शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

मिरज तालुक्यात दोन्ही कॉँग्रेसची भाजपशी लढत--ग्रामपंचायत निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 22:22 IST

मिरज : मिरज तालुक्यातील ३८ गावांतील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मिरज पूर्व भागात भाजप विरुध्द काँग्रेस व पश्चिम भागात राष्टÑवादी विरुध्द काँग्रेस व स्वाभिमानी आघाडीत लढत

ठळक मुद्दे : पूर्व व पश्चिम भागात समीकरणे वेगळीकाँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना विरुध्द राष्टÑवादी अशी लढत

सदानंद औंधे ।लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : मिरज तालुक्यातील ३८ गावांतील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मिरज पूर्व भागात भाजप विरुध्द काँग्रेस व पश्चिम भागात राष्टÑवादी विरुध्द काँग्रेस व स्वाभिमानी आघाडीत लढत होत आहे. माजी मंत्री अजितराव घोरपडे गट सोयीस्कर भूमिकेत आहे. मिरज पूर्व भागात काँग्रेस व राष्टÑवादी एकत्र आल्याने जिल्हा परिषद निवडणुकीत यश मिळविणाºया भाजपला ग्रामपंचायत निवडणुकीत यशासाठी संघर्ष करावा लागणार आहे.मिरज पूर्व भागात काँग्रेसच्या मदन पाटील गटाचे वर्चस्व होते; मात्र पूर्व भागात पंचायत समितीच्या दहा व जिल्हा परिषदेच्या चार जागा जिंकून भाजपने येथे वर्चस्व निर्माण केले आहे. काँग्रेस व राष्टÑवादीच्या अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी खा. संजय पाटील व आ. सुरेश खाडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केल्याने पूर्व भागातील काही ग्रामपंचायतींत भाजपची सत्ता आहे. ग्रामपंचायतींसाठी भाजपविरुध्द काँग्रेस व राष्टÑवादी अशी लढत होत आहे. बेडग, गुंडेवाडी, बोलवाड, खटाव, कदमवाडी, खंडेराजुरी, बेळंकी, सावळी, टाकळी, सलगरे, वड्डी, संतोषवाडी, पाटगाव, सिध्देवाडी, पायापाचीवाडी, सोनी या मिरज पूर्व भागात भाजप नेत्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. खंडेराजुरीत भाजप व काँग्रेससमर्थक एकत्र येऊन निवडणूक लढवित आहेत. सोनीत घोरपडे गट व भाजप एकत्र आहेत. मात्र अन्य काही ठिकाणी घोरपडे गट भाजपविरोधात आहे. बेडग येथे भाजपमधील दोन गट विरुध्द काँग्रेस अशी लढत आहे. पूर्व भागात जि. प. व पंचायत समिती निवडणुकीत यश मिळविणाºया भाजपला काँग्रेस व राष्टÑवादीने आव्हान दिले आहे. मिरज पश्चिम भागात राष्टÑवादीचे वर्चस्व आहे. मिरज पश्चिम भागातील दुधगाव, हरिपूर, जानराववाडी, कसबे डिग्रज, कानडवाडी, खरकटवाडी, काकडवाडी, बुधगाव, बिसूर, माधवनगर, मौजे डिग्रज, माळवाडी, मानमोडी, नरवाड, नांद्रे, सावळवाडी, समडोळी, पद्माळे, रसूलवाडी, सांबरवाडी, बामणोली या निवडणुकांसाठी काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटना, रयत क्रांती संघटना एकत्र आल्या आहेत.काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना विरुध्द राष्टÑवादी अशी लढत आहे. पश्चिम भागात बुधगाव व हरिपूर वगळता काँग्रेस, राष्टÑवादीच्या तुलनेत भाजपची ताकद अपुरी आहे. यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील यशाची पुनरावृत्ती करणे भाजपसाठी कठीण ठरणार आहे.वर्चस्व टिकविण्याचे : काँग्रेससमोर आव्हानग्रामपंचायत निवडणुकांत सरपंचांची थेट मतदारांतून निवड होणार असल्याने अनेक गावांतील राजकीय समीकरणे बदलली आहेत. निवडणूक होत असलेल्या बहुसंख्य ग्रामपंचायतीत काँग्रेसचेच वर्चस्व होते; मात्र तालुक्यातील काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीत वर्चस्व टिकविण्याचे काँग्रेससमोर आव्हान आहे.