शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
2
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
3
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे
4
“रमी प्रकरणाची सखोल चौकशी आवश्यक, पण माणिकराव कोकाटे...”; सुनील तटकरे स्पष्टच बोलले
5
उत्तर प्रदेशवाले काय करतील याचा नेम नाही! बनावट दूतावास उभारले, ४४ लाखांसह राजनैतिक वाहने जप्त; नेमकं प्रकरण काय?
6
"उत्तर गाझा विलीन करणार, तेथे ज्यूंना वसवणार अन् पॅलेस्टिनींना...!" असा आहे इस्रायलचा 'खतरनाक' इरादा!
7
आधी iPhone ला खेळणं म्हटलं! हळू हळू ढासळत गेलं Blackberry चं साम्राज्य; वाचा पतनाची संपूर्ण कहाणी
8
सुरज चव्हाण अखेर सापडला; छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी घेतलं ताब्यात
9
सोन्या-चांदीच्या दरात जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा खिशाला किती कात्री लागणार, काय आहेत नवे दर?
10
निवडणूक आयोगाने सुरू केली उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तयारी; लवकरच तारीख जाहीर होणार
11
"ट्रम्प २५ वेळा युद्ध थांबवल्याचे म्हणाले, पण PM मोदी एकदाही...;" शस्त्रसंधीवरून राहुल गांधींनी सरकारला घेरले
12
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: दीप पूजनाचे महत्त्व काय? वाचा, भारतीय संस्कारांचे महात्म्य
13
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
14
देवेंद्र फडणवीसांसाठी आम्ही बाजीप्रभुंसारखं लढायला तयार; गोपीचंद पडळकर काय बोलले?
15
"मी खूप सुंदर आणि तू..."; लग्नानंतर नवऱ्याने कष्टाने बायकोला शिकवलं, आता तिनेच दिली धमकी
16
गणेशोत्सव मंडळांच्या मोठ्या मूर्तीचे विसर्जन समुद्रात करणार; सरकारचे कोर्टात प्रतिज्ञापत्र
17
शाहीद कपूरचा 'छत्रपती शिवाजी महाराज' सिनेमा बंद पडला, दिग्दर्शकाने सिस्टीमला ठरवलं 'क्रूर'
18
दौंडच्या कलाकेंद्रात गोळीबार झाल्याची चर्चा; पोलिसांनी चौकशीअंती दावा फेटाळला, पण राजकारणाला वेग आला!
19
एक फोन कॉल, ज्येष्ठ मंत्र्यांशी वाद अन् तयार झाली जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याची स्क्रिप्ट?
20
लाच घेताना व्हिडीओ बनवायला सुरुवात केली, मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न; मुंबईतील ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल

