शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मातोश्री पेट्रोलपंपात भेसळ झाल्याचे स्पष्ट-- विजय काळम :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 00:03 IST

सांगली : माधवनगर रस्त्यावरील बायपासजवळ असणाºया मातोश्री पेट्रोल पंपावरील पेट्रोलमध्ये भेसळ असल्याचा अहवाल

ठळक मुद्देपरवाना निलंबनाची शिफारसया पेट्रोल पंपाचा परवाना रद्द करण्याची शिफारस कंपनीकडे करणार

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : माधवनगर रस्त्यावरील बायपासजवळ असणाºया मातोश्री पेट्रोल पंपावरील पेट्रोलमध्ये भेसळ असल्याचा अहवाल प्रयोगशाळेतून मंगळवारी प्राप्त झाला आहे. त्यामुळे या पेट्रोल पंपाचा परवाना रद्द करण्याची शिफारस कंपनीकडे करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विजय काळम यांनी दिली.बायपास रस्त्यावर महेंद्र भालेराव (रा. जळगाव) यांचा मातोश्री पेट्रोलपंप आहे. महिन्याभरापूर्वी त्यांनी हा पंप चालविण्यासाठी घेतला आहे. या पंपावरील पेट्रोलमध्ये भेसळ होत असल्याची तक्रार जिल्हाधिकाºयांकडे करण्यात आली होती. या तक्रारीची गंभीर दखल जिल्हाधिकाºयांनी घेतली. २६ सप्टेंबरला सकाळी साडेनऊच्या सुमारास जिल्हाधिकारी काळम-पाटील व निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांनी पंपावर छापा टाकला होता. त्यानंतर जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड, वैध मापन निरीक्षक आर. पी काळकुटे, भारत पेट्रोलियमचे विक्री व्यवस्थापक जे. एस. जोसेफ असे प्रमुख अधिकारी कर्मचाºयांसह पंपावर दाखल झाले होते.सुमारे तीन तासांहून अधिक काळ पंपाची तपासणी सुरू होती. यावेळी पेट्रोल भरण्याच्या यंत्रामधील सील तोडले असल्याचे उघडकीस आले होते. दरम्यान, पेट्रोलची घनता तपासली असता, तीही नियमापेक्षा अधिक असल्याचे समोर आले होते. ७४० ते ७४६ पर्यंत आवश्यक असणारी घनता ७६८ पर्यंत असल्याचे समोर आले होते. त्याचवेळी इंधनामध्ये भेसळ होत असल्याचे स्पष्ट झाले होते. तसेच तेथील पेट्रोलचा रंग काळपट असल्याचे निदर्शनास आले होते. पंपावरील स्टॉक रजिस्टरदेखील अद्ययावत नव्हते. अन्य त्रुटी यावेळी आढळून आल्या होत्या. त्यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे पंपावरील पेट्रोलचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते.त्याचा अहवाल मंगळवारी सायंकाळी प्रशासनास प्राप्त झाला. यामध्ये प्रशासनाने व्यक्त केलेला अंदाज बरोबर ठरला. अनेक बाबींमध्ये दोष आढळत पेट्रोलमध्ये भेसळ होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सांगलीतील या पंपाचा परवाना रद्द करण्याची शिफारस संबंधीत कंपनीकडे बुधवारी करण्यात येणार असल्याचे विजय काळम यांनी सांगितलेपंपचालकांमध्ये खळबळअचानक झालेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील पेट्रोलपंप चालकांत खळबळ उडाली होती. त्यानंतर कारवाई काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता तपासणीत भेसळ स्पष्ट झाल्यामुळे परवाना रद्दची कारवाई केली जाणार आहे. जिल्ह्यातील ज्या पेट्रोलपंपांबद्दल तक्रार येईल, त्याठिकाणी तपासणी करण्याची व दोष आढळल्यास कारवाईची जिल्हा प्रशासनाची भूमिका असल्याने पंपचालकांत खळबळ माजली आहे.