शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

Lok Sabha Election 2019 सर्वात मोठी आॅफर पडळकरांनाच दिली होती!- चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 13:28 IST

गोपीचंद पडळकरांना सर्वात मोठी आॅफर भाजपने दिली होती. तरीही त्यांनी नकार दर्शविला. त्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय झालेला नाही, असे मत महसूलमंत्री

ठळक मुद्देभाजपचा सांगलीत धनगर समाज मेळावाआरक्षणाचा प्रश्न भाजपच सोडविणार

सांगली : गोपीचंद पडळकरांना सर्वात मोठी आॅफर भाजपने दिली होती. तरीही त्यांनी नकार दर्शविला. त्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय झालेला नाही, असे मत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी धनगर समाज मेळाव्यात व्यक्त केले. 

चंद्रकांत पाटील म्हणाले की, धनगर समाजाला सर्वाधिक न्याय भाजपने दिला आहे. महादेव जानकर, विकास महात्मे यांच्यासारख्या नेत्यांना केवळ भाजपनेच संधी दिली आहे. आजपर्यंतची सर्वात मोठी आॅफर गोपीचंद पडळकरांना दिली होती, मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. आता ते अन्याय झाल्याचे सांगत आहेत. आरक्षण प्रश्नावरील काम अंतिम टप्प्यात आहे. हा प्रश्न भाजपच सोडवू शकतो. गेल्या सत्तर वर्षांत कोणीही या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नव्हते. भाजपने याबाबत गांभीर्याने पावले उचलली आहेत. असे असतानाही ही बंडखोरी कशासाठी? धनगर समाजानेच आता गोपीचंद पडळकर यांना समजावून सांगावे.

भाजपच्या नेत्यांनी खूप प्रयत्न करुनही ते निवडणूक लढवीत आहेत, हे चुकीचे असून, त्यांनी आजूनही योग्य तो निर्णय घ्यावा, असेही चंद्रकांत पाटील यांनी आवाहन केले आहे.सर्व जाती-धर्मांना सामावून घेत पक्षाची वाटचाल सुरू आहे. अशावेळी समाजघटकांनी, पक्षाकडून काय मिळाले यावर विचार करावा. कोणीही जातीवरून दिशाभूल करीत असतील, तर त्यांना आता समजावून सांगण्याची गरज आहे. कोणत्याही समाजाचे एकगठ्ठा मतदान कोणत्याही पक्षाला पडत नाही. त्यामुळे आम्हीसुद्धा तसा दावा करणार नाही. समाजातील महिलांना घरगुती उद्योग उभारणीबाबत, निवडणुका संपल्यानंतर योग्य धोरण आखण्यात येईल, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 

यावेळी आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, महापौर संगीता खोत, माजी आमदार दिनकर पाटील, नीता केळकर, शेखर इनामदार, सुरेश आवटी आदी उपस्थित होते.भाजपला मते देण्यास सांगत नाही!

भाजपला धनगर समाजाने मते द्यावीत, म्हणून मेळावा बोलावलेला नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी मेळाव्याच्या सुरुवातीलाच सांगितल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. तरीही मेळाव्यातील भाजप पदाधिकाºयांनी, पडळकरांसोबत नव्हे, तर भाजपसोबत राहणार असल्याचे आश्वासन पाटील यांना दिले.

राणेंना फूटपाथवरून मुख्यमंत्री पदापर्यंत नेले!भाजप-शिवसेना युतीने सामान्य लोकांना मोठ्या पदापर्यंत नेले. नारायण राणे पूर्वी फूटपाथवर झोपत होते. त्यांना बाळासाहेब ठाकरेंनी मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचविले. अशी संधी युतीशिवाय कोणतेही सरकार देऊ शकत नाही, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

 

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsangli-pcसांगलीchandrakant patilचंद्रकांत पाटील