शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

ताकारी, टेंभू योजनेचे पाणी जपून वापरा

By admin | Updated: December 15, 2015 00:26 IST

पृथ्वीराज देशमुख : ‘केन अ‍ॅग्रो’च्या १ लाख ११ हजार १११ व्या पोत्याचे पूजन

नेवरी : शेतकऱ्यांनी टेंभू व ताकारीचे पाणी काटकसरीने वापरावे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेती उत्पादन वाढविण्यासाठी केला पाहिजे. शेतीला पाणी देण्याच्या पध्दतीत बद्दल करून पिकाला आवश्यक आहे. तेवढचे पाणी ठिंबक सिंचनाव्दारे देणेत यावे यासाठी कारखान्याकडून ठिंबक सिंंचन संच व मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन केन अ‍ॅग्रोचे अध्यक्ष, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी केले.रायगाव (ता. कडेगाव) येथील केन अ‍ॅग्रो एनर्जी (इंडिया) लि. या साखर कारखान्याच्या सन २०१५-१६ मध्ये उत्पादीत झालेल्या एक लाख अकरा हजार एकशे अकराव्या साखर पोत्याचे पूजन देशमुख यांचेहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.यावेळी देशमुख म्हणाले की, कारखान्याचे विस्तारीकरण केल्यामुळे प्रतिदिनी ३७०० ते ३८०० च्या दरम्यान ऊस गाळप होत आहे. गाळप क्षमतेचा वापर करून गाळप वाढविणे गरजेचे आहे. आजपर्यंत केन अ‍ॅग्रो साखर कारखान्याने २७ दिवसामध्ये १ लाख २००० टन गाळप करून १ लाख ११ हजार १११ साखर पोती उत्पादन केले आहे. आपल्या कारखान्याचा सरासरी साखर उतारा १०.८९ टक्के आहे. कारखाना परिसरातील सर्व ऊस उत्पादकांनी आपला ऊस कारखान्याकडे गाळपास पाठवावा. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जयकर पाटील यांनी स्वागत केले. यावेळी दत्तात्रय सूर्यवंशी, वसंतराव गायकवाड, युवराज सावंत, शंकरराव पाटील, शिवाजीराव देशमुख, लक्ष्मण डांगे, रामचंद्र घार्गे, लक्ष्मण कणसे, विजय करांडे, धनंजय देशमुख, धोंडीराम महिंद, हणमंतराव कदम, शशिकांत घाडगे, अ‍ॅड. सर्जेराव चव्हाण, भिलवडीचे सरपंच सुरेंद्र वाळवेकर, रामानंदनगरचे सरपंच दीपक मोहिते, रणजित यादव, सुनील गाढवे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)