शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
2
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
3
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
4
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
5
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
7
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
8
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
9
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
10
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
11
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
12
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
13
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
14
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव
15
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
16
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
18
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
19
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
20
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?

४९ वर्षांचा अखंड प्रवास, ११ मे १९७१ ला पहिल्यांदा धावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 18:05 IST

कोल्हापूर आणि मिरजेत इंजिन वळवण्याचे काम कर्मचाऱ्यांना करावे लागे. सुटे इंजिन एका विहिरीसदृश खड्ड्यावर थांबवून मोटर किंवा कर्मचाºयांच्या ताकदीने १८० अंशात फिरवले जायचे. कोल्हापूर स्थानकात अजूनही हा खड्डा दिसतो.

ठळक मुद्दे महालक्ष्मी एक्स्प्रेसचे सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पणपश्चिम महाराष्ट्राची विकासवाहिनी

संतोष भिसे।सांगली : पश्चिम महाराष्ट्राची विकासवाहिनी ठरलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसने ११ मेरोजी अखंड प्रवासाची ४९ वर्षे पूर्ण केली. कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूरदरम्यान लाखो प्रवाशांना सुरक्षित प्रवास घडवणाऱ्या महालक्ष्मीचा सुवर्णमहोत्सवी प्रवास सुरू झाला आहे. प्रवाशांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची आणि मध्य रेल्वेला अभिमानाची असणारी ‘महालक्ष्मी’ पश्चिम महाराष्ट्रासाठी जणू विकासवाहिनीच ठरली आहे.

मिरज-कोल्हापूर लोहमार्गाच्या ब्रॉडगेजनंतर ११ मे १९७१ रोजी महालक्ष्मी एक्स्प्रेस पहिल्यांदा धावली. त्यावेळी स्लिपरबर्थ नसल्याने प्रथम श्रेणीच्या डब्यातच बर्थवर झोपावे लागायचे. आसने लाकडाची आणि इंजिन कोळशाचे होते. कºहाड आणि वाठारमध्ये कोळसा व पाण्यासाठी थांबा घ्यावा लागायचा. संध्याकाळी पाच वाजता कोल्हापुरातून निघून मुंबईत त्यावेळच्या व्हिक्टोरिया टर्मिनसला दुसºयादिवशी दुपारी साडेबाराला पोहोचायची. कोल्हापूर आणि मिरजेत इंजिन वळवण्याचे काम कर्मचाऱ्यांना करावे लागे. सुटे इंजिन एका विहिरीसदृश खड्ड्यावर थांबवून मोटर किंवा कर्मचाºयांच्या ताकदीने १८० अंशात फिरवले जायचे. कोल्हापूर स्थानकात अजूनही हा खड्डा दिसतो.

ही गाडी हुबळी विभागाकडून मुंबईला ३०४ व परतताना ३०३ क्रमांकासह धावायची. कालांतराने क्रमांक ७४११ व ७४१२, १०११ आणि १०१२ झाले. सध्या १७४११ व १७४१२ असा या एक्स्प्रेसचा क्रमांक आहे. सत्तरच्या दशकात बेंगलोरहून थेट मुंबईला पुरेशा गाड्या नव्हत्या. कर्नाटकातील प्रवासी हुबळी-मिरज पॅसेंजरने मिरजेत येऊन पुढे महालक्ष्मीमधून मुंबईला जायचे.

कोल्हापूर-सांगलीकरांसाठी महालक्ष्मी अभिमानाची. महालक्ष्मीने मुंबईला जाणे हा जणू विमानप्रवासाचा अनुभव असे. काळ बदलला तरी महालक्ष्मीची ‘क्रेझ’ कायम आहे. बाराही महिने तिचे आरक्षण फुल्ल असते. अत्यंत किरकोळ दुर्घटनांचा अपवाद करता ती अखंड धावत आहे. आजवर कोट्यवधींचे उत्पन्न महालक्ष्मी एक्स्प्रेसने रेल्वेला मिळवून दिले आहे.

महालक्ष्मी-तिरुपतीचा भावनिक बंधमहालक्ष्मी एक्स्प्रेसला हरिप्रियाचे कनेक्शन दिल्याने महालक्ष्मी-बालाजीचा भावनिक बंधही तयार झाला आहे. मुंबईहून येणारी महालक्ष्मी दुपारी हरिप्रिया एक्स्प्रेस म्हणून तिरुपतीला निघते.

वायंगणीची दुर्घटनागतवर्षी २७ जुलै २०१९ रोजी बदलापूरजवळ वायंगणी येथे उल्हास नदीच्या महापुरात महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकून पडली होती. हवाई दलाच्या मदतीने आॅपरेशन महालक्ष्मी राबविण्यात आले. महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या इतिहासात ही दुर्घटना कधीही न विसरण्यासारखी आहे.

कोट्यवधींचे उत्पन्न दिलेकोल्हापूर-सांगलीकरांसाठी महालक्ष्मी अभिमानाची. ठरली आहे. आजवर कोट्यवधींचे उत्पन्न रेल्वेला मिळवून दिले आहे.

उद्घाटन : ११ मे १९७१प्रवास : ५१८ कि.मी.वेळ : १०.५७ तासक्रमांक : १७४११, येताना १८ थांबेक्रमांक : १७४१२, जाताना १९ थांबेसरासरी गती : ४७.३८ कि.मी./प्रति तासकमाल गती : ११० कि.मी./प्रति तास

टॅग्स :railwayरेल्वेkolhapurकोल्हापूरbusinessव्यवसाय