मिंच्याच्या खूनप्रकरणी आणखी दोघे अटकेत

By admin | Updated: September 22, 2016 01:00 IST

एलसीबीची कारवाई : सहाजणांचा सहभाग स्पष्ट

सांगली : येथील गवळी गल्लीतील मिलिंद ऊर्फ मिंच्या गवळी खून प्रकरणात आणखी दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी) विभागाने अटक केली. या दोघांकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. मिंच्याचा खून सहाजणांनी केल्याचे तपासात पुढे आले असून, आतापर्यंत पाचजणांना अटक केली आहे. पिस्तूल देणाऱ्यासही लवकरच अटक केली जाईल, असे जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत सांगितले अटक केलेल्यांत संजय अण्णाप्पा व्होसमणी (वय २७), अतुल ऊर्फ बाबू संजय पाटील (२३, दोघेही रा. सांगलीवाडी) या दोघांचा समावेश आहे. या दोघांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता, २६ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. गेल्या आठवड्यात गवळीच्या खुनाचे प्रकरण उघडकीस आले होते. याप्रकरणी राहुल भोसले, सिद्धार्थ चिपरीकर (दोघे रा. सांगलीवाडी), भागवत मधुकर पाटील (रा. कवठेपिरान) या तिघांना अटक केली आहे. त्यानंतर तपास पुढे सरकलाच नाही. यामध्ये आणखी तीन ते चार जणांचा सहभाग असण्याची शक्यता होती. शहर पोलिसांचा तपास संथगतीने सुरु असल्याचे लक्षात येताच पोलिसप्रमुख शिंदे यांनी हा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक बाजीराव पाटील व त्यांच्या पथकाने अटकेतील तीन संशयितांची कसून चौकशी केली. कोणत्या कारणासाठी मिंच्याचा खून झाला, त्यासाठी कोणती वाहने वापरण्यात आली. संशयितांनी त्याला कोणत्या मार्गाने नेले, याचा तपास करण्यात आला. पोलिसी खाक्या दाखविताच संशयितांनी या गुन्ह्णात मदत केलेल्या आणखी दोघांची नावे सांगितले. त्यानुसार पथकाने संजय व्होसमणी व अतुल पाटील या दोघांना अटक केली. आतापर्यंत या खुनात अटक केलेल्यांची संख्या पाच झाली आहे. आणखी एकाचा सहभागही उघड झाला असून त्यालाही लवकरच अटक केली जाणार आहे. या कारवाईत पोलिस निरीक्षक बाजीराव पाटील, सहाय्यक निरीक्षक अमितकुमार पाटील, हवालदार सागर पाटील, संदीप मोरे, अमित परीट, मुघराज रूपनर, मारुती सूर्यवंशी, महादेव नागणे, रवी पाटील, सुनील भिसे, महेश आवळे, शंकर पाटील यांनी भाग घेतला. -------------- खुनामागे आर्थिक वादाचे कारण मिंच्या गवळीचा खून आर्थिक वादातून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मुख्य संशयित राहुल भोसले याच्या सासऱ्याची कोल्हापूर रस्त्यावरील आकाशवाणी केंद्राजवळ सव्वा एकर शेती आहे. या शेतीचा व्यवहार मिंच्या गवळी याच्यासोबत झाला होता. मिंच्याने त्यासाठी भागवत पाटील याच्याकडे १५ लाख रुपये दिले होते, पण नंतर हा व्यवहार पूर्ण झाला नाही. मिंच्याने भोसले व पाटील यांच्याकडे पैसे परत देण्यासाठी तगादा लावला होता. शिवाय भरपाईपोटी तो जादा रकमेची मागणी करीत होता. या वादातून त्याचा खून करण्यात आल्याचे पोलिसप्रमुख शिंदे यांनी सांगितले. ----------------- मोबाईलचा शोध घेणार : शिंदे संशयितांनी मिंच्याचा मोबाईल कृष्णा नदीत फेकला आहे. त्याचा शोध घेण्यात आला. सिंधुदुर्गवरून त्यासाठी स्कुबा ड्रायव्हरही मागविण्यात आले, पण नदीतील पाण्याची पातळी वाढल्याने मोबाईलचा शोध थांबविण्यात होता. आता नदीतील पाणी कमी झाल्यानंतर पुन्हा मोबाईलचा शोध घेतला जाईल. दरम्यान, नदीपात्रात सापडलेली हाडे व मिंच्याच्या नातेवाईक यांचे डीएनए तपासणीसाठी पाठविले आहेत. त्याचा अहवालही या खून प्रकरणात महत्त्वाचा आहे. या खूनप्रकरणी कुणाची गय केली जाणार नाही, असे जिल्हा पोलिसप्रमुख शिंदे यांनी स्पष्ट केले. पिस्तूल कोणाचे? मिंच्याच्या खुनात वापरलेले पिस्तूल कोणाचे होते? ते कोणी दिले? याचा एलसीबीकडून शोध सुरू आहे. यापूर्वी शहर पोलिसांनी हे पिस्तूल मिंच्याचे असल्याचे स्पष्ट केले होते, पण याप्रकरणी संशयितांकडून पोलिसांची दिशाभूल केली जात आहे. दरम्यान, संशयितांची कसून चौकशी केल्यानंतर संबंधित पिस्तूल देणाऱ्याचे नाव तपासात पुढे आले आहे. लवकरच त्यालाही अटक केली जाईल.