शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

पाठ्यपुस्तके शाळेत जमा करण्यास लॉकडाऊनचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:26 IST

सांगली : राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या पुस्तक पुनर्वापराचा निर्णय ...

सांगली : राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या पुस्तक पुनर्वापराचा निर्णय घेतला आहे. गेल्या शैक्षणिक वर्षात सुस्थितीत असलेली पुस्तके विद्यार्थ्यांकडून परत घेण्यात येणार आहेत, परंतु लॉकडाऊनमध्ये शाळाच बंद असल्यामुळे पुस्तके परत कशी करणार, हा प्रश्न पालकांपुढे तर ती परत घ्यायची कशी, असा प्रश्न शाळांपुढे आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांकडून ३० ते ४० टक्के पुस्तके परत मिळतील, असा अंदाज शिक्षणाधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.

शासनाकडून सर्व शिक्षा अभियानातून शासकीय व अनुदानित शाळेतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्यात येतात. त्यासाठी दरवर्षी मे महिन्यात पुस्तकांची मागणी पाठ्यपुस्तक मंडळाकडे नोंदणी केली जाते. गेल्या वर्षी शाळा सुरू झाल्या नाहीत, तरीही जून व जुलै महिन्यातच विद्यार्थ्यांना घरपोच पुस्तके पुरविण्यात आली होती. ती पुस्तके सुस्थितीत असतील, असे गृहीत धरून यंदा सुस्थितीतील पुस्तके पुनर्वापर करण्याचा निर्णय पाठ्यपुस्तक मंडळाने घेतला आहे. त्यानुसार, पुस्तकांची मागणी करण्याच्या सूचना शिक्षण विभागाला देण्यात आल्या आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून पुस्तके परत घेतले जाणार आहेत.

दरवर्षी निकाल लागण्याच्या दिवशी किंवा शाळेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांकडून पुस्तके परत घेतली जातात. यंदा मात्र शाळा बंद होत्या. निकालही लागला नाही. परिणामी, पुस्तके शाळांमध्ये परत आली नाहीत. शिक्षकांनी घरोघरी जाऊन जसे पुस्तक वाटप केले, तसेच पुस्तके परतही घेण्याचे ठरविले, तरी सध्या कोरोनाकाळ असल्याने ते किती शक्य आहे, हा प्रश्न असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली.

चौकट

पालक म्हणतात.....

शिक्षण विभागाकडून पुस्तकांची मागणी केली आहे. पुस्तके परत करायचे म्हटले, तर शाळा बंद आहेत. लॉकडाऊनमुळे घरातून बाहेर पडता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये पुस्तके परत देण्यात अडचणी आहेत. जिल्हा परिषदेने पुस्तके परत करण्यासाठी कालावधी वाढवून देण्याची गरज आहे.

- विजय मोरे, पालक.

कोट

पुस्तक पुनर्वापराचा पर्याय अगदी योग्य आहे. मात्र, तो यंदाच्या लॉकडाऊनमध्ये कितपत शक्य आहे, अशी शंका आहे. शाळाही बंद असल्यामुळे ती द्यायची तर कुठे, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. शिक्षण विभागाने पुस्तके परत करण्यासाठी मुदत वाढवून दिल्यास आम्ही देण्यास तयार आहे. पुस्तके पुनर्वापराचा निर्णय चांगला आहे.

- विष्णू पाटील, पालक.

कोट

जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना पुस्तके पुनर्वापरासाठी विद्यार्थ्यांकडून पुस्तके परत घेण्याची सूचना दिली आहे. त्यानुसार, त्यांचा शिक्षक आणि पालकांशी संपर्क सुुरू आहे. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांकडून फारसी पुस्तके मिळणार नाहीत, पण पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा पुस्तकाचा वापर चांगला असतो. यामुळे ३० ते ४० टक्केपर्यंत पुस्तके परत मिळतील, अशी अपेक्षा आहे.

-विष्णू कांबळे, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, सांगली.

चौकट

कोणत्या वर्गात किती विद्यार्थी

तालुका विद्यार्थी संख्या

पहिली ३९,५२६

दुसरी ४२,६२७

तिसरी ४३,६५८

चौथी ४३,६१५

पाचवी ४४,४८३

सहावी ४३,५३६

सातवी ४३,६०२

आठवी ४४,०९५

चौकट

अशी आहे आकडेवारी

- मागील वर्षी संच वाटप : २,३५,७७२

- या वर्षी मागणी : २,२७,५२६