शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
3
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
4
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
5
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
6
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
7
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
8
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
9
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
10
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
11
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
12
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
13
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
14
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
15
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
16
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
17
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
18
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
19
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
20
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...

नुकसान तीनशे कोटी, मिळाले २0 कोटी

By admin | Updated: March 30, 2015 00:18 IST

८० लाख परत : गतवर्षातील स्थिती, शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच

सांगली : गतवर्षात अवकाळी पावसाने द्राक्षे, बेदाणा, डाळिंब बागांसह इतर पिकांचे तीनशे कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले असताना, शासनाकडून १९ कोटी ९९ लाख ८५ हजारांचे वाटप करण्यात आले. यामधील ८० लाख रुपये परत गेले असून, याचा लाभ २३ हजार ८०० शेतकऱ्यांना झाला आहे.सांगली जिल्ह्यामध्ये २०१३-१४ मध्ये अतिवृष्टी व गारपिटीचा फटका शेतकऱ्यांना बसला होता. पाच ते सहा वेळा झालेल्या अवकाळी पावसाने सुमारे २५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. याचे वेळोवेळी प्रशासनाकडून पंचनामे करण्यात आले होते. पंचनामे केवळ नजरअंदाजाने करण्यात आले, प्रत्यक्ष बांधावर जाऊन पंचनामे झाले नाहीत, अशा तक्रारी शेतकऱ्यांकडून करण्यात आल्या होत्या. राज्यात आघाडी सरकार होते. सांगली जिल्ह्यातील मंत्र्यांचा राज्य शासनामध्ये चांगला दबाव असल्यामुळे व त्याचबरोबर मदत व पुनर्वसन खात्याचे मंत्री डॉ. पतंगराव कदम सांगली जिल्ह्याचे असल्यामुळे अवकाळीग्रस्तांसाठी तात्काळ मदत जाहीर करण्यात आली. नुकसानीपोटी २१ कोटी ५१ लाख ३७ हजारांची मदत सांगली जिल्ह्याला वेळोवेळी प्राप्त झाली. यामधील या वर्षात १९ कोटी ९९ लाख ८५ हजारांचे प्रत्यक्षात वाटप करण्यात आले. यामधील ८० लाख रुपये विविध कारणांमुळे परत गेले. यामध्ये बँक खाते नसणे, लाभार्थी नसणे, नुकसान सिध्द झालेले नसणे आदी कारणे आहेत. गतवर्षात महसूल व शेती विभागाकडून झालेले नुकसानीचे पंचनामे केवळ नजरअंदाजाने करण्यात आले, प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांनी शेतीला भेट दिली नाही, अशा अनेक तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. द्राक्षे, बेदाणा व डाळिंबासह रब्बी पिकांचे तीनशे कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले होते. याबाबत शेतकरी संघटनांनी तशा भरपाईची मागणीही शासन व प्रशासनाकडे केली होती. मदतीचे वाटप टप्प्या-टप्प्याने झाल्याने या नुकसानीबाबत नंतर तक्रारी झाल्या नाहीत. (प्रतिनिधी)तीन कोटी रुपये प्राप्त २०१४ च्या डिसेंबर व नोव्हेंबर महिन्यात अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी तीन कोटी २७ मार्च रोजी प्रशासनाला प्राप्त झाले. या दोन महिन्यात सुमारे २० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यासाठी चार कोटी रुपये राज्य शासनाने मंजूर केले असून, त्यापैकी तीन कोटी रुपये आता प्राप्त झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम लवकरच जमा करण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाने दिली.