शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

मराठा आरक्षण; वैधानिक बाबी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 23:43 IST

सांगली/कडेगाव : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर २०१४ च्या निवडणुकीपूर्वी आघाडी शासनाने निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घाईघाईने निर्णय घेतला, तो कोर्टात टिकला नाही. आता सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचा निर्णय होईल. यासाठी आवश्यक त्या सर्व वैधानिक बाबींची शासनाने पूर्तता केली आहे.९ आॅगस्ट रोजी मुंबईत झालेल्या मराठा क्रांती मोर्चातील बहुतांशी मागण्या पूर्ण केल्या आहेत, अशी ...

सांगली/कडेगाव : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर २०१४ च्या निवडणुकीपूर्वी आघाडी शासनाने निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घाईघाईने निर्णय घेतला, तो कोर्टात टिकला नाही. आता सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचा निर्णय होईल. यासाठी आवश्यक त्या सर्व वैधानिक बाबींची शासनाने पूर्तता केली आहे.९ आॅगस्ट रोजी मुंबईत झालेल्या मराठा क्रांती मोर्चातील बहुतांशी मागण्या पूर्ण केल्या आहेत, अशी माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिलीे.यंदा उसाचे उत्पादन वाढले असून, पुढीलवर्षीही हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. याचा साखर उद्योगावर परिणाम होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. साखर निर्यातीला अनुदान मिळावे या मागणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे शिष्टमंडळ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्याचबरोबर ग्राहकांसाठीची साखर व उद्योगासाठीची साखर यांच्या दरात मोठी तफावत आहे. साखरेचे दर कमी झाले म्हणून बिस्किटांचे, मिठाईचे दर कमी झाल्याचे कधी ऐकीवात नाही. त्यामुळे साखरेचे दर घरगुती ग्राहकांसाठी वेगळे आणि उद्योगासाठी वेगळे ठेवण्याचे धोरण राबविण्याचा आग्रह केंद्र सरकारकडे धरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.दोन्ही राज्यांचे शिष्टमंडळ भेटणारसहकारमंत्री देशमुख म्हणाले की, देशात महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक ऊस उत्पादन होत असते. त्यामुळे निर्यातीमधील तोटा भरून काढण्यासाठी फडणवीस व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ लवकरच मोदी यांना भेटणार आहे.पोटनिवडणुकीबाबत चर्चा नाही!कडेगाव -पलूस मतदारसंघाचे आमदार, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाने झालेल्या दु:खाचे सावट अद्याप कायम आहे.या मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे; मात्र निवडणूक लढविण्यासंदर्भात भाजपच्या वरिष्ठ पातळीवर कोणतीही चर्चा झालेली नाही, असे सुभाष देशमुख यांनी कडेगाव येथे सांगितले.