शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

आरग मतदारसंघात यंदा महिलाराज

By admin | Updated: January 10, 2017 23:07 IST

तिरंगी लढतीचे संकेत : काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप सज्ज, महिला आरक्षणामुळे स्थानिक नेत्यांचा अपेक्षाभंग

संजय माने, मोहन मगदूम ल्ल टाकळी, लिंगनूरमिरज तालुक्यातील आरग जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण महिलांसाठी राखीव असल्याने महिलाराज येणार आहे. आरक्षणामुळे अपेक्षाभंग झालेल्या स्थानिक नेत्यांनी समर्थक उमेदवार देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजप अशी तिरंगी लढत होण्याचे संकेत आहेत. आरग जिल्हा परिषद गटात आरग, लक्ष्मीवाडी, शिंदेवाडी, खटाव, लिंगनूर, संतोषवाडी, जानराववाडी या गावांचा समावेश आहे. हा गट इतर मागास महिलेसाठी राखीव असल्याने लिंगनूरचे काँग्रेसचे समन्वयक आर. आर. पाटील यांच्या पत्नी वीणाताई पाटील, ग्रामपंचायत सदस्या जनाबाई पाटील व आरगमधून सोसायटीचे अध्यक्ष मौलाअली मुजावर यांच्या पत्नी अ‍ॅड. रूबीनाबी मुजावर, माजी सभापती कविता माळी, रेखा अशोकराव सायमोते, संगीता सर्जेराव नाईक (खटाव) इच्छुक आहेत. पंचायत समितीच्या दोन्ही गणात सर्वसाधारण महिलेचे आरक्षण आहे. आरग गणातून लक्ष्मीवाडीचे सरपंच वसंत खोत यांच्या पत्नी शोभा खोत, आरगचे माजी सरपंच एस. आर. पाटील यांच्या पत्नी सुनीता पाटील, सोनाली आबासाहेब पाटील, तर खटाव गणातून ग्रामपंचायत सदस्या कविता प्रकाश मालगावे, काँग्रेसचे रावसाहेब बेडगे यांच्या पत्नी व लिंगनूर येथील नलवडे गटातून महिला रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.येथे पक्षीय राजकारणाला महत्त्व असल्याने पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या प्रचारात आघाडी घेण्याच्या तयारीत कार्यकर्ते आहेत. त्यामुळे उमेदवार कोण, कोण असणार, याकडे लक्ष आहे. मागील निवडणुकीत स्थानिक नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे आरग गटात प्रकाश देसाई बिनविरोध निवडून आले होते. संपूर्ण जिल्ह्यात याची चर्चा झाली होती. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप स्वतंत्र लढण्याच्या मन:स्थितीत असल्याने चुरशीच्या होणाऱ्या तिरंगी लढतीत कार्यकर्त्यांसह नेत्यांना कसरत करावी लागणार आहे. आरग येथे आ. सुरेश खाडे यांनी विकासकामे केल्याने स्थानिक नेते भाजपच्या संपर्कात आहेत. त्यामुळे कॉँग्रेस व राष्ट्रवादीला भाजपचे आव्हान असणार आहे. आरक्षणामुळे मतदारांचा कौल व नेतेमंडळींची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. जिल्हा परिषद मतदार संघातील लोकसंख्येने मोठे असलेल्या आरग ग्रामपंचायतीवर सध्या सर्वपक्षीय गटाची सत्ता आहे. मागील ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वपक्षीय नेतृत्व मानणाऱ्या पहिल्या फळीतील कार्यकर्त्यांनी सोयीनुसार स्वतंत्र दोन पॅनेल उभी केली होती. त्यात राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांना मानणारे कार्यकर्ते होते. यामध्ये अरुण गतारे, प्रकाश देसाई, आबासाहेब पाटील, अशोक विभूते, स्वाभिमानी शेकतरी संघटनेचे बी. आर. पाटील यांनी आठ जागांवर विजय मिळविला होता, तर विरोधी पॅनेलमधून सागर वडगावे, गोविंद पाटील, डॉ. रमेश आरगे, डॉ. संतोष वाले, एस. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली नऊ उमेदवार निवडून आले होते, मात्र आरक्षणामुळे सरपंचपद विरोधी गटाकडे गेले. लिंगनूर, खटाव, लक्ष्मीवाडी, शिंदेवाडी येथे भाजप, राष्ट्रवादी व काँग्रेसला मानणारे गट आहेत. आ. जयंत पाटील व माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या भूमिकेवरही या मतदार संघाचे समीकरण अवलंबून आहे. निवडणुक जाहीर झाल्यानंतरच येथील समिकरणे स्पष्ट होणार आहेत. याकडे आता लक्ष लागले आहे. गतवेळी गट तट बाजूला$$्निगतवेळी आरग जि. प. मतदार संघात गटतट बाजूला ठेवून बिनविरोध निवडणूक पार पाडण्याचा विक्रम स्थानिक नेत्यांनी केला. त्यामुळे प्रकाश देसाई यांच्याकडे नेतृत्व आले. त्यांना खेचण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीने जोरदार प्रयत्न केले होते. त्यात काँग्रेसला यश मिळाले. .