शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
2
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
3
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?
4
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन
5
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
6
लाडकी बहीण, गॅस सबसिडी सारख्या योजनांचे पैसे अडकणार? १ ऑक्टोबरपूर्वी 'हे' काम करा पूर्ण
7
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
8
'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये समीर वानखेडेंची नक्कल; क्रांती रेडकरने Video शेअर करत दिलं सडेतोड उत्तर
9
Beed: लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण
10
Viral Video : अरे बापरे हे काय बघितलं! महिलेने कॅमेरा सुरू केला अन् पुढे जे काही घडलं... ; व्हिडीओ बघून तुम्हीही हैराण व्हाल!
11
सरकारी बँकांमध्ये वाढणार परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा! सरकार करतंय मोठी तयारी
12
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...
13
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
14
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
15
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
16
'माझ्या बायकोला तू पळवून लावलंस!'; रागाच्या भरात भावाने बहिणीची केली निर्घृण हत्या
17
"लग्न नाही, फॅमिली नाही विचार करा...", फुकटचा सल्ला देणाऱ्या चाहत्याला जुईचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "अशा माणसांची..."
18
नवरात्रीतील विनायक चतुर्थी २०२५: 'या' ८ राशींसाठी जुळून आले ३ महाशुभ योग; मिळेल विशेष धनलाभ!
19
मुलाला तुरुंगवास, धक्का बसलेल्या वडिलांनी संपवलं जीवन, अंत्यसंस्कारावेळी घडलं असं काही, ७ पोलीस निलंबित
20
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत

जिल्ह्यात २८५ गावांत ‘मध्यम’ दुष्काळ जाहीर : आटपाडीचा समावेश नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 00:56 IST

सांगली : यावर्षीच्या खरीप हंगामात ज्या गावांची अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली आहे, त्या गावांमध्ये ‘मध्यम’ स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे

ठळक मुद्देपैसेवारीच्या अटीमुळे नाराजी

सांगली : यावर्षीच्या खरीप हंगामात ज्या गावांची अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली आहे, त्या गावांमध्ये ‘मध्यम’ स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील एकूण २८५ गावांना या निर्णयाचा फायदा होणार असला तरी, टंचाईच्या झळा अधिक तीव्र होत असतानाही, केवळ ५० पैशांपेक्षा जादा पैसेवारी आहे, म्हणून आटपाडी तालुक्याला मात्र यातून वगळण्यात आले आहे.

शासनाकडून दरवर्षी खरीप हंगामातील पैसेवारीचा अहवाल घेण्यात येतो. यंदाही तो घेण्यात आला असून त्यातील ५० पेक्षा कमी पैसेवारी असणाऱ्या २८५ गावांमध्ये शासकीय परिभाषेत ‘मध्यम’ स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यात तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे. मिरज - ३९, तासगाव ६९, कवठेमहांकाळ ६०, जत ५० आणि खानापूर तालुक्यातील ६७ गावांचा समावेश आहे. विशेष म्हणजे टंचाईसदृश परिस्थिती अधिक गंभीर असणाºया जत तालुक्यातील १२० गावांपैकी केवळ ५० गावांना याचा लाभ मिळणार आहे.

तसेच जत, कवठेमहांकाळइतकीच दुष्काळी परिस्थिती अनुभवणाºया आटपाडी तालुक्याचा यात समावेशच करण्यात आलेला नाही. गेल्या मान्सूनमध्ये आटपाडी तालुक्यात कमी पाऊसमान होऊनही सरासरीपेक्षा जादा पाऊस झाल्याचा अहवाल सादर झाला होता. आता आटपाडी तालुक्याची पैसेवारीही ५० पैशांपेक्षा जास्त असल्याने दुष्काळी लाभापासून तालुक्याला वंचित रहावे लागणार आहे.यादीतील गावांना : मिळणार हे लाभजमीन महसुलात सूट, सहकारी कर्जांचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीज बिलात ३३.५ टक्के सूट, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकºयांच्या शेती पंपाची वीज जोडणी खंडित होणार नाही.