शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
5
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
6
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
7
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
8
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
9
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
10
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
11
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
12
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
13
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
14
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
15
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
16
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
17
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
18
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
19
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
20
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे

जैन तत्त्वज्ञानात मानवकल्याणाचा संदेश : राजनाथ सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 03:07 IST

जैन धर्म हा विज्ञाननिष्ठ धर्म आहे. या धर्माने जगाला अहिंसा, शांती, त्यागाचा संदेश दिला. जैन तत्त्वज्ञानाचे मूलतत्त्वच मानवकल्याण आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी श्रवणबेळगोळ येथे केले.

सांगली : जैन धर्म हा विज्ञाननिष्ठ धर्म आहे. या धर्माने जगाला अहिंसा, शांती, त्यागाचा संदेश दिला. जैन तत्त्वज्ञानाचे मूलतत्त्वच मानवकल्याण आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी श्रवणबेळगोळ येथे केले.श्रवणबेळगोळ (कर्नाटक) येथील भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक महोत्सवाच्या नवव्या दिवशी राजनाथ सिंह यांनी उपस्थिती लावली. त्यांच्या हस्ते धर्मध्वजाचे उद््घाटन करण्यात आले. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार, खा. अजय संचेती, आ. एम. ए. गोपाळस्वामी, कर्नाटक सरकारने स्थापन केलेल्या महामस्तकाभिषेक महोत्सव समितीचे सहअध्यक्ष के. अभयचंद्र जैन उपस्थित होते. चारुकीर्ती भट्टारक स्वामी यांच्याहस्ते चांदीचा कलश देऊन राजनाथ सिंह यांचा सत्कार करण्यात आला. राजनाथ सिंह म्हणाले की, भारतीय संस्कृतीतील जैन धर्म हा अनमोल रत्न आहे. आज जगात सर्वत्र स्पर्धा, हिंसेचे वातावरण आहे. त्यातून जैन धर्माचे तत्त्वज्ञानच जगाची सुटका करेल. जैन धर्माने मानव कल्याणाचा विचार ठेवला आहे. अहिंसा, शांती, त्याग ही तत्त्वेच जैन धर्माचा पाया आहेत. हा धर्म पूर्णपणे विज्ञाननिष्ठ आहे. भगवान बाहुबलींनीही शांती, सदभावनेचा संदेश दिला होता. सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य आहे, असेही त्यांनी सांगितले.श्रवणबेळगोळला अहिंसा क्षेत्र घोषित करा - वर्धमानसागरश्रवणबेळगोळ येथून भगवान बाहुबलींच्या अहिंसा, त्याग या संदेशाचा प्रसार जगभर होत आहे. त्यामुळे श्रवणबेळगोळला अहिंसा क्षेत्र म्हणून घोषित करावे. भगवान महावीर यांची जन्मभूमी असलेल्या वैशाली (बिहार) येथील जैन मंदिरातून त्यांची मूर्ती चोरीला गेली आहे. त्याचाही शोध घ्यावा, अशी मागणी आचार्य वर्धमानसागर महाराज यांनी राजनाथ सिंह यांच्याकडे केली.चारुकीर्ती महाराज यांनी ताजमहालप्रमाणे भगवान बाहुबलींच्या मूर्तीलाही केंद्र शासनाने संरक्षण पुरवावे, अशी मागणी केली. या मागण्यांवर निश्चित विचार करण्याची ग्वाही राजनाथ सिंह यांनी दिली.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंह