शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

जैन तत्त्वज्ञानात मानवकल्याणाचा संदेश : राजनाथ सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 03:07 IST

जैन धर्म हा विज्ञाननिष्ठ धर्म आहे. या धर्माने जगाला अहिंसा, शांती, त्यागाचा संदेश दिला. जैन तत्त्वज्ञानाचे मूलतत्त्वच मानवकल्याण आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी श्रवणबेळगोळ येथे केले.

सांगली : जैन धर्म हा विज्ञाननिष्ठ धर्म आहे. या धर्माने जगाला अहिंसा, शांती, त्यागाचा संदेश दिला. जैन तत्त्वज्ञानाचे मूलतत्त्वच मानवकल्याण आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी श्रवणबेळगोळ येथे केले.श्रवणबेळगोळ (कर्नाटक) येथील भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक महोत्सवाच्या नवव्या दिवशी राजनाथ सिंह यांनी उपस्थिती लावली. त्यांच्या हस्ते धर्मध्वजाचे उद््घाटन करण्यात आले. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार, खा. अजय संचेती, आ. एम. ए. गोपाळस्वामी, कर्नाटक सरकारने स्थापन केलेल्या महामस्तकाभिषेक महोत्सव समितीचे सहअध्यक्ष के. अभयचंद्र जैन उपस्थित होते. चारुकीर्ती भट्टारक स्वामी यांच्याहस्ते चांदीचा कलश देऊन राजनाथ सिंह यांचा सत्कार करण्यात आला. राजनाथ सिंह म्हणाले की, भारतीय संस्कृतीतील जैन धर्म हा अनमोल रत्न आहे. आज जगात सर्वत्र स्पर्धा, हिंसेचे वातावरण आहे. त्यातून जैन धर्माचे तत्त्वज्ञानच जगाची सुटका करेल. जैन धर्माने मानव कल्याणाचा विचार ठेवला आहे. अहिंसा, शांती, त्याग ही तत्त्वेच जैन धर्माचा पाया आहेत. हा धर्म पूर्णपणे विज्ञाननिष्ठ आहे. भगवान बाहुबलींनीही शांती, सदभावनेचा संदेश दिला होता. सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य आहे, असेही त्यांनी सांगितले.श्रवणबेळगोळला अहिंसा क्षेत्र घोषित करा - वर्धमानसागरश्रवणबेळगोळ येथून भगवान बाहुबलींच्या अहिंसा, त्याग या संदेशाचा प्रसार जगभर होत आहे. त्यामुळे श्रवणबेळगोळला अहिंसा क्षेत्र म्हणून घोषित करावे. भगवान महावीर यांची जन्मभूमी असलेल्या वैशाली (बिहार) येथील जैन मंदिरातून त्यांची मूर्ती चोरीला गेली आहे. त्याचाही शोध घ्यावा, अशी मागणी आचार्य वर्धमानसागर महाराज यांनी राजनाथ सिंह यांच्याकडे केली.चारुकीर्ती महाराज यांनी ताजमहालप्रमाणे भगवान बाहुबलींच्या मूर्तीलाही केंद्र शासनाने संरक्षण पुरवावे, अशी मागणी केली. या मागण्यांवर निश्चित विचार करण्याची ग्वाही राजनाथ सिंह यांनी दिली.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंह