शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

Lok Sabha Election 2019 वसंतदादांच्या नातवामागे राजारामबापूंचा पुत्र : जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 23:32 IST

वसंतदादा पाटील व राजारामबापू पाटील यांच्यात तात्त्विक वाद होते. त्यामुळे जुन्या गोष्टींचा विचार करून राजकारणात पुढे जाता येत नाही. त्यामुळे विशाल पाटील यांनी त्या गोष्टीचा विचार करू नये. लोकसभेच्या निवडणुकीत वसंतदादांच्या नातवामागे राजारामबापूंचा

ठळक मुद्देदादा-बापू वादावरून रंगली प्रचार सभा;एकसंधपणे लढण्याचा घटकपक्षांचा निर्धार

सांगली : वसंतदादा पाटील व राजारामबापू पाटील यांच्यात तात्त्विक वाद होते. त्यामुळे जुन्या गोष्टींचा विचार करून राजकारणात पुढे जाता येत नाही. त्यामुळे विशाल पाटील यांनी त्या गोष्टीचा विचार करू नये. लोकसभेच्या निवडणुकीत वसंतदादांच्या नातवामागे राजारामबापूंचा पुत्र ताकदीने उभा आहे, असे प्रतिपादन राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी केले.सांगलीच्या स्टेशन चौकात वसंतदादा स्मारकासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार व वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांच्या प्रचाराचा प्रारंभ मंगळवारी झाला. यावेळी ते बोलत होते. सभेत अनेक वक्त्यांनी दादा-बापू वादाचा विषय उपस्थित केला. त्यावरून विशाल पाटील आणि जयंत पाटील यांनी राजकीय टोलेबाजी केली.

जयंत पाटील म्हणाले की, मागच्या गोष्टींचा विचार करून कधीही राजकारणात पुढे जाता येत नाही. पुढचा विचार करून जो राजकारण करतो, तोच पुढे जात असतो. त्यामुळे विशाल पाटील यांनी वसंतदादा व राजारामबापू असा भेद मनात बाळगू नये. वसंतदादांच्या ताटात मी जेवलो आहे. वसंतदादांच्या जिल्ह्यातील सर्वात लाडका कार्यकर्ता मीच होतो. आयुष्यातील अनेक क्षण त्यांच्यासोबत घालविले आहेत. दादा व बापू यांच्यात तात्त्विक मतभेद होते. ते कधीही एकमेकांशी वैयक्तिक राग बाळगत नव्हते. बाहेरील लोक आक्रमण करू लागले की, दादा-बापू एक होत असत. आताही काही बाहेरचे लोक शहाणपणा शिकवू पाहत आहेत. त्यामुळे आपण एकत्र येण्याची गरज आहे. आपल्यातील वादाचे नंतर पाहू. विशाल पाटील, प्रतीक पाटील, शैलजाभाभी पाटील आणि मी स्वत: बसून मागील विषयांचे काय करायचे ते ठरवू. कार्यकर्त्यांनी या गोष्टीचा विचार करू नये.

विशाल पाटील म्हणाले की, दादा-बापू हा वाद आता संपुष्टात आला पाहिजे. लोकसभेची यंदाची निवडणूक या वादावर पडदा टाकणारीच आहे. माझी चूक मी मान्य करतो. आता वडीलधारे म्हणून जयंत पाटील यांनी माझ्यामागे उभे राहावे. विश्वजित कदम यांनीही मला सांभाळून घ्यावे.आ.विश्वजित कदम म्हणाले की, कदम-दादा गट असाही वाद विनाकारण निर्माण केला जातो. वास्तविक पतंगराव कदम कधीच मनात काही ठेवायचे नाहीत. मनात असेल ते बोलून मोकळे होत असत. आमचेही मन तसेच आहे. आमच्याबद्दलचे गैरसमज दूर झाल्याने आनंद वाटला. विशाल पाटील यांची चूक मान्य करण्याची पद्धत कौतुकास्पद आहे. त्यांना जिल्ह्यातील सर्वाधिक मताधिक्य पलूस-कडेगाव मतदार संघातून देण्यात येईल. पण बॅटिंग करताना मैदानात दोन बॅटस्मन असतात, हे लक्षात असू द्या. एक गेला की दुसरा व दुसरा गेला की तिसरा येतो. त्यामुळे आपल्यालाच मिळाले तरच काँग्रेसमध्ये राहू, असा विचार त्यांनी करू नये.

प्रकाश आवाडे, सदाशिवराव पाटील यांनीही, आपसातील गैरसमज दूर करून पुढे गेल्यास ही निवडणूक अवघड नाही, असे मत मांडले. यावेळी खासदार राजू शेट्टी, आ. सुमनताई पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, पी. एन. पाटील, जयश्रीताई पाटील, अरुण लाड, सत्यजित देशमुख, शैलजाभाभी पाटील, डॉ. भारत पाटणकर, अ‍ॅड. अजित सूर्यवंशी, नामदेवराव मोहिते, सुरेश पाटील, अविनाशकाका पाटील, संजय बजाज, मनोज शिंदे, कमलाकर पाटील, पद्माकर जगदाळे, ताजुद्दीन तांबोळी, जितेश कदम, उत्कर्ष खाडे, डॉ. नामदेव कस्तुरे, महेश खराडे उपस्थित होते.कमरेला पिस्तूल : म्हणजे धाडस नव्हे!खासदार संजयकाका पाटील यांनी काही दिवसांपूर्वी विशाल पाटील यांना उद्देशून, ‘संग पाहिला आता जंग पाहा’, असे आव्हान दिले होते. त्याचा समाचार घेत विशाल पाटील म्हणाले, कमरेला पिस्तूल लावून दादागिरी करण्याला धाडस म्हणत नाहीत. आ. सुमनताई पाटील यांच्यासारख्या महिलेला घरात कोंडून दगडफेक करून तुम्ही तुमची मर्दानगी दाखविली आहे. तुमची दादागिरी आम्ही तासगावात येऊन मोडू. तुम्ही माझ्या आडवे येऊ नका. वसंतदादांच्या प्रेमाची ताकद आमच्यात अजूनही अबाधित आहे. 

संजयकाका सर्व महाराजांना भेटून आले!मला उमेदवारी मिळू नये म्हणून राज्यातल्या सर्व महाराजांना संजयकाका पाटील यांनी भेटून साकडे घातले. केवळ राजू शेट्टींना ते भेटले नाहीत. म्हणून त्यांनी मला उमेदवारी दिली, असा टोला विशाल पाटील यांनी लगावला. 

साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखलविशाल पाटील यांनी राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार राजू शेट्टी, आ. सुमनताई पाटील, आ. विश्वजित कदम यांच्यासमवेत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे अर्ज दाखल केला. त्यांनी शक्तिप्रदर्शन न करता साधेपणाने अर्ज दाखल केला.सांगलीतील प्रचार सभेत बॅट उंचावून नेत्यांनी विजयाचा निर्धार व्यक्त केला. यावेळी डावीकडून सुरेश पाटील, जयश्रीताई पाटील, आ. सुमनताई पाटील, आ. जयंत पाटील, खासदार राजू शेट्टी, आ. विश्वजित कदम, अरुण लाड, विशाल पाटील, सदाशिवराव पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :sangli-pcसांगलीPoliticsराजकारणElectionनिवडणूक