शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
2
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
3
रणबीर कपूर 'या' कंपनीचे १२.५ लाख शेअर्स खरेदी करणार, सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
4
एक व्यक्ती, ६ जिल्ह्यात एकाच वेळी केली ९ वर्षे नोकरी, सरकारला घातला कोट्यवधींचा गंडा 
5
ओलाच्या नावाने शिमगा केला, बजाज चेतक भररस्त्यात पेटली; इचलकरंजीत शोला बनला आग का गोला...
6
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
7
हेल्दी वाटणारा मिल्कशेक मेंदूसाठी ठरतोय 'विष'; आवडीने पिणाऱ्यांना धोक्याचा इशारा
8
डिफेन्स कंपनीचा शेअर ठरला 'मल्टीबॅगर', ६ महिन्यांत पैसे दुप्पट; ५ वर्षांत दिला २०००% परतावा
9
रशियन कच्च्या तेलावरील भारताच्या नफ्याला म्हटलं 'ब्लड मनी'; ट्रम्प यांच्या सहकाऱ्यानं पुन्हा गरळ ओकली
10
स्थानिक निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंनी डाव टाकला; भाजपाच्या शत्रूशी केली हातमिळवणी, काय घडलं?
11
Punjab Flood : पुराचे थैमान! पंजाबमधील मृतांचा आकडा ५१ वर; पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा
12
Asia Cup 2025 : 'बॅग'सह 'लक फॅक्टर' घेऊन दुबईला पोहचलाय कोच गंभीर! नेमकी काय आहे ही भानगड?
13
गोराई बीचवर मिनीबस भरतीच्या पाण्यात अडकली; चालकाचे जीवघेणं धाडस, तीन तासांनी...
14
WhatsApp Web Down : लॅपटॉप किंवा माऊस खराब झाला नाही तर WhatsApp Web आहे डाऊन; स्क्रोलिंगला येतोय प्रॉब्लेम
15
"नेपाळसाठी काळा दिवस...", देशातील हिंसक परिस्थिती पाहून मनीषा कोईरालाची भावुक पोस्ट
16
केसगळती, अपचनावर 'रामबाण' उपाय; तुळशीची ३-४ पानं खा, शरीरात होतील चमत्कारिक बदल
17
सोनं १३०० रुपये तर चांदी ३००० रुपयांनी महागली, तुमच्या शहरातील आजचा दर काय?
18
‘ऑफिसात जीव गेला तरी बेहत्तर, पण नोकरी सोडणार नाही’, तरुणाने मांडली EMI मध्ये अडकलेल्या मध्यमवर्गीयाची व्यथा 
19
Uddhav Thackeray: शिवसेनेच्या (यूबीटी) मेळाव्याला राज ठाकरे उपस्थित राहणार नाही?
20
Apple iPhone : काय सांगता! प्रत्येक फोनवर अ‍ॅपल एवढा नफा मिळवते, आयफोन बनवण्यासाठी खर्च किती येतो?

अग्रणी नदी पुनरुज्जीवनासाठी विशेष निधी देणार

By admin | Updated: October 1, 2015 23:16 IST

प्रभाकर देशमुख : विट्यात नियोजन बैठक; राज्य शासन दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी

विटा : दुष्काळी खानापूर, तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यात सुरू असलेले अग्रणी नदी पुनरुज्जीवनाचे काम अत्यंत चांगले झाले असून, ते राज्यात एक आदर्श मॉडेल व पायलट प्रोजेक्ट म्हणून नावारूपास येईल असे सांगून, अग्रणी पुनरुज्जीवन कामासाठी शासनाकडून विशेष निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही राज्याचे मदत, पुनर्वसन, जलसंधारण विभागाचे सचिव प्रभाकर देशमुख यांनी दिली.विटा येथे अग्रणी नदी पुनरुज्जीवन कामाच्या पाहणीनंतर आयोजित केलेल्या नियोजन बैठकीत सचिव देशमुख बोलत होते. यावेळी आ. अनिल बाबर, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, रोहयोच्या उपजिल्हाधिकारी सुचिता भिकाणे, प्रांताधिकारी सचिन इथापे, तासगावचे तहसीलदार सुधाकर भोसले, कवठेमहांकाळचे तहसीलदार सचिन डोंगरे, भाई संपतराव पवार, विवेक गुळवणी, उपविभागीय कृषी अधिकारी जयवंतराव कवडे, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत डुबल, डी. डी. कांबळे उपस्थित होते.देशमुख म्हणाले, दुष्काळी भागासाठी शाश्वत पाणी उपलब्ध झाले पाहिजे. राज्य शासनाने सुमारे पाच हजार गावे जलयुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. जुने बंधारे दुरूस्त करून त्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला आहे. शेती व पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी पाणलोट कार्यक्रम प्रभावीपणे राबविले पाहिजेत. त्यासाठीही निधी उपलब्ध करून दिला जाईल. राज्यात सध्या लोकसहभागातून २४० कामे उभी राहिली आहेत. अग्रणी पुनरुज्जीवनासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असून लोकसहभागातून प्रभावी कामे होतात, असे सांगितले. यावेळी आ. अनिल बाबर, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, तासगावचे तहसीलदार सुधाकर भोसले यांनीही मते मांडली. (वार्ताहर)आ. अनिल बाबर यांनी, शासनाने शेततळी प्लॅस्टिक कागदासह मंजूर करण्याबाबत व रोहयो विहिरीसाठी असलेली ५०० मीटर अंतराची अट शिथिल करण्याबाबत सचिव प्रभाकर देशमुख यांनी शासनस्तरावर प्रयत्न करावेत, तसेच रोहयो विहिरीच्या लाभार्थींना वीज कनेक्शन तातडीने कशी मिळतील हे पाहावे, अशी सूचना केली.कामाचे कौतुकच नाही!अग्रणी पुनरुज्जीवन कामासाठी सहकारी संस्थांच्या माध्यमातून सहा लाखाचा निधी उपलब्ध करून दिला. त्यातून जाधववाडी परिसरात कामे झाली. तेथील लाभार्थ्यांनी आम्ही केलेल्या कामांचे काहीच कौतुक केले नाही. प्रशासनानेही त्याची दखलही घेतली नाही, अशी नाराजी विवेक गुळवणी यांनी व्यक्त केली.