शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले
2
"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट
3
विमानांच्या इंजिनांचे आयुष्य किती असते? एअर इंडियाच्या विमानाला होती अशी इंजिने, जी...
4
५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?
5
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
6
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
7
गरमा गरम समोसे, गोड गोड जिलेबी की यम्मी पिझ्झा... आरोग्यासाठी काय आहे सर्वात घातक?
8
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
9
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
10
Lunchbox Recipe: दुधीची भाजी नको? ट्राय करा दुधीचे खमंग पराठे; करा झटपट, खा चटचट!
11
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
12
"इंग्लिश मीडियममध्ये शिकला, बायको ख्रिश्चन आणि हा म्हातारा...", 'बिग बॉस' फेम रीलस्टारने मराठीवरुन रितेश देशमुखला डिवचलं
13
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
14
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
15
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
16
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
17
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
18
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
19
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
20
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च

अग्रणी नदी पुनरुज्जीवनासाठी विशेष निधी देणार

By admin | Updated: October 1, 2015 23:16 IST

प्रभाकर देशमुख : विट्यात नियोजन बैठक; राज्य शासन दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी

विटा : दुष्काळी खानापूर, तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यात सुरू असलेले अग्रणी नदी पुनरुज्जीवनाचे काम अत्यंत चांगले झाले असून, ते राज्यात एक आदर्श मॉडेल व पायलट प्रोजेक्ट म्हणून नावारूपास येईल असे सांगून, अग्रणी पुनरुज्जीवन कामासाठी शासनाकडून विशेष निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही राज्याचे मदत, पुनर्वसन, जलसंधारण विभागाचे सचिव प्रभाकर देशमुख यांनी दिली.विटा येथे अग्रणी नदी पुनरुज्जीवन कामाच्या पाहणीनंतर आयोजित केलेल्या नियोजन बैठकीत सचिव देशमुख बोलत होते. यावेळी आ. अनिल बाबर, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, रोहयोच्या उपजिल्हाधिकारी सुचिता भिकाणे, प्रांताधिकारी सचिन इथापे, तासगावचे तहसीलदार सुधाकर भोसले, कवठेमहांकाळचे तहसीलदार सचिन डोंगरे, भाई संपतराव पवार, विवेक गुळवणी, उपविभागीय कृषी अधिकारी जयवंतराव कवडे, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत डुबल, डी. डी. कांबळे उपस्थित होते.देशमुख म्हणाले, दुष्काळी भागासाठी शाश्वत पाणी उपलब्ध झाले पाहिजे. राज्य शासनाने सुमारे पाच हजार गावे जलयुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. जुने बंधारे दुरूस्त करून त्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला आहे. शेती व पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी पाणलोट कार्यक्रम प्रभावीपणे राबविले पाहिजेत. त्यासाठीही निधी उपलब्ध करून दिला जाईल. राज्यात सध्या लोकसहभागातून २४० कामे उभी राहिली आहेत. अग्रणी पुनरुज्जीवनासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असून लोकसहभागातून प्रभावी कामे होतात, असे सांगितले. यावेळी आ. अनिल बाबर, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, तासगावचे तहसीलदार सुधाकर भोसले यांनीही मते मांडली. (वार्ताहर)आ. अनिल बाबर यांनी, शासनाने शेततळी प्लॅस्टिक कागदासह मंजूर करण्याबाबत व रोहयो विहिरीसाठी असलेली ५०० मीटर अंतराची अट शिथिल करण्याबाबत सचिव प्रभाकर देशमुख यांनी शासनस्तरावर प्रयत्न करावेत, तसेच रोहयो विहिरीच्या लाभार्थींना वीज कनेक्शन तातडीने कशी मिळतील हे पाहावे, अशी सूचना केली.कामाचे कौतुकच नाही!अग्रणी पुनरुज्जीवन कामासाठी सहकारी संस्थांच्या माध्यमातून सहा लाखाचा निधी उपलब्ध करून दिला. त्यातून जाधववाडी परिसरात कामे झाली. तेथील लाभार्थ्यांनी आम्ही केलेल्या कामांचे काहीच कौतुक केले नाही. प्रशासनानेही त्याची दखलही घेतली नाही, अशी नाराजी विवेक गुळवणी यांनी व्यक्त केली.