शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

महात्मा फुले यांची शिल्पसृष्टी उभारणार

By admin | Updated: April 12, 2017 22:51 IST

संजीवराजे नाईक-निंबाळकर : कटगुण येथे जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ग्वाही

पुसेगाव : ‘महात्मा जोतिबा फुले यांनी शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून शैक्षणिक क्षेत्रामध्ये क्रांती घडवली. खटाव तालुक्यासारख्या दुष्काळी भागात असलेल्या त्यांच्या कुलभूमी कटगुण येथे नायगावप्रमाणे शिल्पसृष्टी उभारण्यासाठी प्रयत्नशील राहू,’ अशी ग्वाही जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी दिली.कटगुण, ता. खटाव येथे महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती राजेश पवार, कृषी सभापती मनोज पवार, महिला बालकल्याण सभापती वनिता गोरे, समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगोड, पंचायत समिती सभापती संदीप मांडवे, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप विधाते, जिल्हा परिषद सदस्या सुनीता कचरे, पंचायत समिती सदस्य संतोष साळुंखे, गटविकास अधिकारी तानाजी लोखंडे, उपसरपंच उदय कदम, माजी सरपंच सुधीर गोरे, ग्रामपंचायत सदस्य हरिभाऊ गायकवाड, प्रकाश गोरे, जितेंद्र गोरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.संजीवराजे म्हणाले, ‘महात्मा फुले व सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने बहुजनांच्या मुला-मुलींसाठी शिक्षण प्रसाराचे कार्य केले. हे करत असताना त्यांना त्याकाळी समाजात अनेक संकटांना सामोरे जावे लागले. तरीही फुले दाम्पत्याने आपले ज्ञानदानाचे काम कोणताही जातीभेद न करता सुरू ठेवले. त्यांच्या या ज्ञानदानामुळेच आजची स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊनकाम करताना दिसत आहे. पूर्वीच्या अनेक अनिष्ट प्रथा बंद करून चांगल्या रुढी व परंपरा उदयास आणल्या. तसेच शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा, यासाठी ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ ही संकल्पना त्यांनीच मांडली. त्या विचारसरणीनुसार आजही जलसंधारणाची कामे केली जात आहेत. महात्मा फुले यांचे शिक्षण व शेती क्षेत्रातील प्रेरणादायी आहे. कटगुण येथील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा परिषद सर्वतोपरी सहकार्य करेल,’ असेही ते म्हणाले. (वार्ताहर)शिल्पसृष्टी साकारल्यास प्रेरणा मिळेल‘कटगुण ही महात्मा जोतिबा फुले यांनी कुलभूमी आहे. गोरगरिबांच्या शिक्षणासाठी व शेतकऱ्यांच्या भल्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. त्यांच्या कार्याचा अन् विचाराचा वारसा जपण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे. कटगुण येथे महात्मा फुले यांची शिल्पसृष्टी उभारल्यास यापासून सर्वांनाच प्रेरणा मिळेल. शिल्पसृष्टी साकारण्यासाठी लवकरात-लवकर ठोस निर्णय घ्यावे,’ असे मत ग्रामस्थ विपुल गायकवाड यांनी व्यक्त केले.