शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

Lok Sabha Election 2019 भाजपकडून ‘वंचित’ आघाडीची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 23:42 IST

जत : धनगर समाजाला भाजपने फसवले आहे. हा फसलेला समाज आपल्याला लोकसभा निवडणुकीत मतदान करणार नाही, म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र ...

जत : धनगर समाजाला भाजपने फसवले आहे. हा फसलेला समाज आपल्याला लोकसभा निवडणुकीत मतदान करणार नाही, म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतांचे विभाजन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी निर्माण केली आहे. धनगर समाजातील तरुणांनी या फसवणुकीचा बदला घेण्यासाठी निवडून येणाऱ्या उमेदवाराला मतदान करणे आवश्यक आहे, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.महाआघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ जत शहरातील गांधी चौकात आयोजित सभेत ते बोलत होते.आ. पाटील म्हणाले की, शेतीमालाला हमीभाव, कर्जमुक्ती, बेरोजगारी, धनगर आरक्षण, यासंदर्भात २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्वासन दिले होते. परंतु मागील पाच वर्षात या आश्वासनांची पूर्तता त्यांनी केली नाही. यासंदर्भात ते काहीच बोलण्यास तयार नाहीत. याशिवाय परत सत्तेवर आल्यानंतर काय करणार आहेत, तेही सांगण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी तयार नाहीत. प्रचार सभांमधून विरोधकांची निंदानालस्ती व स्थानिक नेत्यांवर टीकाटिपणी करण्यातच ते धन्यता मानून घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा कमी होत आहे, हे लक्षात आल्यानंतरच भाजपचे लोक देशातील नागरिकांच्या भावना भडकवित आहेत.आ. पाटील म्हणाले कू, विरोधी उमेदवार खासदार संजय पाटील व गोपीचंद पडळकर एकमेकांवर टीका करण्यात मग्न आहेत. एकमेकांची निंदानालस्ती करत आहेत. परंतु आम्ही गोरगरिबांच्या विकासासाठी प्रयत्न करत आहोत. देशाचा विकास व कर्तव्यापलीकडे जाऊन राजकारण केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी महाआघाडीच्या विशाल पाटील यांना मतदान करून विजयी करा.यावेळी माजी आमदार उमाजी सनमडीकर, रविकांत तुपकर, काँग्रेसचे नेते विक्रम सावंत, सुरेश शिंदे यांचीही भाषणे झाली.उत्तम चव्हाण, अ‍ॅड. चन्नाप्पा होर्तीकर, इकबाल गवंडी, कुंडलिक दुधाळ, स्वप्नील शिंदे, भूपेंद्र कांबळे, शिवाजी शिंदे, नीलेश बामणे, आप्पासाहेब बिराजदार, रमेश पाटील, महादेव पाटील, मल्लेशी कत्ती, श्रीकांत शिंदे, महादेव कोळी, रमेश पाटील, सुजय शिंदे, संतोष कोळी, तुकाराम माळी उपस्थित होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक