शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

गावगाड्याकडून नागरीकरणाकडे: लोकसंख्या २० हजारांवर, पण गावगाडा मात्र ग्रामपंचायतीचाच

By संतोष भिसे | Updated: December 11, 2024 13:15 IST

सांगली जिल्ह्यातील अनेक गावांना नगरपंचायत होण्याची प्रतीक्षा : राजकीय, प्रशासकीय इच्छाशक्तीचा अभाव

संतोष भिसेसांगली : जिल्ह्यातील अनेक गावे नगरपंचायत होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. गावांचा पसारा वाढला, तरी तेथे ग्रामपंचायतीमार्फतच अद्याप कामकाज चालते. मोठ्या लोकसंख्येचा डोलारा सांभाळण्याइतपत क्षमता ग्रामपंचायतीकडे नसल्याने त्याचा प्रतिकूल परिणाम या गावांच्या विकासावर होत आहे.गेल्या पाच-सात वर्षांत आटपाडी, शिराळा, पलूस, कडेगाव, कवठेमहांकाळ, जत व खानापूर या काही ग्रामपंचायती नगरपंचायतीत रूपांतरित झाल्या; पण या शहरांपेक्षाही जास्त लोकसंख्येची अनेक गावे ग्रामपंचायत श्रेणीतून बाहेर पडण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यासाठी राजकीय आणि प्रशासकीय स्तरावर हालचाली होताना दिसत नाहीत. किंबहुना मिरज तालुक्यातील मालगावसारखी ग्रामपंचायत कधीकाळी नगरपंचायत असतानाही पुन्हा ती ग्रामपंचायत करण्याचा उलटा प्रवासही राजकीय दबावाखाली झाला आहे. आजमितीला मिरज तालुक्यातील मोठे गाव असूनही ते विकासकामांत तुलनेने पिछाडीवर आहे.

राजकीय अस्तित्व संपण्याची भीती..ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाल्यास राजकीय अस्तित्व संपेल, या भीतीने नेतेमंडळी नगरपंचायतीचा प्रस्ताव मनावर घेत नाहीत, त्याचा फटका गावाच्या विकासाला बसत आहे. सध्या या गावांना वित्त आयोगातून वर्षाकाठी लोकसंख्येनुसार १० कोटी रुपयांपर्यंत निधी मिळतो, पण त्याचा नियोजनबद्ध वापर करण्याची क्षमता ग्रामपंचायतींकडे नाही. एक ग्रामविस्तार अधिकारी आणि १५-२० कर्मचाऱ्यांच्या बळावर गावगाडा चालवावा लागतो. विकासकामांचे आराखडे करावे लागतात.

कोट्यवधींचे प्रकल्प, पण तज्ज्ञ मनुष्यबळ नाहीकाँक्रीट रस्ते, जलजीवन पाणी योजना, पथदिवे, ग्रामसचिवालय, स्थानिक पाणीयोजना, भूमिगत गटारी, दलित वस्तीतील विकासकामे अशी कोट्यवधींची कामे ग्रामपंचायती करतात, पण त्यासाठी त्यांच्याकडे तज्ज्ञ मनुष्यबळ नाही. प्रत्येक बाबतीत त्यांना पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांवर अवलंबून रहावे लागते. परिणामी विकासकामे गतीने होत नाहीत.

नगरपंचायतीसाठी निकष

  • आवश्यक लोकसंख्या - १०,००० ते २५,०००
  • महापालिका शहरापासून २० किलोमीटरपेक्षा कमी अंतर
  • गावातील किमान २५ टक्के लोकसंख्या शेतीव्यतिरिक्त अन्य व्यवसायात
  • शहरापासून २० किलोमीटरपेक्षा जास्त असल्यास ५० टक्के लोक शेतीव्यतिरिक्त अन्य व्यवसायात
  • सदस्य संख्या १०, प्रत्येक प्रभागातून १ सदस्य, त्यातून एकाची अध्यक्ष म्हणून निवड
टॅग्स :Sangliसांगलीgram panchayatग्राम पंचायत