शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
4
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
5
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
6
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
7
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
8
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
9
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
10
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
11
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
12
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
13
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
14
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
15
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
16
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
17
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
18
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
19
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”

मिंच्याच्या खूनप्रकरणी आणखी दोघे अटकेत

By admin | Updated: September 22, 2016 01:00 IST

एलसीबीची कारवाई : सहाजणांचा सहभाग स्पष्ट

सांगली : येथील गवळी गल्लीतील मिलिंद ऊर्फ मिंच्या गवळी खून प्रकरणात आणखी दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी) विभागाने अटक केली. या दोघांकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. मिंच्याचा खून सहाजणांनी केल्याचे तपासात पुढे आले असून, आतापर्यंत पाचजणांना अटक केली आहे. पिस्तूल देणाऱ्यासही लवकरच अटक केली जाईल, असे जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत सांगितले अटक केलेल्यांत संजय अण्णाप्पा व्होसमणी (वय २७), अतुल ऊर्फ बाबू संजय पाटील (२३, दोघेही रा. सांगलीवाडी) या दोघांचा समावेश आहे. या दोघांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता, २६ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. गेल्या आठवड्यात गवळीच्या खुनाचे प्रकरण उघडकीस आले होते. याप्रकरणी राहुल भोसले, सिद्धार्थ चिपरीकर (दोघे रा. सांगलीवाडी), भागवत मधुकर पाटील (रा. कवठेपिरान) या तिघांना अटक केली आहे. त्यानंतर तपास पुढे सरकलाच नाही. यामध्ये आणखी तीन ते चार जणांचा सहभाग असण्याची शक्यता होती. शहर पोलिसांचा तपास संथगतीने सुरु असल्याचे लक्षात येताच पोलिसप्रमुख शिंदे यांनी हा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक बाजीराव पाटील व त्यांच्या पथकाने अटकेतील तीन संशयितांची कसून चौकशी केली. कोणत्या कारणासाठी मिंच्याचा खून झाला, त्यासाठी कोणती वाहने वापरण्यात आली. संशयितांनी त्याला कोणत्या मार्गाने नेले, याचा तपास करण्यात आला. पोलिसी खाक्या दाखविताच संशयितांनी या गुन्ह्णात मदत केलेल्या आणखी दोघांची नावे सांगितले. त्यानुसार पथकाने संजय व्होसमणी व अतुल पाटील या दोघांना अटक केली. आतापर्यंत या खुनात अटक केलेल्यांची संख्या पाच झाली आहे. आणखी एकाचा सहभागही उघड झाला असून त्यालाही लवकरच अटक केली जाणार आहे. या कारवाईत पोलिस निरीक्षक बाजीराव पाटील, सहाय्यक निरीक्षक अमितकुमार पाटील, हवालदार सागर पाटील, संदीप मोरे, अमित परीट, मुघराज रूपनर, मारुती सूर्यवंशी, महादेव नागणे, रवी पाटील, सुनील भिसे, महेश आवळे, शंकर पाटील यांनी भाग घेतला. -------------- खुनामागे आर्थिक वादाचे कारण मिंच्या गवळीचा खून आर्थिक वादातून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मुख्य संशयित राहुल भोसले याच्या सासऱ्याची कोल्हापूर रस्त्यावरील आकाशवाणी केंद्राजवळ सव्वा एकर शेती आहे. या शेतीचा व्यवहार मिंच्या गवळी याच्यासोबत झाला होता. मिंच्याने त्यासाठी भागवत पाटील याच्याकडे १५ लाख रुपये दिले होते, पण नंतर हा व्यवहार पूर्ण झाला नाही. मिंच्याने भोसले व पाटील यांच्याकडे पैसे परत देण्यासाठी तगादा लावला होता. शिवाय भरपाईपोटी तो जादा रकमेची मागणी करीत होता. या वादातून त्याचा खून करण्यात आल्याचे पोलिसप्रमुख शिंदे यांनी सांगितले. ----------------- मोबाईलचा शोध घेणार : शिंदे संशयितांनी मिंच्याचा मोबाईल कृष्णा नदीत फेकला आहे. त्याचा शोध घेण्यात आला. सिंधुदुर्गवरून त्यासाठी स्कुबा ड्रायव्हरही मागविण्यात आले, पण नदीतील पाण्याची पातळी वाढल्याने मोबाईलचा शोध थांबविण्यात होता. आता नदीतील पाणी कमी झाल्यानंतर पुन्हा मोबाईलचा शोध घेतला जाईल. दरम्यान, नदीपात्रात सापडलेली हाडे व मिंच्याच्या नातेवाईक यांचे डीएनए तपासणीसाठी पाठविले आहेत. त्याचा अहवालही या खून प्रकरणात महत्त्वाचा आहे. या खूनप्रकरणी कुणाची गय केली जाणार नाही, असे जिल्हा पोलिसप्रमुख शिंदे यांनी स्पष्ट केले. पिस्तूल कोणाचे? मिंच्याच्या खुनात वापरलेले पिस्तूल कोणाचे होते? ते कोणी दिले? याचा एलसीबीकडून शोध सुरू आहे. यापूर्वी शहर पोलिसांनी हे पिस्तूल मिंच्याचे असल्याचे स्पष्ट केले होते, पण याप्रकरणी संशयितांकडून पोलिसांची दिशाभूल केली जात आहे. दरम्यान, संशयितांची कसून चौकशी केल्यानंतर संबंधित पिस्तूल देणाऱ्याचे नाव तपासात पुढे आले आहे. लवकरच त्यालाही अटक केली जाईल.