शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मिरज तालुक्यात दोन्ही कॉँग्रेसची भाजपशी लढत--ग्रामपंचायत निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 22:22 IST

मिरज : मिरज तालुक्यातील ३८ गावांतील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मिरज पूर्व भागात भाजप विरुध्द काँग्रेस व पश्चिम भागात राष्टÑवादी विरुध्द काँग्रेस व स्वाभिमानी आघाडीत लढत

ठळक मुद्दे : पूर्व व पश्चिम भागात समीकरणे वेगळीकाँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना विरुध्द राष्टÑवादी अशी लढत

सदानंद औंधे ।लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : मिरज तालुक्यातील ३८ गावांतील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मिरज पूर्व भागात भाजप विरुध्द काँग्रेस व पश्चिम भागात राष्टÑवादी विरुध्द काँग्रेस व स्वाभिमानी आघाडीत लढत होत आहे. माजी मंत्री अजितराव घोरपडे गट सोयीस्कर भूमिकेत आहे. मिरज पूर्व भागात काँग्रेस व राष्टÑवादी एकत्र आल्याने जिल्हा परिषद निवडणुकीत यश मिळविणाºया भाजपला ग्रामपंचायत निवडणुकीत यशासाठी संघर्ष करावा लागणार आहे.मिरज पूर्व भागात काँग्रेसच्या मदन पाटील गटाचे वर्चस्व होते; मात्र पूर्व भागात पंचायत समितीच्या दहा व जिल्हा परिषदेच्या चार जागा जिंकून भाजपने येथे वर्चस्व निर्माण केले आहे. काँग्रेस व राष्टÑवादीच्या अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी खा. संजय पाटील व आ. सुरेश खाडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केल्याने पूर्व भागातील काही ग्रामपंचायतींत भाजपची सत्ता आहे. ग्रामपंचायतींसाठी भाजपविरुध्द काँग्रेस व राष्टÑवादी अशी लढत होत आहे. बेडग, गुंडेवाडी, बोलवाड, खटाव, कदमवाडी, खंडेराजुरी, बेळंकी, सावळी, टाकळी, सलगरे, वड्डी, संतोषवाडी, पाटगाव, सिध्देवाडी, पायापाचीवाडी, सोनी या मिरज पूर्व भागात भाजप नेत्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. खंडेराजुरीत भाजप व काँग्रेससमर्थक एकत्र येऊन निवडणूक लढवित आहेत. सोनीत घोरपडे गट व भाजप एकत्र आहेत. मात्र अन्य काही ठिकाणी घोरपडे गट भाजपविरोधात आहे. बेडग येथे भाजपमधील दोन गट विरुध्द काँग्रेस अशी लढत आहे. पूर्व भागात जि. प. व पंचायत समिती निवडणुकीत यश मिळविणाºया भाजपला काँग्रेस व राष्टÑवादीने आव्हान दिले आहे. मिरज पश्चिम भागात राष्टÑवादीचे वर्चस्व आहे. मिरज पश्चिम भागातील दुधगाव, हरिपूर, जानराववाडी, कसबे डिग्रज, कानडवाडी, खरकटवाडी, काकडवाडी, बुधगाव, बिसूर, माधवनगर, मौजे डिग्रज, माळवाडी, मानमोडी, नरवाड, नांद्रे, सावळवाडी, समडोळी, पद्माळे, रसूलवाडी, सांबरवाडी, बामणोली या निवडणुकांसाठी काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटना, रयत क्रांती संघटना एकत्र आल्या आहेत.काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना विरुध्द राष्टÑवादी अशी लढत आहे. पश्चिम भागात बुधगाव व हरिपूर वगळता काँग्रेस, राष्टÑवादीच्या तुलनेत भाजपची ताकद अपुरी आहे. यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील यशाची पुनरावृत्ती करणे भाजपसाठी कठीण ठरणार आहे.वर्चस्व टिकविण्याचे : काँग्रेससमोर आव्हानग्रामपंचायत निवडणुकांत सरपंचांची थेट मतदारांतून निवड होणार असल्याने अनेक गावांतील राजकीय समीकरणे बदलली आहेत. निवडणूक होत असलेल्या बहुसंख्य ग्रामपंचायतीत काँग्रेसचेच वर्चस्व होते; मात्र तालुक्यातील काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीत वर्चस्व टिकविण्याचे काँग्रेससमोर आव्हान आहे.