शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
4
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
5
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
6
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
7
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
8
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
9
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
10
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
11
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
12
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
13
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
14
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
15
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
16
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
17
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
18
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
19
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
20
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...

सीएएविरोधात बहुजनांनी रस्त्यावर उतरावे : बी. जी कोळसे-पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 14:21 IST

एनपीआर व सीएए या अत्यंत विषारी कायद्यांचे मूळ मनुवादात आहे. संविधानाने दिलेला बरोबरीचा दर्जा व हक्क काढून घेऊन सर्वांना गुलाम बनविण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी मुस्लिम व बहुजनांनी रस्त्यावर उतरावे, असे आवाहन निवृत्त न्यायाधीश बी. जी कोळसे-पाटील यांनी रविवारी मिरजेत केले.

ठळक मुद्देसीएएविरोधात बहुजनांनी रस्त्यावर उतरावे : बी. जी कोळसे-पाटीलजमात इस्लामी-ए-हिंद व अलायन्स अगेन्स्ट सीएएतर्फे एनआरसी व सीएए मेळावा

मिरज : एनपीआर व सीएए या अत्यंत विषारी कायद्यांचे मूळ मनुवादात आहे. संविधानाने दिलेला बरोबरीचा दर्जा व हक्क काढून घेऊन सर्वांना गुलाम बनविण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी मुस्लिम व बहुजनांनी रस्त्यावर उतरावे, असे आवाहन निवृत्त न्यायाधीश बी. जी कोळसे-पाटील यांनी रविवारी मिरजेत केले.जमात इस्लामी-ए-हिंद व अलायन्स अगेन्स्ट सीएएतर्फे एनआरसी व सीएए या विषयावर मेळावा पार पडला. यावेळी कोळसे-पाटील म्हणाले, आसाममध्ये एनआरसीच्या कपटाच्या खेळात फक्त मुस्लिमांना या देशातून बाहेर करू, असे वाटले होते. मात्र १९ लाख लोक या देशाचे नागरिक नाहीत म्हणून बाहेर काढले. त्यातील दहा लाख दलित आदिवासी आहेत.

भारतापेक्षा पाकिस्तान, बांगलादेशचा जीडीपी जास्त आहे. ते देश आपल्यापुढे जात आहेत. तरीही यावर विचार केला जात नाही. शिवाजी महाराजांनी मनूच्या राज्याला पहिल्यांदा धक्का दिला. भांडणे लावण्यासाठी शिवाजी महाराजांबद्दल कपटाने खोटा इतिहास लिहिला गेला. औरंगजेबानेही छत्रपतींबद्दल चांगले लिहिले आहे.देशात राज्य कोणाचेही असले तरी, चालविणारे मात्र अन्य लोकच असतात. सामान्य लोक याबाबत अनभिज्ञ आहेत. राष्ट्रपतींचे सैन्यदलाचे अधिकार काढून रावत यांना अधिकार देऊन लष्कर व पोलीस मोदींनी ताब्यात घेतले. मोगलांच्या काळात आमची निर्यात क्षमता ३५ टक्के होती, आता दहा टक्के सुद्धा नाही. यावर कधी चर्चा होत नाही. मनुवादी व्यवस्था सर्वांच्या दु:खाचे मूळ कारण बनली आहे. मुस्लिमांनीही आता मौलवींवर विश्वास ठेवून चालणार नाही.सलोख्याचे वातावरण बिघडण्यापासून रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. हे प्रयत्न सर्वांनीच करायला हवेत. सलोखा बिघडला की कोणाला फायदा होणार, हे आता सर्वांना समजले आहे.यावेळी ज्येष्ठ विचारवंत डॉ. बाबूराव गुरव, प्रा. वाजीदअली खान यांचीही भाषणे झाली. जमाते-इस्लामीचे कासीम मुल्ला, बद्रुद्दीन नालबंद, मुस्ताक अहमद मोहसीन, महंमद बुकसेलर, जनता दलाचे अ‍ॅड के. डी. शिंदे, सुमन पुजारी, जमीयते उलेमा-ए-हिंदचे मौलाना जुबेर बेपारी, सय्यद अनस बाबा, साक्षी मगदूम, मुफ्ती जुबेर, इरफान निशानदार, मौलाना गुलाम गौस बंदानवाजी, शंकर पुजारी, डॉ. अब्दुल मन्नान शेख, नामदेव करगणे, उमेश देशमुख, मराठा सेवा संघाचे डॉ. संजय पाटील, अ‍ॅड. अमित शिंदे, धनाजी गुरव, नंदा पाटील, डॉ. अमोल पवार उपस्थित होते.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकSangliसांगली