शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

सांगली जिल्ह्यात महापुराची मगरमिठी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:25 IST

सांगली : जिल्ह्यासह धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाने विश्रांती घेतली तरी वारणा, कृष्णा नदीच्या महापुराचा विळखा अद्याप कायम आहे. महापुराच्या ...

सांगली : जिल्ह्यासह धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाने विश्रांती घेतली तरी वारणा, कृष्णा नदीच्या महापुराचा विळखा अद्याप कायम आहे. महापुराच्या कचाट्यात हजारो लोक अडकले असल्याने त्यांच्या बचावकार्यासाठी लष्करी जवान, सामाजिक संघटनांनी प्रयत्न चालविले आहेत. रविवारीही जिल्ह्यात पावसाने दिवसभर उघडीप दिली होती, तरीही महापुराने निर्माण झालेले चिंतेचे ढग कायम आहेत.

जिल्ह्यात रविवारी दिवसभरात कृष्णा व वारणा नदीच्या पाणीपात्रात काहीठिकाणी घट तर काहीठिकाणी वाढ झाली आहे. सांगलीतील आयर्विन पुलाजवळील पाणीपातळी बारा तासात ५२ फुटांवरुन ५५ फुटांपर्यंत गेली. त्यामुळे गावठाणासह शहराच्या अनेक उपनगरांमध्ये पाणी शिरले. सांगलीसह सांगलीवाडी, हरीपूर, मिरज, अंकली याठिकाणच्या पाणी पातळीतही रविवारी दुपारपर्यंत वाढ झाली होती. त्यामुळे अनेक लोकांचे स्थलांतर करण्यात आले. अद्याप हजारो लोक महापुराच्या कचाट्यात सापडले असून, त्यांच्या सुटकेसाठी जवानांमार्फत रविवारी दिवसभर बचावकार्य सुरु होते.

वारणा धरणातील विसर्ग रविवारी दुपारी १ वाजेपर्यंत ८ हजार ७२० क्युसेकने तर कोयनेतून ३१ हजार ३३२ क्युसेकने विसर्ग सुरु होता. विसर्ग कमी झाल्याने रविवारी रात्रीपासून नद्यांची पाणीपातळी मंदगतीने उतरण्यास सुरुवात झाली.

लोकांचे स्थलांतर रविवारी तिसऱ्या दिवशीही सुरुच होते. आजपर्यंत दीड लाखांवर लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. त्यांची सोय निवारा केंद्रांमध्ये करण्यात आली आहे. सामाजिक, राजकीय संघटनांकडून त्यांना मदतीचा हात दिला जात आहे.

चौकट

धरण क्षेत्रात पावसाची उघडझाप

कोयना व वारणा धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासांत पावसाची उघडझाप सुरु आहे. कधी अतिवृष्टी तर कधी पूर्ण उघडीप असे चित्र दिसत आहे. तरीही सलग पाऊस नसल्याने पुराच्या तीव्रतेचा धोका कमी झाला आहे.

चौकट

सांगलीचे गणपती मंदिर पाण्यात

सांगलीतील गणपती मंदिरात २०१९मध्ये महापुराचे पाणी शिरले होते. रविवारी सांगलीतील नदीपातळी ५४ फुटांवर गेल्यानंतर मंदिरात पाणी शिरले.

चौकट

सांगलीतील हे भाग पाण्यात

गणपती पेठ, गणपती मंदिर, राजवाडा परिसर, स्टेशन रोड, स्टेशन चौक, एस. टी. स्टँड, सांगलीवाडी, गावभाग, इंद्रप्रस्थ नगर, आमराई, वखारभाग, माधव नगर रोडवरील शासकीय विश्रामगृह, राम नगर, मीरा हाऊसिंग सोसायटी आदी भागात रविवारी पाणी शिरले.

चौकट

पाचही तालुक्यांत पूरस्थिती

वाळवा, शिराळा, पलूस, कडेगाव, मिरज तालुक्यांमधील पूरस्थिती अद्याप कायम आहे. वारणा व कृष्णा नद्यांच्या पाणी पातळीत हळूहळू घसरण होत आहे. त्यामुळे परिस्थिती पूर्वपदावर येण्यास वेळ लागणार आहे.

चौकट

सांगलीत महापूर ओसरु लागला

सांगलीत दिवसभरात पाणीपातळी ५५ फुटांवर जाऊन सायंकाळी सहा वाजता दोन इंचाने कमी झाली. महापूर ओसरु लागला असला तरी त्याची गती अत्यंत कमी आहे.