शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

Lok Sabha Election 2019 सर्वात मोठी आॅफर पडळकरांनाच दिली होती!- चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 13:28 IST

गोपीचंद पडळकरांना सर्वात मोठी आॅफर भाजपने दिली होती. तरीही त्यांनी नकार दर्शविला. त्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय झालेला नाही, असे मत महसूलमंत्री

ठळक मुद्देभाजपचा सांगलीत धनगर समाज मेळावाआरक्षणाचा प्रश्न भाजपच सोडविणार

सांगली : गोपीचंद पडळकरांना सर्वात मोठी आॅफर भाजपने दिली होती. तरीही त्यांनी नकार दर्शविला. त्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय झालेला नाही, असे मत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी धनगर समाज मेळाव्यात व्यक्त केले. 

चंद्रकांत पाटील म्हणाले की, धनगर समाजाला सर्वाधिक न्याय भाजपने दिला आहे. महादेव जानकर, विकास महात्मे यांच्यासारख्या नेत्यांना केवळ भाजपनेच संधी दिली आहे. आजपर्यंतची सर्वात मोठी आॅफर गोपीचंद पडळकरांना दिली होती, मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. आता ते अन्याय झाल्याचे सांगत आहेत. आरक्षण प्रश्नावरील काम अंतिम टप्प्यात आहे. हा प्रश्न भाजपच सोडवू शकतो. गेल्या सत्तर वर्षांत कोणीही या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नव्हते. भाजपने याबाबत गांभीर्याने पावले उचलली आहेत. असे असतानाही ही बंडखोरी कशासाठी? धनगर समाजानेच आता गोपीचंद पडळकर यांना समजावून सांगावे.

भाजपच्या नेत्यांनी खूप प्रयत्न करुनही ते निवडणूक लढवीत आहेत, हे चुकीचे असून, त्यांनी आजूनही योग्य तो निर्णय घ्यावा, असेही चंद्रकांत पाटील यांनी आवाहन केले आहे.सर्व जाती-धर्मांना सामावून घेत पक्षाची वाटचाल सुरू आहे. अशावेळी समाजघटकांनी, पक्षाकडून काय मिळाले यावर विचार करावा. कोणीही जातीवरून दिशाभूल करीत असतील, तर त्यांना आता समजावून सांगण्याची गरज आहे. कोणत्याही समाजाचे एकगठ्ठा मतदान कोणत्याही पक्षाला पडत नाही. त्यामुळे आम्हीसुद्धा तसा दावा करणार नाही. समाजातील महिलांना घरगुती उद्योग उभारणीबाबत, निवडणुका संपल्यानंतर योग्य धोरण आखण्यात येईल, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 

यावेळी आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, महापौर संगीता खोत, माजी आमदार दिनकर पाटील, नीता केळकर, शेखर इनामदार, सुरेश आवटी आदी उपस्थित होते.भाजपला मते देण्यास सांगत नाही!

भाजपला धनगर समाजाने मते द्यावीत, म्हणून मेळावा बोलावलेला नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी मेळाव्याच्या सुरुवातीलाच सांगितल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. तरीही मेळाव्यातील भाजप पदाधिकाºयांनी, पडळकरांसोबत नव्हे, तर भाजपसोबत राहणार असल्याचे आश्वासन पाटील यांना दिले.

राणेंना फूटपाथवरून मुख्यमंत्री पदापर्यंत नेले!भाजप-शिवसेना युतीने सामान्य लोकांना मोठ्या पदापर्यंत नेले. नारायण राणे पूर्वी फूटपाथवर झोपत होते. त्यांना बाळासाहेब ठाकरेंनी मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचविले. अशी संधी युतीशिवाय कोणतेही सरकार देऊ शकत नाही, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

 

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsangli-pcसांगलीchandrakant patilचंद्रकांत पाटील