.३१ जानेवारीला सकाळी अनिल भाऊंची प्राणज्योत मालवल्याची वृत्त येताच कार्यकर्ते सुन्न झाले. सोशल माध्यमावर कार्यकर्त्यांकडून भाऊंचे मंत्रिपदाचे स्वप्न अपूर्णच राहिल्याच्या भावना व्यक्त होऊ लागल्या. अंत्यसंस्कारच्या ठिकाणीही या आठवणीने कार्यकर्त्यांना हुंदका आवरने ही कठीण झाले.काँग्रेस फुटून राष्ट्रवादीचा जन्म झाला. त्यावेळी अनिल भाऊ यांनी राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या पक्षाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर १९९९ मध्ये भाजप-शिवसेना युतीचे सरकार जाऊन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार सत्तेवर आले. शरद पवार यांनी अनिलभाऊ यांच्याकडे मंत्रिपदाचा प्रस्ताव दिला होता. मोठ्या मनाने अनिलभाऊ यांनी मी पुन्हा आमदार होऊ शकतो. पण, आर. आर. पाटील यांना राजकीय अडचणी खूप असल्यामुळे त्यांना संधी देण्याची विनंती केली. स्वत:हून भाऊ यांनी आर. आर. पाटील यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ घातली होती.पण, त्यानंतरच्या २०१४ च्या निवडणुकीमध्ये अनिलभाऊंनी विजय खेचून आणला. २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढविली आणि विजयीही झाले. राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार येण्याऐवजी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. अनिलभाऊ यांना निश्चित मंत्रीपद मिळणार, असा निरोप 'मातोश्री'वरून आला होता. त्यांच्या समर्थकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. तयारी करून कार्यकर्त्यांसह भाऊ मुंबईला गेले. पण, अचानक 'मातोश्री'वर कुणी तरी मिठाचा खडा टाकला आणि भाऊंचे मंत्रीपद हुकले.

राज्यात शिवसेना बंडखोर आमदारांचा गट व भाजप यांचे सरकार स्थापन झाले. यावेळी अनिलभाऊ यांचे मंत्रीपद निश्चित होते. ऑगस्ट २०२२ मध्ये त्यांच्या पत्नी शोभाताई बाबर यांचे निधन झाले. या दु:खद घटनेमुळे त्यांनी मंत्रीपद स्वीकारले नाही. पुढे विस्तारात अनिलभाऊ यांना मंत्रीपद निश्चित मिळेल, अशी अपेक्षा होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे असल्यामुळे ते मंत्री निश्चित असणार, अशी कार्यकर्त्यांसह जिल्ह्यात चर्चा होती.शिवसेनेकडून बाबर यांचे नाव मंत्रिपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले. पुन्हा संधी मिळणार आहे, अशी कार्यकर्त्यांची समजूत काढून त्यांना भाऊंनी शांत केले. अनिलभाऊ यांनी खानापूर-आटपाडी तालुक्याला टेंभूचे पाणी देऊन दुष्काळ हटविला. पण, खानापूर-आटपाडी तालुक्यांचा मंत्रीपदाचा दुष्काळ हटविण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्णच राहिले.शोभाताईंचेही स्वप्न अपूर्णचराज्यात जून २०२२ मध्ये शिवसेना-भाजप सरकार स्थापन झाले. अनिलभाऊ हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक असल्यामुळे त्यांना विस्तारात १०० टक्के मंत्रिपदाची संधी मिळणार, अशी चर्चा मतदारसंघात सुरू होती. याच दर ऑगस्ट २०२२ मध्ये भाऊंच्या पत्नी शोभाताई यांची प्रकृती अचानक खालावली आणि त्यांना पुण्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्याचे निश्चित केले. घरातून बाहेर पडताना शोभाताईंनी सुनबाईंना अगं माझ्या बॅगमध्ये एखादी चांगली साडीही ठेव. कदाचित मला भाऊंच्या मंत्रिपदाच्या शपथविधीला जावे लागणार आहे. पण, त्यांचे हे शब्द अधुरेच राहिले. रुग्णालयात अचानक प्रकृती खालावली आणि त्यांची प्राणज्योत मालवली.

टॅग्स :Sangliसांगलीministerमंत्री