शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
2
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
3
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
4
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
5
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
6
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
7
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
8
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
9
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
10
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
11
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
12
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
13
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
14
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
15
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
16
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
17
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
18
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
19
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
20
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स

महापालिकेत मिरज पॅटर्न ठरणार डोकेदुखी

By admin | Updated: October 29, 2015 00:13 IST

जयश्रीतार्इंसमोर खरे आव्हान : सांगली, मिरज, कुपवाडच्या राजकारणात मोठ्या बदलाचे संकेत

शीतल पाटील --सांगली  --ना नेता, ना पक्ष, केवळ सोयीचे राजकारण; हा अजेंडा असलेल्या ‘मिरज पॅटर्न’ची महापालिकेत धास्ती कायम आहे. त्यातच माजी मंत्री मदन पाटील यांच्या पश्चात महापालिकेचा कारभार कोणाच्या हाती जाणार, याची चर्चा सुरू झाली आहे. मदनभाऊंच्या हयातीतच सत्ताधारी गटाची शकले झाली आहेत. त्यांच्या पत्नी जयश्रीतार्इंनी महापालिकेचे नेतृत्व स्वीकारले तरी, भविष्यात पदाधिकारी निवडीत त्यांचा शब्द कितपत प्रमाण मानला जाईल, त्यांच्या आदेशानेच कारभार होईल का, याविषयी साशंकता आहे. सांगली-मिरज रस्त्यावरील कृपामयी रुग्णालयाच्या पलीकडे आम्हाला कोणी नेता नाही, की पक्ष नाही, असे मिरजेतील सर्वपक्षीय नगरसेवक उघडपणे सांगतात. सांगलीत आल्यावर मात्र पक्ष, नेता याची भाषा सुरू होते. त्याला कारणही आहे. मिरजेतील बहुतांश नगरसेवक स्वयंभू आहेत. त्यांचा प्रभागात वरचष्मा आहे. ते कोणत्याही पक्षातून निवडून येऊ शकतात. सांगली व कुपवाडची स्थिती मिरजेच्या नेमकी उलटी आहे. या दोन्ही शहरातील नगरसेवकांना स्वकर्तृत्वाबरोबरच नेता, पक्षाचाही आधार घ्यावा लागतो. त्याशिवाय त्यांची डाळ शिजत नाही. म्हणूनच सांगली, कुपवाडमध्ये अनेक दिग्गज नगरसेवकांना घरी बसावे लागले आहे. तसेच मिरजेतून मात्र तीच ती मंडळी वारंवार महापालिकेत निवडून येत आहेत. यामागे त्यांचे काम नाकारून चालणार नाही. जास्तीत जास्त निधी आपल्या प्रभागात खर्च करण्यात ही मंडळी तरबेज आहेत. काँग्रेसमधील दहा नगरसेवकांचा गट पतंगरावांचा आदेश प्रमाण मानत होता. त्यामुळे महापालिकेत काँग्रेस अल्पमतात आली होती. त्यातच मदनभाऊंचे अकाली निधन झाल्याने त्यांच्या गटाचे काय होणार, हा प्रश्न आहेच. मदनभाऊंच्या गटातही सारे काही आलबेल नाही. एकमेकांचा काटा काढण्यात या गटातील नगरसेवकही तरजेब आहेत. त्यातून दोन ते तीन गटही निर्माण झाले आहेत. एकमुखी कारभाराला मदनभाऊंच्या हयातीतच तडा गेला होता. त्यांच्या पश्चात ही दरी आणखी रूंदावण्याची चिन्हे आहेत. आगामी चार महिन्यात महापौर, उपमहापौर निवड होणार आहे. त्यात सर्वात मोठी भूमिका मिरज पॅटर्नची राहणार आहे. एकमेकांना साहाय्य करण्याच्या त्यांच्या भूमिकेमुळे कोणाचा बळी जाणार व कोण पदाची पालखी वाहणार, हे लवकरच कळेल.जयंतरावांचा आधारमदनभाऊ गटाची सत्ता महापालिकेत कायम ठेवायची असेल, तर या गटाला राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील गटाची साथ घ्यावी लागणार आहे. खुद्द जयंतरावांनी, जयश्रीतार्इंच्या भविष्यातील राजकीय निर्णयप्रक्रियेत मी असेन, असे जाहीरपणे सांगितले आहे. त्यात मदनभाऊंशी त्यांचे सूत जुळले होते. जिल्हा बँक, बाजार समितीप्रमाणेच आता महापालिकेतही मदनभाऊ गट व राष्ट्रवादी एकत्र आणण्याची गरज असल्याचे काँग्रेसचेच नगरसेवक जाहीरपणे बोलू लागले आहेत. याबाबतचे चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे. काँग्रेसचे महापालिकेत ४० नगरसेवक असले तरी, जयश्रीतार्इंचा शब्द अंतिम मानणारे किती, याची आकडेमोड सुरू आहे. भविष्यात काही दगाफटका झाला तरी, मदनभाऊ गट व राष्ट्रवादी एकत्र सत्ता काबीज करू शकतात, अशी गणितेही मांडली जात आहेत. दबदबा संपलामहापालिकेच्याच नव्हे, तर जिल्ह्याच्या राजकारणात मदन पाटील यांचा मोठा दबदबा होता. त्यांच्या नजरेचीच धास्ती नगरसेवकांना असायची. फार्महाऊस असो अथवा विजय बंगला, पदासाठी आदळाआपट करणारे नगरसेवक केवळ त्यांनी नजर टाकली तरी शांत होत. महापालिकेत ते निर्णय घेतानाही परिणामांचा विचार करीत नसत. कोणताही निर्णय चुकला तर, तो बिनदिक्कतपणे मागे घेण्याची हिंमतही त्यांच्यात होती. याउलट जयश्रीतार्इंचा स्वभाव आहे. मदनभाऊ आक्रमक होते, तर जयश्रीताई मवाळ आहेत. कार्यकर्त्यांना ताकद देण्याची कसब त्यांच्याकडे आहे. म्हणून आजही मदनभाऊंचा केवळ जयश्रीतार्इंमुळेच टिकून आहे. नगरसेवकांना सातत्याने धाकात ठेवावे लागते. हा धाक कायम ठेवणे जयश्रीतार्इंना कितपत जमेल, हा प्रश्न आहे.