शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

महापालिकेत मोठे ‘आॅपरेशन’ करू

By admin | Updated: December 27, 2016 00:59 IST

पतंगराव कदम : जिल्हा परिषद काबीज करण्यासाठी तयारी; काँग्रेसला सर्वात चांगले वातावरण

सांगली : महापालिकेत एकहाती सत्ता असूनही स्थायी समितीचे सभापतीपद विरोधी गटाकडे गेले, ही गंभीर आहे. पदाधिकाऱ्यांनी त्यांची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडल्याचे दिसत नाही. त्यामुळे लवकरच महापालिकेत मला मोठे ‘आॅपरेशन’ करावे लागेल, असा इशारा काँग्रेसचे नेते आ. पतंगराव कदम यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिला. ते म्हणाले की, महापालिकेत आमचे संख्याबळ अधिक आहे. विरोधी पक्षाचे संख्याबळ कमी असताना त्यांना सभापदी मिळाले. महापौर, उपमहापौर आणि सभागृह नेत्यांची यामध्ये जबाबदारी मोठी होती. त्यांनी ती व्यवस्थित पार पाडली का, हे पाहावे लागेल. महापालिकेत मोठे बदल करावे लागतील. आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्याकडूनही सोमवारी कामकाजाचा आढावा घेतला. रस्त्यांसाठी आलेल्या निधीचा योग्य विनियोग झाला पाहिजे, अशा सूचना त्यांना दिल्या आहेत. रस्त्यांची कामे प्राधान्याने व्हावीत. दर्जा नियंत्रणासाठी चांगली यंत्रणा उभी करायला हवी. आयुक्तांनी या गोष्टी करण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे महापालिकेत यापुढे तरी चांगला कारभार अपेक्षित आहे. जिल्हा परिषदेसाठी आम्ही जोरदार तयारी केली आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात राष्ट्रवादीचे भानुदास पाटील आमच्याकडे आल्यामुळे काँग्रेसची तालुक्यातील ताकद वाढली आहे. तालुकानिहाय आमचे नियोजन सुरू आहे. अन्य पक्षांतील अनेक लोक आमच्याकडे येण्यास इच्छुक आहेत. नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाल्यामुळे जिल्हा परिषदेसाठी चांगले वातावरण तयार झाले आहे. नगरपालिका निवडणुकीमुळे कार्यकर्तेही चार्ज झाले आहेत. नागरिकांमध्ये विद्यमान सरकारबद्दल नाराजी आहे. त्यामुळे त्याचा फायदा काँग्रेसलाच मिळणार, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)ग्रामीण अर्थव्यवस्था विस्कळीतनोटा बंदीच्या निर्णयानंतर केंद्र सरकारने दिलेला आर्थिक निर्बंधाचा कालावधी येत्या चार दिवसात संपणार आहे. तरीही ग्रामीण परिस्थिती अजूनही सुधारलेली नाही. लोकांचे हाल सुरूच आहेत. जिल्हा बँकेवरील निर्बंधामुळे त्यात भरच पडली आहे. उसाची बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होत असताना, त्यांना पैसे हातात मिळत नाहीत. हे या निर्णयाचे मोठे अपयश आहे. अन्य घटकांपेक्षा शेतकऱ्यांच्या अडचणी अधिक आहेत. त्या सोडविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे ते म्हणाले. समविचारी पक्षांना एकत्र करणारकाँग्रेस जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर लढणार आहे. स्थानिक पातळीवर जे समविचारी घटक, पक्ष किंवा आघाड्या आहेत, त्यांनाही आम्ही सोबत घेणार आहोत. त्यासाठीची चाचपणी सुरू आहे. आष्टा आणि इस्लामपूर येथील नगरपालिका निवडणुकीत आम्ही समविचारी पक्षांना एकत्रित घेऊन केलेला प्रयोग यशस्वी झाल्याने तसे प्रयत्न जिल्हा परिषदेसाठी काहीठिकाणी होतील. औषध मिळणेही झाले मुश्किलनोटा बंदीच्या निर्णयामुळे अजूनही लोकांच्या अडचणी दूर झालेल्या नाहीत. अनेक लोकांना औषधे खरेदी करणेही मुश्किल झाले आहे. रुग्णांच्या नातेवाईकांचे हे हाल पाहवत नाहीत. भारती हॉस्पिटलमार्फत आम्ही मोफत औषधांचा उपक्रम त्यासाठी सुरू केला आहे. आणखी किती दिवस अशी परिस्थिती राहील, याचा अंदाज कोणालाच नाही.