शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

मिरज तालुका काँग्रेसमुक्त करा

By admin | Updated: January 27, 2017 23:29 IST

सुभाष देशमुख : भाजपचा कार्यकर्ता संवाद मेळावा

सांगली : केंद्र आणि राज्याच्या शिखरावरील भाजपचे सरकार कायम ठेवायचे असेल, तर कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागात पक्षाचा पाया मजबूत केला पाहिजे. त्यासाठी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक ही एक चांगली संधी असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी गुरुवारी सांगलीत केले. देश, राज्याप्रमाणे मिरज तालुकाही कॉँग्रेसमुक्त करा, असे आवाहनही त्यांनी केले. मिरज तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा गुरुवारी सांगलीत झाला. यावेळी पालकमंत्री देशमुख बोलत होते. मेळाव्यास खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, माजी आमदार दिनकर पाटील, दीपक शिंदे-म्हैसाळकर, शेखर इनामदार उपस्थित होते. देशमुख म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला साथ देत देश काँग्रेसमुक्त झाला आहे. आता जिल्हा परिषद, पंचायत समितीतूनही काँग्रेसला हद्दपार करा. मिरज तालुक्याचा सभापती भाजपचा झाला पाहिजे, यासाठी कार्यकर्त्यांनी जिद्दीने कामाला लागावे. काँग्रेसमुक्त मिरज तालुका, असा नारा देत कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत भाजप सरकारची कामे पोहोचविली पाहिजेत. सरकार चांगले काम करीत असताना, केवळ २० टक्के लोकच सरकारविरोधी व्यक्तव्ये करतात. त्यात काळापैसावाले, भ्रष्टाचारी लोकांचाच समावेश आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. आतापर्यंत नेत्यांसाठी कार्यकर्त्यांनी जिवाचे रान केले आहे. त्यामुळे नेत्यांनीही कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहावे, त्यांना वाऱ्यावर सोडू नये. जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख म्हणाले की, जिल्ह्यात भाजपला पोषक वातावरण आहे. इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या असून त्याचा अहवाल प्रदेश समितीकडे पाठविला आहे. प्रदेश समितीकडून मतदार संघाचा सर्व्हे सुरू आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर ३० जानेवारीपर्यंत उमेदवारांची यादी अंतिम केली जाईल. जिल्हा परिषदेत भाजपची एकहाती सत्ता येईल. श्रीकांत शिंदे, मुन्ना कुरणे, भारती दिगडे, बीरेंद्र थोरात, विक्रम पाटील-सावर्डेकर, ओंकार शुक्ल यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)