शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

मिरज तालुक्यात दोन्ही कॉँग्रेसची भाजपशी लढत--ग्रामपंचायत निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 22:22 IST

मिरज : मिरज तालुक्यातील ३८ गावांतील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मिरज पूर्व भागात भाजप विरुध्द काँग्रेस व पश्चिम भागात राष्टÑवादी विरुध्द काँग्रेस व स्वाभिमानी आघाडीत लढत

ठळक मुद्दे : पूर्व व पश्चिम भागात समीकरणे वेगळीकाँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना विरुध्द राष्टÑवादी अशी लढत

सदानंद औंधे ।लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : मिरज तालुक्यातील ३८ गावांतील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मिरज पूर्व भागात भाजप विरुध्द काँग्रेस व पश्चिम भागात राष्टÑवादी विरुध्द काँग्रेस व स्वाभिमानी आघाडीत लढत होत आहे. माजी मंत्री अजितराव घोरपडे गट सोयीस्कर भूमिकेत आहे. मिरज पूर्व भागात काँग्रेस व राष्टÑवादी एकत्र आल्याने जिल्हा परिषद निवडणुकीत यश मिळविणाºया भाजपला ग्रामपंचायत निवडणुकीत यशासाठी संघर्ष करावा लागणार आहे.मिरज पूर्व भागात काँग्रेसच्या मदन पाटील गटाचे वर्चस्व होते; मात्र पूर्व भागात पंचायत समितीच्या दहा व जिल्हा परिषदेच्या चार जागा जिंकून भाजपने येथे वर्चस्व निर्माण केले आहे. काँग्रेस व राष्टÑवादीच्या अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी खा. संजय पाटील व आ. सुरेश खाडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केल्याने पूर्व भागातील काही ग्रामपंचायतींत भाजपची सत्ता आहे. ग्रामपंचायतींसाठी भाजपविरुध्द काँग्रेस व राष्टÑवादी अशी लढत होत आहे. बेडग, गुंडेवाडी, बोलवाड, खटाव, कदमवाडी, खंडेराजुरी, बेळंकी, सावळी, टाकळी, सलगरे, वड्डी, संतोषवाडी, पाटगाव, सिध्देवाडी, पायापाचीवाडी, सोनी या मिरज पूर्व भागात भाजप नेत्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. खंडेराजुरीत भाजप व काँग्रेससमर्थक एकत्र येऊन निवडणूक लढवित आहेत. सोनीत घोरपडे गट व भाजप एकत्र आहेत. मात्र अन्य काही ठिकाणी घोरपडे गट भाजपविरोधात आहे. बेडग येथे भाजपमधील दोन गट विरुध्द काँग्रेस अशी लढत आहे. पूर्व भागात जि. प. व पंचायत समिती निवडणुकीत यश मिळविणाºया भाजपला काँग्रेस व राष्टÑवादीने आव्हान दिले आहे. मिरज पश्चिम भागात राष्टÑवादीचे वर्चस्व आहे. मिरज पश्चिम भागातील दुधगाव, हरिपूर, जानराववाडी, कसबे डिग्रज, कानडवाडी, खरकटवाडी, काकडवाडी, बुधगाव, बिसूर, माधवनगर, मौजे डिग्रज, माळवाडी, मानमोडी, नरवाड, नांद्रे, सावळवाडी, समडोळी, पद्माळे, रसूलवाडी, सांबरवाडी, बामणोली या निवडणुकांसाठी काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटना, रयत क्रांती संघटना एकत्र आल्या आहेत.काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना विरुध्द राष्टÑवादी अशी लढत आहे. पश्चिम भागात बुधगाव व हरिपूर वगळता काँग्रेस, राष्टÑवादीच्या तुलनेत भाजपची ताकद अपुरी आहे. यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील यशाची पुनरावृत्ती करणे भाजपसाठी कठीण ठरणार आहे.वर्चस्व टिकविण्याचे : काँग्रेससमोर आव्हानग्रामपंचायत निवडणुकांत सरपंचांची थेट मतदारांतून निवड होणार असल्याने अनेक गावांतील राजकीय समीकरणे बदलली आहेत. निवडणूक होत असलेल्या बहुसंख्य ग्रामपंचायतीत काँग्रेसचेच वर्चस्व होते; मात्र तालुक्यातील काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीत वर्चस्व टिकविण्याचे काँग्रेससमोर आव्हान आहे.