शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

Lok Sabha Election 2019 एकतर्फी वाटणारा सामना दुरंगी झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 23:14 IST

श्रीनिवास नागे अवघ्या पंधरा दिवसांमध्ये सांगली मतदारसंघातील लढतीचे चित्र बदलले आणि एकतर्फी वाटणारा सामना दुरंगी झाला. त्यात तिसऱ्याने बिब्बा ...

श्रीनिवास नागेअवघ्या पंधरा दिवसांमध्ये सांगली मतदारसंघातील लढतीचे चित्र बदलले आणि एकतर्फी वाटणारा सामना दुरंगी झाला. त्यात तिसऱ्याने बिब्बा घातला! आता तो तिसरा कोणाची किती मते खाणार त्यावर निवडणुकीचा निकाल फिरणार आहे.सांगलीत भाजपाचे विद्यमान खासदार संजय पाटील यांच्यासमोर कोणाचेच आव्हान दिसत नसल्यामुळे सुरुवातीला ही लढत एकतर्फी वाटत होती. मात्र वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी ऐनवेळी रिंगणात उडी घेतली. तिकीट वाटपाच्या गोंधळानंतर ही जागा काँग्रेस आघाडीतील राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे गेली असून, त्यांची ‘बॅट’ विशाल पाटील यांनी हातात घेतली आहे. हुशार आणि आक्रमक तरुण नेते अशी ओळख असलेल्या विशाल यांच्यामुळे हा सामना दुरंगी बनला. पण त्याचवेळी धनगर समाजाच्या व्होट बँकेवर भिस्त असणाºया गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून मैदानात उतरत दुरंगी लढतीत बिब्बा घातला!रासप, भाजप ते वंचित बहुजन आघाडी असा प्रवास करणाºया पडळकर यांनी नऊ महिन्यांपूर्वी खा. पाटील यांच्या मुस्कटदाबीवर तोफ डागत भाजपला रामराम केला. नंतर धनगर समाजाच्या आरक्षणासाठी लढा उभारण्याकरिता राज्यात दौरे करून रसदही मिळवली. आता ते प्रत्यक्ष लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, धनगर, दलित आणि मुस्लिम समाजाच्या मतांवरच त्यांचा डोळा आहे. ही मते मागील निवडणुकीपर्यंत काँग्रेसकडे जात होती. मात्र संजय पाटील यांनी त्या मतांचे विभाजन करण्यात यश मिळवून ती आपल्याकडे वळवली होती. त्या व्होट बँकेला धक्का देऊन संजय पाटलांना हिसका दाखवणे, हेच पडळकरांचे मुख्य उद्दिष्ट आहे. दुसरीकडे ते आपलीही पारंपरिक मते खातील, अशी धास्ती काँग्रेस आघाडीला आहे.संजय पाटील यांनी लवकर प्रचार सुरू करण्यात बाजी मारली असून, त्यांच्या विरोधातील भाजपमधील धुसफूसही सध्या विझलेली दिसत आहे, तर विशाल पाटील यांनी विश्वजित कदम आणि राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे माफीनामा सादर करून त्यांचा अंतर्गत विरोध थंड केला आहे. तथापि संजय पाटील आणि विशाल पाटील या दोघांनीही एकमेकांवरील नाराजांवर लक्ष ठेवले आहे. त्यांना चुचकारण्यास सुरुवात केली आहे. एकमेकांच्या युती-आघाडीतील नाराजांनी आतून पुरवलेली मदत आणि पडळकरांनी खाल्लेली विरोधकाची मते त्यांना निर्णायक मतांकडे घेऊन जाईल.कळीचे मुद्देसिंचन योजनांसाठी दिलेल्या निधीचे भांडवल भाजपा करत आहे तर निधीअभावी रखडलेल्या सिंचन योजनांचा मुद्दा विरोधक उचलत आहेत.औद्योगिक विकास, धनगर समाजाचे आरक्षण, कर्जमाफी या प्रश्नांभोवती प्रचार फिरणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक