शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

मुख्यमंत्र्यांकडून आमदारांना मंत्रिपदाचे फक्त गाजर

By admin | Updated: February 18, 2017 00:05 IST

मानसिंगराव नाईक : काँग्रेस, राष्ट्रवादीची पाडळीत सभा; भाजप सरकारवर जोरदार टीका

शिराळा : येथील भाजपच्या आमदारांना एकाही जागेवर विजय मिळणार नाही, याची माहिती मिळाल्यानेच मुख्यमंत्र्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीवर सत्ता मिळवा, तुम्हाला मंत्रीपद देतो, असे गाजर दाखविले आहे, असे प्रतिपादन माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले. पाडळी (ता. शिराळा) येथे काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचे वाकुर्डे बुद्रुक जिल्हा परिषद गटाचे उमेदवार आशा झिमूर व पंचायत समितीच्या पाचुंब्री गणाचे उमेदवार पौर्णिमा मोरे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. माजी आ. मानसिंगराव नाईक, व ‘विराज’चे उपाध्यक्ष अशोकराव पाटील प्रमुख उपस्थित होते. माजी आमदार नाईक म्हणाले, समविचारी पक्ष म्हणूनच पाच वर्षांपूर्वी काँग्रेस व राष्ट्रवादीने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आघाडी केली, ती आजही कायम आहे. पाच वर्षांत अत्यंत पारदर्शक कारभार केला आहे. सार्वजनिक व वैयक्तिक लाभाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली आहे. विरोधक मात्र सर्व वेळ राजकारण करत असल्याने त्यांना टीका करणे, दुसऱ्यांच्या कामांचे श्रेय लाटणे यापेक्षा दुसरा उद्योग नाही. सरचिटणीस देशमुख म्हणाले, दुष्काळाबाबत शिराळा तालुक्यातील ५४ गावांवर भाजपकडून अन्याय झाला आहे. ही गावे दुष्काळात होरपळत असताना येथील भाजपचे लोकप्रतिनिधी मंत्रिपदाची लॉटरी लागते का? यात मश्गुल होते. टेंभू, म्हैसाळ योजनांसारखी वाकुर्डे योजनेच्याही वीज बिलात शेतकऱ्यांना सूट का दिली जात नाही? चंद्रकांत पाटील यांनी प्रास्ताविक केले. नारायण चव्हाण, विजय झिमूर, विजयराव नलवडे, विराज नाईक, के. डी. पाटील, आशाताई झिमूर व पौर्णिमा मोरे यांचे मनोगत झाले. बाळासाहेब पाटील, विश्वास पाटील, प्रमिला पाटील, राजाराम मोरे, तानाजी कुंभार, भानुदास पाटील, रूपाली पाटील, अशोक पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)पाडळी (ता. शिराळा) येथे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचार सभेत बोलताना माजी आमदार मानसिंंगराव नाईक. यावेळी सत्यजित देशमुख, अशोकराव पाटील उपस्थित होते.