शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

औषध खरेदीत लाखोंचा घोटाळा

By admin | Updated: May 31, 2016 00:28 IST

नगरसेवकांचा आरोप : प्रभाग बैठकीत आरोग्य विभाग धारेवर

सांगली : महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून डासप्रतिबंधक व इतर औषध खरेदीत लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप सोमवारी प्रभाग समिती दोनच्या बैठकीत करण्यात आला. पाचशे रुपयाला पाच लिटरचे औषध दीड हजार रुपयांनी खरेदी केले जात असल्याचे नगरसेवकांनी निदर्शनास आणून दिले. सभापती मृणाल पाटील यांनी औषध खरेदीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. प्रभाग समिती क्रमांक दोनची बैठक सभापती मृणाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. तब्बल सात महिन्यानंतर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत सर्वपक्षीय नगरसेवकांनी आरोग्य विभागाच्या कारभाराचे वाभाडे काढले. डास व इतर औषधांवर महापालिकेकडून लाखो रुपये खर्च केले जात आहेत. बाजारात ही औषधे साडेचारशे ते साडेपाचशे रुपयांना येतात. महापालिकेकडून हीच औषधे दीड हजार रुपयांना खरेदी केली जात आहेत, असे नगरसेवक युवराज गायकवाड, राजू गवळी यांनी सांगितले. औषध खरेदीत लाखो रुपयांचा चुना लावला जात असून, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. सभापती पाटील यांनी अखेर आरोग्य विभागाला चौकशीचे आदेश दिले आहेत. सुलभ शौचालये, सार्वजनिक शौचालयांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी पालिकेकडून दरवर्षी अ‍ॅसिड खरेदी केले जाते. पण गेल्या काही वर्षापासून पालिकेने अ‍ॅसिडच खरेदी केलेले नाही. त्यामुळे शौचालये निर्जंतुकीकरण न झाल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर झाल्याचा आरोपही नगरसेवकांनी केला. प्रभाग समिती दोनच्या कार्यक्षेत्रात मोकाट कुत्री व डुकरांवर कारवाई केली जात नाही. अनेक हॉटेल व चिकन सेंटरकडे महापालिकेचा परवानाच नाही. बेकायदा सेंटरमधील वेस्टेज कचरा कुंडीत टाकला जात आहे. त्यामुळे कुत्र्यांची संख्या वाढली आहेत. याप्रकरणी आरोग्य विभाग झोपेचे सोंग घेत असल्याचा आरोपही करण्यात आला. प्रभाग समितीकडे नवीन २५ व दुरुस्त केलेले २२ अशी ४७ कंटेनर देण्यात आल्याचा दावा करण्यात आला. पण नगरसेवकांनी आरोग्य विभागाचा दावा फेटाळत प्रभाग समिती कार्यक्षेत्रात अपुरे कंटेनर असल्याचे सांगितले. त्यावर सभापती पाटील यांनी नवीन व दुरुस्त केलेले ४७ कंटेनरची स्थळनिहाय यादी सादर करण्याचे आदेश दिले. प्रभागात १२५ कंटेनर आहेत. त्यापैकी ४५ कंटेनरमधीलच कचरा उचलला जातो. इतर कंटेनरमधील कचरा तसाच पडून असतो. गटारीतील गाळ भरण्यासाठी गाड्यांची कमतरता आहे. गाळ भरण्यासाठी घंटागाडीचा वापर केला जात आहे. त्यामुळे घंटागाड्या खराब होत असल्याचे सदस्यांनी निदर्शनास आणून दिले. (प्रतिनिधी)कर्मचाऱ्यांच्या पगारावर डल्ला--नगरसेवक युवराज गायकवाड यांनी अमरधाम स्मशानभूमीत अपुरे कर्मचारी असल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित केला. स्मशानभूमीत कर्मचारी कमी असल्याने स्वच्छता होत नाही. नागरिकांनाही सेवा दिली जात नाही. पालिकेच्या रेकॉर्डवर दहा कर्मचाऱ्यांची स्मशानभूमीत नियुक्ती आहे. पण केवळ तीनच कर्मचारी कामावर असतात. आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सात कर्मचाऱ्यांचा पगार लाटला जात असल्याचा आरोपही गायकवाड यांनी केला.