शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

Lok Sabha Election 2019 सर्वात मोठी आॅफर पडळकरांनाच दिली होती: चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 23:31 IST

सांगली : गोपीचंद पडळकरांना सर्वात मोठी आॅफर भाजपने दिली होती. तरीही त्यांनी नकार दर्शविला. त्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय ...

सांगली : गोपीचंद पडळकरांना सर्वात मोठी आॅफर भाजपने दिली होती. तरीही त्यांनी नकार दर्शविला. त्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय झालेला नाही, असे मत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी धनगर समाज मेळाव्यात व्यक्त केले.चंद्रकांत पाटील म्हणाले की, धनगर समाजाला सर्वाधिक न्याय भाजपने दिला आहे. महादेव जानकर, विकास महात्मे यांच्यासारख्या नेत्यांना केवळ भाजपनेच संधी दिली आहे. आजपर्यंतची सर्वात मोठी आॅफर गोपीचंद पडळकरांना दिली होती, मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. आता ते अन्याय झाल्याचे सांगत आहेत. आरक्षण प्रश्नावरील काम अंतिम टप्प्यात आहे. हा प्रश्न भाजपच सोडवू शकतो. गेल्या सत्तर वर्षांत कोणीही या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नव्हते. भाजपने याबाबत गांभीर्याने पावले उचलली आहेत. असे असतानाही ही बंडखोरी कशासाठी? धनगर समाजानेच आता गोपीचंद पडळकर यांना समजावून सांगावे. भाजपच्या नेत्यांनी खूप प्रयत्न करुनही ते निवडणूक लढवीत आहेत, हे चुकीचे असून, त्यांनी आजूनही योग्य तो निर्णय घ्यावा, असेही चंद्रकांत पाटील यांनी आवाहन केले आहे.सर्व जाती-धर्मांना सामावून घेत पक्षाची वाटचाल सुरू आहे. अशावेळी समाजघटकांनी, पक्षाकडून काय मिळाले यावर विचार करावा. कोणीही जातीवरून दिशाभूल करीत असतील, तर त्यांना आता समजावून सांगण्याची गरज आहे. कोणत्याही समाजाचे एकगठ्ठा मतदान कोणत्याही पक्षाला पडत नाही. त्यामुळे आम्हीसुद्धा तसा दावा करणार नाही. समाजातील महिलांना घरगुती उद्योग उभारणीबाबत, निवडणुका संपल्यानंतर योग्य धोरण आखण्यात येईल, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.यावेळी आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, महापौर संगीता खोत, माजी आमदार दिनकर पाटील, नीता केळकर, शेखर इनामदार, सुरेश आवटी आदी उपस्थित होते.भाजपला मते देण्यास सांगत नाही!भाजपला धनगर समाजाने मते द्यावीत, म्हणून मेळावा बोलावलेला नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी मेळाव्याच्या सुरुवातीलाच सांगितल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. तरीही मेळाव्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी, पडळकरांसोबत नव्हे, तर भाजपसोबत राहणार असल्याचे आश्वासन पाटील यांना दिले.राणेंना फूटपाथवरून मुख्यमंत्री पदापर्यंत नेले!भाजप-शिवसेना युतीने सामान्य लोकांना मोठ्या पदापर्यंत नेले. नारायण राणे पूर्वी फूटपाथवर झोपत होते. त्यांना बाळासाहेब ठाकरेंनी मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचविले. अशी संधी युतीशिवाय कोणतेही सरकार देऊ शकत नाही, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक