शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

Vidhan Sabha Election 2024: उमेदवार शब्दाला जागले, तर सांगलीचं शांघाय होईल; घोषणांचा पाऊस अवकाळी न ठरो 

By संतोष भिसे | Updated: November 16, 2024 17:55 IST

चांगल्या सांगलीची स्वप्नेच किती दिवस?

संतोष भिसेसांगली : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात गेल्या दोन आठवड्यांत सर्वच मतदारसंघांतील उमेदवारांनी घोषणा आणि आश्वासनांचा अक्षरश: पाऊस पाडला आहे. हा पाऊस अवकाळी ठरला नाही आणि सगळेच उमेदवार शब्दाला जागले, तर सांगलीचं शांघाय होण्यास वेळ लागणार नाही.अर्थात, गेल्या २५-३० वर्षांपासून जिल्ह्याच्या अनेक प्रश्नांचे घोंगडे भिजतच ठेवणाऱ्या बोलघेवड्या उमेदवारांची ही आश्वासने म्हणजे `बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात आहे` हे मतदार चांगलेच ओळखून आहेत. सांगलीच्या शेरीनाल्याचा प्रश्न वर्षानुवर्षे सोडवू न शकलेले लोकप्रतिनिधी सांगलीकरांना गटारीचे पाणी पाजण्याचे पाप करीत आहेत याचीही जाण मतदारांना आहे. पण `उडदामाजी काळेगोरे` म्हणत मतदान करत आहेत.उमेदवार म्हणाले, `सांगलीत आयटी पार्क उभा करू`, तेव्हा मतदारांनी आपली मुले आयटीमध्ये ऐटीत जातानाची स्वप्ने पाहिली. दिल्ली-मुंबईतील नेते विकासाचा कैवार घेऊन सांगलीच्या वेशीवर धडकले. कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प लोकांसमोर सजवून-धजवून ठेवले. ते पाहून लोक त्यांना निवडून देतीलही, पण सांगलीचा शांघाय खरोखरच होणार का? याची प्रतीक्षा त्यांना राहील. निवडून आलेले मंत्री होतील, मुख्यमंत्रीही होतील, पण सांगलीकरांची माफक अपेक्षा इतकीच की कृष्णेत मिसळणारे सांगलीतील गटारीचे पाणी थांबावे.हाडे खिळखिळी न होता पेठपर्यंत प्रवास करता यावा. कोल्हापूरपर्यंत वाहतूक कोंडीत न अडकता जाता यावे, पदवी मिळविलेल्या पोराला सांगलीतच चांगली नोकरी मिळावी आणि उतारवयातील आईवडिलांना सांभाळत तो गावातच रहावा. सांगलीचे अगदीच शांघाय झाले नाही, तरी `चांगली सांगली` बनविणे तरी मुश्किल नक्कीच नाही.

विमानतळ जोरातचकवलापुरात होणार होणार म्हणून गेली अनेक वर्षे सांगलीकरांच्या स्वप्नात दिसणाऱ्या विमानतळालाही नेत्यांनी `दे धक्का` देण्याचा प्रयत्न केला. नेत्यांची हेलिकॉप्टरे कवलापूरच्या माळावर धूळ उडवत उतरली, धूळ उडवत उडून गेली. जाताना सांगलीकरांच्या स्वप्नाला गुलाबी रंग देऊन गेली.

आम्ही `हे` करू आणि `ते` करूगेल्या पंधरवड्याभरात उमेदवारांनी उघडलेल्या आश्वासनांच्या पोतडीकडे नजर टाकली असता शिळ्या कढीलाच ऊत आणण्याचा प्रयत्न सर्वत्र दिसतो. ताकारी, म्हैसाळ, टेंभू, आरफळ, वाकुर्डे आदी पाणीयोजना या निवडणुकीतही चलनी नाण्यासारख्या वापरल्या गेल्या. शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र, एमआयडीसीची उभारणी व तरुणांना रोजगार, महिलांसाठी उद्योग ही गाजरेदेखील मतदारांना दाखविण्यात आली. शेतमालाला भाव, लाजिस्टिक पार्क, ड्रायपोर्ट, महागाई, महिलांचे संरक्षण, गुन्हेगारी हे पत्तेदेखील जोरात चालविण्यात आले. उमेदवारांच्या तोंडभरल्या घोषणा मतदारांनी मन लावून ऐकल्या आणि जोरजोराने टाळ्यादेखील वाजविल्या; पण ते आता कोणाला गुलालाचा मानकरी ठरविणार आणि कोणाला घरात बसविणार हे दि. २३ नोव्हेंबर रोजी कळेल.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sangli-acसांगलीwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024