शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : जयंत पाटील यांचा वसंतदादा घराण्याला टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 11:25 IST

वसंतदादा व राजारामबापू पाटील दोघेही महान नेते होते. त्यांच्यात ४० वर्षांपूर्वी काही मतभेद असतीलही. पण माझा कुणाशीही वाद नाही. सर्वांशी चांगले संबंध आहेत. जुना वाद लोक लक्षात ठेवत नाहीत. इतिहासापेक्षा आताच्या कर्तृत्वावर जनता चर्चा करते, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी शुक्रवारी वसंतदादा घराण्याला लगावला.

ठळक मुद्देजयंत पाटील यांचा वसंतदादा घराण्याला टोलाजनता इतिहास नव्हे, सध्याचे कर्तृत्व पाहतेआघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी राहणार

सांगली : वसंतदादा व राजारामबापू पाटील दोघेही महान नेते होते. त्यांच्यात ४० वर्षांपूर्वी काही मतभेद असतीलही. पण माझा कुणाशीही वाद नाही. सर्वांशी चांगले संबंध आहेत. जुना वाद लोक लक्षात ठेवत नाहीत. इतिहासापेक्षा आताच्या कर्तृत्वावर जनता चर्चा करते, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी शुक्रवारी वसंतदादा घराण्याला लगावला.येडेमच्छिंद्र येथे राजू शेट्टी यांच्या प्रचार प्रारंभावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी, आता वसंतदादा व राजारामबापू गटातील वाद संपवून या दोन्ही गटांनी एकत्र यावे, असे आवाहन केले होते.

यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, ४० वर्षांपूर्वी दादा व बापू यांच्यामध्ये काही मुद्द्यांवरून मतभेद झाले असतील. नंतर ते मिटलेही होते. दोघे एकत्र आले होते. आता इतिहासातील घटनांना महत्त्व देण्यात अर्थ नाही.सांगलीची जागा काँग्रेसकडे होती. काँग्रेसचा उमेदवार या जागेवर सातत्याने निवडून येत होता. त्यामुळे जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडल्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांतून प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक आहे. त्यात गैर काहीच नाही. खा. राजू शेट्टी यांनी जागावाटपावेळी सात मतदारसंघांची मागणी केली होती.

राष्ट्रवादीने हातकणंगले मतदारसंघ स्वाभिमानीला दिला, तर काँग्रेसने सांगलीची जागा सोडली. त्यात माझी भूमिका काय? खा. शेट्टी सांगलीच्या उमेदवाराबाबत निर्णय घेतील. ते जो उमेदवार देतील, त्याच्या पाठीमागे आम्ही प्रामाणिकपणे उभे राहू. राष्ट्रवादीने सांगली मतदारसंघ अदलाबदलीत काँग्रेसकडून मागितला नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले.स्वाभिमानीकडून विशाल पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास प्रचार करणार का, असा प्रश्न करताच, राजकारणात जर-तरच्या प्रश्नांना काहीच अर्थ नसतो. त्यात मला स्वारस्य नाही, असे म्हणत उत्तर देण्याचे त्यांनी टाळले. दिलीपतात्या पाटील यांच्या उमेदवारीच्या चर्चेबाबतही त्यांनी भाष्य करण्याचे टाळले.सतेज पाटील यांच्याशी चर्चाकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात काँग्रेसचे माजी मंत्री सतेज पाटील यांनी भूमिका घेतली आहे. सतेज पाटील यांना आपण भेटलो आहे. त्यांनी आघाडीचा धर्म पाळावा, अशी विनंती केली आहे. त्यांचे काही प्रश्न आहेत. पण या प्रश्नांशिवाय उठून काम करण्याची वेळ आली आहे. हातकणंगलेत आवाडे गटाचीही समजूत काढली जाईल, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकJayant Patilजयंत पाटीलsangli-pcसांगली