शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

Lok Sabha Election 2019 : जयंत पाटील यांचा वसंतदादा घराण्याला टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 11:25 IST

वसंतदादा व राजारामबापू पाटील दोघेही महान नेते होते. त्यांच्यात ४० वर्षांपूर्वी काही मतभेद असतीलही. पण माझा कुणाशीही वाद नाही. सर्वांशी चांगले संबंध आहेत. जुना वाद लोक लक्षात ठेवत नाहीत. इतिहासापेक्षा आताच्या कर्तृत्वावर जनता चर्चा करते, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी शुक्रवारी वसंतदादा घराण्याला लगावला.

ठळक मुद्देजयंत पाटील यांचा वसंतदादा घराण्याला टोलाजनता इतिहास नव्हे, सध्याचे कर्तृत्व पाहतेआघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी राहणार

सांगली : वसंतदादा व राजारामबापू पाटील दोघेही महान नेते होते. त्यांच्यात ४० वर्षांपूर्वी काही मतभेद असतीलही. पण माझा कुणाशीही वाद नाही. सर्वांशी चांगले संबंध आहेत. जुना वाद लोक लक्षात ठेवत नाहीत. इतिहासापेक्षा आताच्या कर्तृत्वावर जनता चर्चा करते, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी शुक्रवारी वसंतदादा घराण्याला लगावला.येडेमच्छिंद्र येथे राजू शेट्टी यांच्या प्रचार प्रारंभावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी, आता वसंतदादा व राजारामबापू गटातील वाद संपवून या दोन्ही गटांनी एकत्र यावे, असे आवाहन केले होते.

यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, ४० वर्षांपूर्वी दादा व बापू यांच्यामध्ये काही मुद्द्यांवरून मतभेद झाले असतील. नंतर ते मिटलेही होते. दोघे एकत्र आले होते. आता इतिहासातील घटनांना महत्त्व देण्यात अर्थ नाही.सांगलीची जागा काँग्रेसकडे होती. काँग्रेसचा उमेदवार या जागेवर सातत्याने निवडून येत होता. त्यामुळे जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडल्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांतून प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक आहे. त्यात गैर काहीच नाही. खा. राजू शेट्टी यांनी जागावाटपावेळी सात मतदारसंघांची मागणी केली होती.

राष्ट्रवादीने हातकणंगले मतदारसंघ स्वाभिमानीला दिला, तर काँग्रेसने सांगलीची जागा सोडली. त्यात माझी भूमिका काय? खा. शेट्टी सांगलीच्या उमेदवाराबाबत निर्णय घेतील. ते जो उमेदवार देतील, त्याच्या पाठीमागे आम्ही प्रामाणिकपणे उभे राहू. राष्ट्रवादीने सांगली मतदारसंघ अदलाबदलीत काँग्रेसकडून मागितला नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले.स्वाभिमानीकडून विशाल पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास प्रचार करणार का, असा प्रश्न करताच, राजकारणात जर-तरच्या प्रश्नांना काहीच अर्थ नसतो. त्यात मला स्वारस्य नाही, असे म्हणत उत्तर देण्याचे त्यांनी टाळले. दिलीपतात्या पाटील यांच्या उमेदवारीच्या चर्चेबाबतही त्यांनी भाष्य करण्याचे टाळले.सतेज पाटील यांच्याशी चर्चाकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात काँग्रेसचे माजी मंत्री सतेज पाटील यांनी भूमिका घेतली आहे. सतेज पाटील यांना आपण भेटलो आहे. त्यांनी आघाडीचा धर्म पाळावा, अशी विनंती केली आहे. त्यांचे काही प्रश्न आहेत. पण या प्रश्नांशिवाय उठून काम करण्याची वेळ आली आहे. हातकणंगलेत आवाडे गटाचीही समजूत काढली जाईल, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकJayant Patilजयंत पाटीलsangli-pcसांगली