शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
4
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
5
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
6
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
7
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
8
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
9
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
10
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
11
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
12
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
13
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
14
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
15
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
17
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
19
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
20
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  

सांगलीत शाही थाटात संस्थानच्या गणपतीला निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 19:19 IST

सांगली : पावसाच्या रिमझिम सरींबरोबरच भाविकांच्या उत्साहवर्षावात रंगलेली रथयात्रा... ढोल-ताशे, लेझीम, बॅन्ड आणि वाद्यवृंदाचा ताल... भगवे फेटे, भगवे झेंडे आणि ह्यगणपतीबाप्पा मोरयाऽऽह्णचा जयघोष... अशा भक्तिमय वातावरणात सांगलीच्या संस्थान गणपतीला मंगळवारी शाही थाटात निरोप देण्यात आला. 

ठळक मुद्देश्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांच्याहस्ते दरबार हॉलमध्ये श्रींची आरतीपावसाच्या रिमझिम सरींबरोबरच भाविकांच्या उत्सावात रथयात्रा...उत्सवमूर्तीवर पेढे, फुले, गूळ, खोबरे, खजूर व प्रसादाची उधळण

सांगली : पावसाच्या रिमझिम सरींबरोबरच भाविकांच्या उत्साह वर्षावात रंगलेली रथयात्रा... ढोल-ताशे, लेझीम, बॅन्ड आणि वाद्यवृंदाचा ताल... भगवे फेटे, भगवे झेंडे आणि गणपतीबाप्पा मोरयाऽऽचा जयघोष... अशा भक्तिमय वातावरणात सांगलीच्या संस्थान गणपतीला मंगळवारी शाही थाटात निरोप देण्यात आला. 

श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांच्याहस्ते दुपारी तीन वाजता राजवाडा परिसरातील दरबार हॉलमध्ये श्रींची आरती करण्यात आली. श्रींची विधिवत पूजा झाल्यानंतर दरबार हॉलमध्ये पान-सुपारीचा कार्यक्रम पार पडला.

यावेळी अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन, हिमालयराजे, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील, शेखर माने, बजरंग पाटील, अनिल पाटील-सावर्डेकर, समित कदम उपस्थित होते. पान-सुपारीनंतर मिरवणुकीला प्रारंभ झाला. मिरवणुकीत घोडेस्वार, भालदार, चोपदार, तसेच ढोल-ताशा व ध्वजपथक, मुलींचे लेझीम पथक, हलगी पथक, सनई-चौघडा यासह गंधर्व बँड सहभागी झाला होता. रथयात्रेचा मार्ग रांगोळ्यांनी रेखाटला होता.

दुपारी सव्वाचारला रथयात्रा राजवाडा चौकात आली. तेथे काहीकाळ ती थांबविण्यात आली. त्यानंतर पटेल चौक, गणपती पेठ मार्गे मिरवणूक गणपती मंदिर येथे आल्यानंतर श्रींची आरती करण्यात आली. मिरवणुकीच्या दुतर्फा सांगलीकरांसह ग्रामीण भागातून व कर्नाटकातूनही मोठ्या प्रमाणात आलेल्या भाविकांनी गर्दी केली होती. उत्सवमूर्तीवर भाविकांकडून पेढे, फुले, गूळ, खोबरे, खजूर व प्रसादाची उधळण करण्यात येत होती.

गणपती मंदिरासमोर मिरवणूक आल्यानंतर भाविकांनी मोठा जयघोष केला. त्यानंतर टिळक चौकमार्गे मिरवणूक सायंकाळी सरकारी घाटावर पोहोचली. मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून गणपती बाप्पा मोरयाऽऽ, पुढच्यावर्षी लवकर याऽऽ अशा जयघोषात श्रींची मूर्ती सजविलेल्या होडीतून कृष्णा नदीच्या पात्रात मध्यावर नेऊन मूर्तीचे विधिवत विसर्जन करण्यात आले.पावसाचे आगमन

रथयात्रा राजवाडा चौकात आल्यानंतर पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. त्यामुळे भाविकांची धावपळ झाली. मिरवणुकीतील पथकांनी मात्र जागा सोडली नाही. भाविकांनी भर पावसात भिजत मिरवणुकीचा काहींनी लुटला. दहा मिनिटे पाऊस सुरू होता.