शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

कवलापूर-अलकूड एमआयडीसी करा : उद्योग आघाडीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 00:15 IST

कुपवाड : औद्योगिक विकास महामंडळाने प्रस्तावित कवलापूर-अलकूड एमआयडीसीची प्रक्रिया गतिमान करुन जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना द्यावी.

ठळक मुद्देमुख्यमंत्री, उद्योगमंत्र्यांना साकडेएमआयडीसीमध्ये जिल्ह्यातील उद्योजकांनाच प्राधान्याने प्लॉट देण्याची आमची मागणीएअर अ‍ॅम्ब्युलन्स हेलिपॅडची जागा निर्माण करावी.एमआयडीसीबाबत जिल्ह्यातील संभाव्य इच्छुक उद्योजकांची बैठक

कुपवाड : औद्योगिक विकास महामंडळाने प्रस्तावित कवलापूर-अलकूड एमआयडीसीची प्रक्रिया गतिमान करुन जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना द्यावी. औद्योगिक वसाहत स्थापन झाल्यानंतर गरजू लघु उद्योजकांना पारदर्शीपणे प्लॉट वाटप करावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री सुभाष देशमुख तसेच औद्योगिक विकास महामंडळाकडे केल्याचे उद्योग विकास आघाडीचे नेते डी. के. तथा दिलीप चौगुले, मनोज भोसले आणि जफर खान यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

ते म्हणाले की, बºयाच वर्षांच्या कालखंडानंतर सांगली जिल्ह्यात प्रस्तावित कवलापूर व अलकूड या दोन एमआयडीसींची प्रक्रिया गतिमान झाली आहे. यातील कवलापूर एमआयडीसीच्या सीमांच्या आखणीचे निविदा निघाली आहे, तर अलकूड एमआयडीसीबाबत जिल्ह्यातील संभाव्य इच्छुक उद्योजकांची बैठक शुक्रवार, १० रोजी औद्योगिक महामंडळाच्या प्रादेशिक अधिकाºयांनी बोलाविल्याची चर्चा आहे.

औद्योगिक क्षेत्र निर्माण न झाल्याने जिल्ह्याचा औद्योगिक विकास खुंटला आहे. नव्याने उद्योग उभारू इच्छिणाºया उद्योजकांना जागेचा तुटवडा भासू लागला आहे. या पार्श्वभूमीवर औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी गतिमान केलेली प्रस्तावित एमआयडीसीची प्रक्रिया स्वागतार्ह व कौतुकास्पद आहे.

प्रस्तावित एमआयडीसीमध्ये जिल्ह्यातील उद्योजकांनाच प्राधान्याने प्लॉट देण्याची आमची मागणी असणार आहे. तसेच लघु उद्योजकांनाच जास्तीत जास्त प्लॉट वाटप करावेत, जेणेकरुन स्थानिक उद्योजकांसह कामगारांनाही रोजगार मिळेल. महामंडळाने गुंतवणुकीच्या माध्यमातून प्लॉट बळकावू इच्छिणाºया ‘बहुउद्योगी’ उद्योजकांना जागा देऊ नयेत.आकस्मिक दुर्घटना, वाढता विकास, वाढती लोकसंख्या आणि अवयवदानाचा निर्णय घेणाºयांची वाढती संख्या गृहित धरुन गरजू रुग्णांना नाशिक, पुणेसारख्या शहरापर्यंत अवयव पोहोचविण्यासाठी ग्रीन कॉरिडॉरसारख्या प्रणालीसाठी एका औद्योगिक क्षेत्रात किंवा प्रस्तावित एमआयडीसीमध्ये एअर अ‍ॅम्ब्युलन्स हेलिपॅडची जागा निर्माण करावी. जुन्या व प्रस्तावित औद्योगिक क्षेत्रात फार्महाऊस, बगीचा आदी नियमबाह्य कारणांसाठी भूखंडांचा वापर केल्यास त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही दिलीप चौगुले, मनोज भोसले आणि जफर खान यांनी यावेळी केली.