शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha Election 2024: उमेदवार शब्दाला जागले, तर सांगलीचं शांघाय होईल; घोषणांचा पाऊस अवकाळी न ठरो 

By संतोष भिसे | Updated: November 16, 2024 17:55 IST

चांगल्या सांगलीची स्वप्नेच किती दिवस?

संतोष भिसेसांगली : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात गेल्या दोन आठवड्यांत सर्वच मतदारसंघांतील उमेदवारांनी घोषणा आणि आश्वासनांचा अक्षरश: पाऊस पाडला आहे. हा पाऊस अवकाळी ठरला नाही आणि सगळेच उमेदवार शब्दाला जागले, तर सांगलीचं शांघाय होण्यास वेळ लागणार नाही.अर्थात, गेल्या २५-३० वर्षांपासून जिल्ह्याच्या अनेक प्रश्नांचे घोंगडे भिजतच ठेवणाऱ्या बोलघेवड्या उमेदवारांची ही आश्वासने म्हणजे `बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात आहे` हे मतदार चांगलेच ओळखून आहेत. सांगलीच्या शेरीनाल्याचा प्रश्न वर्षानुवर्षे सोडवू न शकलेले लोकप्रतिनिधी सांगलीकरांना गटारीचे पाणी पाजण्याचे पाप करीत आहेत याचीही जाण मतदारांना आहे. पण `उडदामाजी काळेगोरे` म्हणत मतदान करत आहेत.उमेदवार म्हणाले, `सांगलीत आयटी पार्क उभा करू`, तेव्हा मतदारांनी आपली मुले आयटीमध्ये ऐटीत जातानाची स्वप्ने पाहिली. दिल्ली-मुंबईतील नेते विकासाचा कैवार घेऊन सांगलीच्या वेशीवर धडकले. कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प लोकांसमोर सजवून-धजवून ठेवले. ते पाहून लोक त्यांना निवडून देतीलही, पण सांगलीचा शांघाय खरोखरच होणार का? याची प्रतीक्षा त्यांना राहील. निवडून आलेले मंत्री होतील, मुख्यमंत्रीही होतील, पण सांगलीकरांची माफक अपेक्षा इतकीच की कृष्णेत मिसळणारे सांगलीतील गटारीचे पाणी थांबावे.हाडे खिळखिळी न होता पेठपर्यंत प्रवास करता यावा. कोल्हापूरपर्यंत वाहतूक कोंडीत न अडकता जाता यावे, पदवी मिळविलेल्या पोराला सांगलीतच चांगली नोकरी मिळावी आणि उतारवयातील आईवडिलांना सांभाळत तो गावातच रहावा. सांगलीचे अगदीच शांघाय झाले नाही, तरी `चांगली सांगली` बनविणे तरी मुश्किल नक्कीच नाही.

विमानतळ जोरातचकवलापुरात होणार होणार म्हणून गेली अनेक वर्षे सांगलीकरांच्या स्वप्नात दिसणाऱ्या विमानतळालाही नेत्यांनी `दे धक्का` देण्याचा प्रयत्न केला. नेत्यांची हेलिकॉप्टरे कवलापूरच्या माळावर धूळ उडवत उतरली, धूळ उडवत उडून गेली. जाताना सांगलीकरांच्या स्वप्नाला गुलाबी रंग देऊन गेली.

आम्ही `हे` करू आणि `ते` करूगेल्या पंधरवड्याभरात उमेदवारांनी उघडलेल्या आश्वासनांच्या पोतडीकडे नजर टाकली असता शिळ्या कढीलाच ऊत आणण्याचा प्रयत्न सर्वत्र दिसतो. ताकारी, म्हैसाळ, टेंभू, आरफळ, वाकुर्डे आदी पाणीयोजना या निवडणुकीतही चलनी नाण्यासारख्या वापरल्या गेल्या. शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र, एमआयडीसीची उभारणी व तरुणांना रोजगार, महिलांसाठी उद्योग ही गाजरेदेखील मतदारांना दाखविण्यात आली. शेतमालाला भाव, लाजिस्टिक पार्क, ड्रायपोर्ट, महागाई, महिलांचे संरक्षण, गुन्हेगारी हे पत्तेदेखील जोरात चालविण्यात आले. उमेदवारांच्या तोंडभरल्या घोषणा मतदारांनी मन लावून ऐकल्या आणि जोरजोराने टाळ्यादेखील वाजविल्या; पण ते आता कोणाला गुलालाचा मानकरी ठरविणार आणि कोणाला घरात बसविणार हे दि. २३ नोव्हेंबर रोजी कळेल.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sangli-acसांगलीwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024