शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

नियोजनाअभावी म्हैसाळ पाणी योजनेचे कार्यक्षेत्र कोरडे

By admin | Updated: March 16, 2016 08:29 IST

बेभरवशाच्या म्हैसाळ प्रकल्पावर आर्थिक हमीची शेतकऱ्यांना कोणतीही पिके घेता येत नसल्याने बागायती जमिनी मोकळ्याच राहिल्या आहेत.

नरवाड : म्हैसाळ प्रकल्पाच्या नियोजनासाठी शेतीस पाणी उपलब्ध होऊनही जमिनी कोरड्याच पडल्या आहेत.कृष्णा खोरे महामंडळाच्या म्हैसाळ प्रकल्पाची मुहूर्तमेढ १९८४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी रोवली. यानंतर टप्प्याटप्प्याने कृष्णा नदीपासून कवठेमहांकाळपर्यंत ६ टप्प्याने पाण्याची व्यवस्था करण्यात आली. म्हैसाळ प्रकल्पाच्या कार्यक्षेत्राखाली मिरज पूर्व भाग व कवठेमहांकाळ तालुका येतो. अवघ्या ९ कोटी १५ लाख रुपये मंजुरीच्या म्हैसाळ प्रकल्पाच्या योजनेवर वेळोवेळच्या दिरंगाईमुळे १ हजार कोटींचा आकडा पार झाला. तरीही योजना अपूर्णच राहिली आहे. दरम्यानच्या कालावधित म्हैसाळ प्रकल्पाची आवर्तने झाली. आजवरच्या आवर्तनांमध्ये एकही आवर्तन हंगामनिहाय सुरू झाले नाही. पाटबंधारे खात्याकडे म्हैसाळ प्रकल्पाचे कोणतेही नियोजन नसल्याने रब्बी आणि खरीप हंगामात शेतकऱ्यांना वेळोवेळी पाणी मिळाले नाही. परिणामी योजनेवरील विद्युत बिलांची थकित बाकी वाढत गेली. सद्य स्थितीत सुरू झालेले ४५ दिवसांचे आवर्तन गेल्या २ महिन्यांपूर्वीच चालू होणे गरजेचे होते. मात्र तसे न होता पिके वाळून गेल्यावरच आवर्तन सुरू झाल्याने पिकांना पाणी उपलब्ध होऊनही जमिनी कोरड्याच राहिल्या आहेत. बेभरवशाच्या म्हैसाळ प्रकल्पावर आर्थिक हमीची शेतकऱ्यांना कोणतीही पिके घेता येत नसल्याने बागायती जमिनी मोकळ्याच राहिल्या आहेत.चालू आवर्तनात ऊस, केळी, हळद यासारख्या नगदी पिकांची शेतकरी लागवड करण्यास तयार आहेत. मात्र भविष्यात आवर्तन सुरू होण्याची कोणतीही खात्री पाटबंधारे खाते देत नसल्याने पाणी उपलब्ध होऊनही जमिनी कोरड्याच सोडाव्या लागत आहेत. (वार्ताहर)