शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तासगावात मंत्र्यांच्या आदेशाला कोलदांडा

By admin | Updated: May 19, 2016 00:25 IST

पाण्यासाठी दाहीदिशा : लोकप्रतिनिधींची हाताची घडी; ‘महावितरण’चे नियमावर बोट

दत्ता पाटील - तासगाव --दोन आठवड्यांपूर्वी मदत व पुनर्वसन राज्यमंत्री दिलीप कांबळे तासगाव तालुक्यात दुष्काळाची पाहणी करण्यास आले होते. त्यावेळी टंचाई संपेपर्यंत प्रादेशिक योजनांचे वीज कनेक्शन तोडण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र महावितरणकडून सोमवारी प्रादेशिकचे वीज कनेक्शन तोडण्यात आले. त्यामुळे मंत्र्यांच्या आदेशालाच प्रशासकीय यंत्रणेकडून कोलदांडा दिल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत जनतेला पाण्यासाठी दाहीदिशा फिरावे लागत असताना, तालुक्यातील लोकप्रतिनिधी मात्र हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून बसल्याचे विदारक चित्र तालुक्यात पाहायला मिळत आहे.तासगाव तालुक्याला यंदा कधी नव्हे एवढ्या भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. तालुक्याचा पश्चिम भाग सधन आणि पाणीदार समजला जातो, तर पूर्व भाग दुष्काळी समजला जातो. अशी परिस्थिती असतानादेखील यावर्षी तासगाव तालुक्याने दुष्काळी तालुक्यांचे रेकॉर्ड मोडीत काढले. खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यांपेक्षाही तासगाव तालुक्यात टँकरची संख्या जास्त आहे. एवढी परिस्थितीच तालुक्यातील दुष्काळाची दाहकता समजण्यास पुरेशी आहे. तालुक्यातील २६ गावे आणि तब्बल १९३ वाड्या-वस्त्या टँकरच्या पिण्याच्या पाण्यावर अवलंबून आहेत. तब्बल ३५ हजार १८२ लोकांना टँकर दारात आल्याशिवाय पिण्यासाठी पाणी नाही, अशी परिस्थिती आहे. एकीकडे वाड्या-वस्त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी टाहो फोडावा लागत असतानाच, शासन आणि प्रशासनाकडून तालुक्यातील जनतेचाही अक्षरश: फुटबॉल झाल्याचा नमुना प्रादेशिक योजनांच्या बाबतीत समोर आला आहे.तासगाव तालुक्यात मणेराजुरी, येळावी, कवठेमहांकाळ-विसापूर आणि पेड या प्रादेशिक योजना आहेत. या योजनांवर तासगाव तालुक्यातील ४०, तर कवठेमहांकाळ तालुक्यातील ११ गावांचे पिण्याच्या पाण्याचे भवितव्य अवलंबून आहे. तब्बल दीड लाख लोकसंख्या प्रादेशिक योजनेवर तरलेली आहे. या योजनेचे मागील अनेक वर्षांचे सुमारे १७ कोटींचे वीज बिल थकीत आहे. मागील काही महिन्यांपासून चालू महिन्याचे वीज बिल भरण्यात यावे, अशी महावितरणकडून भूमिका घेण्यात आली आहे. एप्रिल महिन्यातही मार्च महिन्याच्या थकीत वीज बिलासाठी तीनवेळा वीज कनेक्शन तोडण्यात आले होते. ऐन उन्हाळ्यात वीज पुरवठा खंडित झाल्याने पाणी योजना कोलमडून पडल्या होत्या. दरम्यान, चार मेरोजी मदत व पुनर्वसन राज्यमंत्री दिलीप कांबळे तासगाव तालुक्यात दुष्काळी पाहणी करण्यासाठी आले होते. तालुक्यात भीषण दुष्काळ असणाऱ्या तीन गावांची पाहणी केल्यानंतर राज्यमंत्री कांबळे यांनी तासगावात पंचायत समितीत आढावा बैठक घेतली होती. यावेळी प्रादेशिक योजना आणि वीज बिलाचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावेळी स्वत: मंत्री कांबळे यांनी दुष्काळ हटेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत वीज बिल भरले नाही म्हणून वीज कनेक्शन तोडण्यात येणार नाही, असे स्पष्ट केले होते. किंंबहुना कोणत्याही परिस्थितीत जनतेला विश्वास दाखवून टंचाईशी मुकाबला करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाला केले होते.पण राज्यमंत्री कांबळे यांच्या या आदेशाला पंधरवडा होण्याआधीच वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम प्रशासकीय यंत्रणेने केले. एकीकडे मंत्र्यांचा शाब्दीक दिलासा, तर दुसरीकडे प्रशासनाचे नियमावर बोट, असा जनतेचा फुटबॉल करण्याचे काम करुन दुष्काळग्रस्तांच्या वेदनांची थट्टा करण्याचे काम होत असल्याचे चित्र या घडामोडींवरुन दिसून येत आहे. मुळातच अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे प्रादेशिक योजनांचे नियमित पाणी मिळत नाही. बहुतांश गावांतील स्थानिक पाण्याचे उद्भव कोरडे पडले आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी तालुक्यातील जनतेला टाहो फोडायला लागावा, असे चित्र पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. मात्र अशा परिस्थितीत तालुक्यातील लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्थांतील लोकप्रतिनिधी मात्र ‘हाताची घडी आणि तोंडावर बोट’ ठेवून आहेत.जिल्ह्यात सध्या तीव्र टंचाईची स्थिती आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे प्रादेशिक योजनांचा वीज पुरवठा खंडित करु नये, असे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सांगितले होते. तरीदेखील महावितरणकडून वीज कनेक्शन तोडून दुष्काळी जनतेची क्रूर थट्टा केली आहे. जिल्ह्यातून लातूरला पाणी दिले जाते, मात्र तालुक्यातील जनतेला पाणी देण्यासाठी शासनाकडून कोणतीही मदत दिली जात नाही. तालुक्यात दुष्काळ असतानादेखील पाणी योजनांसाठी कोणताही निधी दिला जात नाही. शासनाकडून जाणीवपूर्वक त्रास देण्याची भूमिका घेतली जात आहे.- स्वाती लांडगे, सभापती, पंचायत समिती, तासगाव.मंत्र्यांचे आदेश : केवळ सोपस्कार? राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार ‘तालुका तिथे मंत्री’ या संकल्पानुसार तासगाव तालुक्यात आल्याचे स्पष्ट केले होते. दुष्काळी जनतेसोबत शासन असल्याचे सांगण्यासाठीच मी इथे आलो आहे, दुष्काळग्रस्तांना एकटे पडू देणार नसल्याचे त्यांनी आढावा बैठकीत स्पष्ट केले होते. यावेळी त्यांनी दिलेल्या अनेक आश्वासनांपैकी वीज पुरवठा खंडित होणार नसल्याचे एक आश्वासन होते. त्यांच्या आश्वासनानंतर काही दिवसांनी तालुक्यात प्रशासकीय पातळीवर दुष्काळ जाहीर झाला. मात्र त्यानंतरही मंत्र्यांचे आदेश केवळ सोपस्कार ठरल्याचे चित्र महावितरणच्या कारभारानंतर पाहायला मिळाले.