शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Vidhan Sabha Election 2024: उमेदवार शब्दाला जागले, तर सांगलीचं शांघाय होईल; घोषणांचा पाऊस अवकाळी न ठरो 

By संतोष भिसे | Updated: November 16, 2024 17:55 IST

चांगल्या सांगलीची स्वप्नेच किती दिवस?

संतोष भिसेसांगली : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात गेल्या दोन आठवड्यांत सर्वच मतदारसंघांतील उमेदवारांनी घोषणा आणि आश्वासनांचा अक्षरश: पाऊस पाडला आहे. हा पाऊस अवकाळी ठरला नाही आणि सगळेच उमेदवार शब्दाला जागले, तर सांगलीचं शांघाय होण्यास वेळ लागणार नाही.अर्थात, गेल्या २५-३० वर्षांपासून जिल्ह्याच्या अनेक प्रश्नांचे घोंगडे भिजतच ठेवणाऱ्या बोलघेवड्या उमेदवारांची ही आश्वासने म्हणजे `बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात आहे` हे मतदार चांगलेच ओळखून आहेत. सांगलीच्या शेरीनाल्याचा प्रश्न वर्षानुवर्षे सोडवू न शकलेले लोकप्रतिनिधी सांगलीकरांना गटारीचे पाणी पाजण्याचे पाप करीत आहेत याचीही जाण मतदारांना आहे. पण `उडदामाजी काळेगोरे` म्हणत मतदान करत आहेत.उमेदवार म्हणाले, `सांगलीत आयटी पार्क उभा करू`, तेव्हा मतदारांनी आपली मुले आयटीमध्ये ऐटीत जातानाची स्वप्ने पाहिली. दिल्ली-मुंबईतील नेते विकासाचा कैवार घेऊन सांगलीच्या वेशीवर धडकले. कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प लोकांसमोर सजवून-धजवून ठेवले. ते पाहून लोक त्यांना निवडून देतीलही, पण सांगलीचा शांघाय खरोखरच होणार का? याची प्रतीक्षा त्यांना राहील. निवडून आलेले मंत्री होतील, मुख्यमंत्रीही होतील, पण सांगलीकरांची माफक अपेक्षा इतकीच की कृष्णेत मिसळणारे सांगलीतील गटारीचे पाणी थांबावे.हाडे खिळखिळी न होता पेठपर्यंत प्रवास करता यावा. कोल्हापूरपर्यंत वाहतूक कोंडीत न अडकता जाता यावे, पदवी मिळविलेल्या पोराला सांगलीतच चांगली नोकरी मिळावी आणि उतारवयातील आईवडिलांना सांभाळत तो गावातच रहावा. सांगलीचे अगदीच शांघाय झाले नाही, तरी `चांगली सांगली` बनविणे तरी मुश्किल नक्कीच नाही.

विमानतळ जोरातचकवलापुरात होणार होणार म्हणून गेली अनेक वर्षे सांगलीकरांच्या स्वप्नात दिसणाऱ्या विमानतळालाही नेत्यांनी `दे धक्का` देण्याचा प्रयत्न केला. नेत्यांची हेलिकॉप्टरे कवलापूरच्या माळावर धूळ उडवत उतरली, धूळ उडवत उडून गेली. जाताना सांगलीकरांच्या स्वप्नाला गुलाबी रंग देऊन गेली.

आम्ही `हे` करू आणि `ते` करूगेल्या पंधरवड्याभरात उमेदवारांनी उघडलेल्या आश्वासनांच्या पोतडीकडे नजर टाकली असता शिळ्या कढीलाच ऊत आणण्याचा प्रयत्न सर्वत्र दिसतो. ताकारी, म्हैसाळ, टेंभू, आरफळ, वाकुर्डे आदी पाणीयोजना या निवडणुकीतही चलनी नाण्यासारख्या वापरल्या गेल्या. शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र, एमआयडीसीची उभारणी व तरुणांना रोजगार, महिलांसाठी उद्योग ही गाजरेदेखील मतदारांना दाखविण्यात आली. शेतमालाला भाव, लाजिस्टिक पार्क, ड्रायपोर्ट, महागाई, महिलांचे संरक्षण, गुन्हेगारी हे पत्तेदेखील जोरात चालविण्यात आले. उमेदवारांच्या तोंडभरल्या घोषणा मतदारांनी मन लावून ऐकल्या आणि जोरजोराने टाळ्यादेखील वाजविल्या; पण ते आता कोणाला गुलालाचा मानकरी ठरविणार आणि कोणाला घरात बसविणार हे दि. २३ नोव्हेंबर रोजी कळेल.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sangli-acसांगलीwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024