शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नाराज नगरसेवकांची संघर्षाची तयारी महापौरांना जाब विचारण्यात येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2015 00:42 IST

उघड संघर्षाला अडचणी

सांगली : महापालिकेच्या बजेट पुस्तिकेतून प्रत्येक प्रभागासाठी गृहीत धरण्यात आलेली आठ कोटी रुपयांची बायनेम कामे महापौर विवेक कांबळे यांनी काढून टाकल्यामुळे सत्ताधारी सदस्यांसह विरोधी सदस्यही नाराज झाले आहेत. नाराज झालेल्या सत्ताधारी सदस्यांनी महापालिकेत मंगळवारी बैठक घेऊन महापौरांना जाब विचारण्याचा निर्धार केला. महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये अंदाजपत्रकीय चर्चा झाली, त्यावेळी प्रत्येक सदस्याची ५० लाखांची बायनेम कामे अंदाजपत्रकात धरली होती. एकूण ८ कोटी रुपयांची ही कामे होती. त्यानंतर अंदाजपत्रक महापालिका सभेत सादर करण्यात आले. महापौरांकडून ते आता अंतिम झाले आहे. अंदाजपत्रकाची पुस्तिका प्रसिद्ध होईपर्यंत महापौरांनी ही सर्व कामे अंदाजपत्रक अंतिम करताना समाविष्ट केल्याचे सांगितले होते. प्रत्यक्ष सोमवारी जेव्हा या प्रती नगरसेवकांच्या हातात पडल्या, तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. महापौरांनी बायनेम कामांनाच कात्री लावली. स्थायी समितीने धरलेली ८ कोटींची बायनेम कामे या पुस्तिकेतून गायब झाली आहेत. प्रत्येक प्रभागासाठीच्या तरतुदींपुढे शून्य दिसत असल्याने नगरसेवकांमधून संताप व्यक्त होत आहे. महापालिकेत मंगळवारी सुमारे २५ नगरसेवकांनी एकत्रित येऊन अंदाजपत्रकाविषयी नाराजी व संताप व्यक्त केला. याबाबत महापौरांना जाब विचारण्याची तयारी सर्वांनी केली आहे. ही कामे रद्द करण्यामागचे कारण अजूनही महापौरांनी स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे नगरसेवकांनी एकत्रितपणे याबाबतची विचारणा करण्याचा निर्णय घेतला. विरोधकांनीही याप्रश्नी महापौरांना धारेवर धरण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे बायनेम कामे रद्द करण्याचा हा महापौरांचा निर्णय कळीचा मुद्दा बनला आहे. प्रभाग समित्यांच्या सक्षमीकरणाच्या नावाखाली प्रत्येक समितीला दीड कोटी रुपयांप्रमाणे ६ कोटींची तरतूद महापौरांनी अंदाजपत्रकात केली होती. प्रत्यक्षात संबंधित समित्यांमार्फत यापूर्वी झालेल्या कामांची बिलेच थकित होती. प्रत्येक प्रभाग समितीच्या थकित रकमांचा हिशेब झाल्यानंतर समित्यांच्या खात्यावर एकूण ६ लाखाचीसुद्धा शिल्लक दिसत नाही. त्यामुळे सदस्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. त्यामुळे आता वर्षभरात कोणतेही काम करण्यासाठी पैशाची तरतूद नाही. (प्रतिनिधी)उघड संघर्षाला अडचणीमहापालिकेत कोणताही वाद यापुढे होता कामा नये, असा डोस सत्ताधाऱ्यांचे नेते मदन पाटील यांनी दिल्यामुळे सत्ताधारी सदस्यांची गोची झाली आहे. नाराजी लपविता येत नाही आणि व्यक्तही करता येत नाही, अशी त्यांची स्थिती झाली आहे.