शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

दुकाने उघडण्यावरून व्यापाऱ्यांत फाटाफूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:17 IST

सांगली : शहरातील दुकाने गुरुवारपासून सुरू करण्याची घोषणा व्यापारी संघटनेने केली होती. त्याला काही संघटनांनी विरोध केला. त्यात व्यापाऱ्यांनी ...

सांगली : शहरातील दुकाने गुरुवारपासून सुरू करण्याची घोषणा व्यापारी संघटनेने केली होती. त्याला काही संघटनांनी विरोध केला. त्यात व्यापाऱ्यांनी दुकाने उघडताच महापालिका व पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. त्यामुळे गुरुवारी बाजारपेठेत काहीकाळ तणावाची स्थिती होती. यानिमित्ताने व्यापारी संघटनांतील मतभेद समोर आले.

कोरोनामुळे गेले तीन महिने शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने बंद आहेत. मध्यंतरी दहा दिवस दुकाने उघडली होती. त्यानंतर पुन्हा शटर डाऊन करण्यात आले. शहरातील कोरोना पाॅझिटिव्हिटी दर कमी असल्याने दुकाने सुरू करण्यास मुभा द्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांतून होत आहे. पण त्यातही प्रशासनाकडून लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन होणार नाही, यावर व्यापारी संघटनांचे एकमत आहे.

सांगली, मिरज आणि कुपवाड व्यापारी महासंघाने गुरुवारपासून दुकाने उघडणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे सकाळपासूनच बाजारपेठेत वर्दळ वाढली होती. काही व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली, पण पोलीस व महापालिकेच्या पथकाने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला. त्यातून प्रशासन व व्यापाऱ्यांत वादही झाला. राष्ट्रवादीचे नेते माजी नगरसेवक शेखर माने यांनी व्यापाऱ्यांची समजूत काढून दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. तसेच पोलिसांनाही कारवाई करू नये, यासाठी शिष्टाई केली.

दरम्यान, व्यापारी एकता असोसिएशननेही दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. संघटनेशी संलग्न व्यापाऱ्यांचा या निर्णयाशी संबंध नसल्याचे अध्यक्ष समीर शहा यांनी सांगितले. त्यामुळे दुकाने सुरू करण्यावरून व्यापाऱ्यांत मतभेद असल्याचे दिसून आले.

चौकट

दुकाने उघडण्याचा मेसेज चुकीचा : समीर शहा

शहरातील दुकाने उघडण्याचा संदेश चुकीचा असून त्याच्याशी व्यापारी एकता असोसिएशनचा संबंध नाही. गेल्या आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. यात १२ जुलैपर्यंत जिल्हा तिसऱ्या स्तरात आणून दुकाने उघडण्यास परवानगी देण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. त्यामुळे आम्ही आंदोलन स्थगित करून प्रशासनाला सहकार्याची भूमिका घेतली होती. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची प्रतीक्षा करीत आहोत. दुर्दैवाने सोमवारपासून दुकानांना परवानगी न दिल्यास आम्ही दुकाने सुरू करणार आहोत, असे अध्यक्ष समीर शहा यांनी सांगितले.