शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
2
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
3
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
4
Asia Cup 2025: मोहसिन नक्वींच्या हकालपट्टीची मागणी; पाकिस्तानातच जोर धरू लागली...
5
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
6
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
7
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
8
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
9
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
10
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...
11
इंजिनियरचं धक्कादायक कृत्य, आधी पत्नीची हत्या केली, त्यानंतर मित्राला केला व्हिडीओ कॉल आणि ...
12
IndiGo Bomb Threat: इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, दिल्ली विमानतळावर 'इमर्जन्सी'!
13
जेव्हा पाकिस्तान सरकारनं आपल्याच क्रिकेटर्सना चुना लावला; दिलेले चेकच बाऊन्स झाले; किती होती रक्कम? 
14
१ ऑक्टोबरपासून बदलणार इंट्राडे ट्रेडिंगचे नियम, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
15
जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना...
16
प्रेम विवाह: लग्नानंतर तुमची जोडी यशस्वी ठरेल की नाही? कुंडलीतील 'या' योगावरून मिळते उत्तर!
17
"आम्ही १५ वर्षांपासून वेगळे राहतोय...", गोविंदाच्या पत्नीचा मोठा खुलासा, सुनिता अहुजा म्हणाली...
18
संरक्षण, इन्फ्रा ते फायनान्स! 'हे' ५ शेअर्स करणार श्रीमंत! तुमच्या पोर्टफोलिओसाठी उत्तम पर्याय, टार्गेट प्राईस जाहीर
19
टीम इंडियाविरुद्ध लढवय्या वृत्ती दाखवली; पण एक धाव वाचवण्याच्या नादात करिअर संपलं हे एक अर्ध सत्य
20
नेपाळनंतर आता 'या' देशात Gen Z आंदोलनाचा झंझावात; सरकार कोसळले, राष्ट्रपतींची घोषणा...

लोकसभेला खासदारांना नव्हे, भाजपला पाठिंबा! : अनिल बाबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 21:46 IST

लोकसभा निवडणुकीसाठी खासदार संजयकाका पाटील यांना नाही, तर भाजपच्या उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याची स्पष्टोक्ती शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी तासगाव येथे दिली.

ठळक मुद्देभाजपमुळे ‘टेंभू’चा प्रश्न मार्गी लागलायापूर्वीच्या निवडणुकांतून खासदार पाटील यांची माझ्याविरोधातच भूमिका होती. मात्र तरीदेखील ते भाजपचे उमेदवार असतील,

तासगाव : लोकसभा निवडणुकीसाठी खासदार संजयकाका पाटील यांना नाही, तर भाजपच्या उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याची स्पष्टोक्ती शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी तासगाव येथे दिली. मुख्यमंत्र्यांच्या सहकार्यामुळेच माझ्या मतदारसंघातील टेंभूचा पाणीप्रश्न मार्गी लागला असल्यानेच भाजपला लोकसभेसाठी बिनशर्त पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

तासगाव तालुक्यातील २१ गावांचा खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात समावेश आहे. या गावांतील समस्या जाणून घेण्यासाठी आमदार बाबर गुरुवारी तासगाव पंचायत समितीत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आ. बाबर म्हणाले, लोकसभा निवडणुकीसाठी मी भाजपच्या उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. पण ही भूमिका खासदार संजयकाकांसाठी म्हणून नाही. भाजपकडून खासदारांसह कोणीही उमेदवार असला तरी, त्या उमेदवारास मी पाठिंबा देणार आहे. यापूर्वीच्या निवडणुकांतून खासदार पाटील यांची माझ्याविरोधातच भूमिका होती. मात्र तरीदेखील ते भाजपचे उमेदवार असतील, तर त्यांना माझा पाठिंबाच राहील. इतकेच नाही, तर विधानसभेसाठी त्यांनी कोणाला मदत करायची, हा त्यांचा प्रश्न आहे. विधानसभेची अट न ठेवता लोकसभेला बिनशर्त पाठिंबा देणार आहे.

ते म्हणाले की, जिल्हा परिषद निवडणुकीनंतर पाठिंब्यासाठी काँग्रेस-राष्टÑवादीकडून अध्यक्षपदाची ‘आॅफर’ होती. मात्र मी भाजपला पाठिंबा देण्याचा शब्द दिला होता. भाजपला पाठिंबा दिल्याने मुख्यमंत्र्यांनी मतदारसंघातील टेंभूचा प्रश्न मार्गी लावला. खानापूर, आटपाडी तालुक्यातील बहुतांश गावांचा दुष्काळ संपुष्टात आला आहे. काही गावांचा प्रश्न बाकी आहे, तोही लवकरच मार्गी लागेल. त्यामुळेच लोकसभेबाबत मी राज्यात भाजप-सेनेची युती झाली किंवा नाही झाली तरीदेखील, भाजप उमेदवारास पाठिंबा देणार आहे.काँग्रेसचे खासदार शोधण्याची वेळयापूर्वी काँग्रेसचे तत्कालीन खासदार प्रतीक पाटील यांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केले होते. मात्र निवडणुकीनंतर काँग्रेसचे खासदार शोधण्याची वेळ आली. निवडून आल्यानंतर त्यांनी साधी भेटदेखील घेतली नव्हती, अशी टीकाही यावेळी आ. बाबर यांनी केली.

टॅग्स :ElectionनिवडणूकSangliसांगलीPoliticsराजकारण