शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

लिंगायत धर्ममान्यतेसाठी सोमवारी धरणे-अखिल भारतीय समन्वय समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 01:23 IST

सांगली : लिंगायत धर्ममान्यतेसाठी महाराष्ट्राच्या पुढे जाऊन कर्नाटक सरकारने ठराव करून केंद्र शासनाकडे शिफारस केली. मात्र महाराष्ट्र शासन यात वेळकाढूपणा करीत आहे

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना पत्रे पाठविणार

सांगली : लिंगायत धर्ममान्यतेसाठी महाराष्ट्राच्या पुढे जाऊन कर्नाटक सरकारने ठराव करून केंद्र शासनाकडे शिफारस केली. मात्र महाराष्ट्र शासन यात वेळकाढूपणा करीत आहे. शासनाला जाग आणण्यासाठी सोमवार, दि. २६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीचे सदस्य विश्वनाथ मिरजकर, प्रदीप वाले यांनी बुधवारी दिला.

मुख्यमंत्र्यांना समाजातील प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्यांच्या नावांसह मागणीची पत्रे पाठविण्याचे आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.मिरजकर म्हणाले, लिंगायत स्वतंत्र धर्ममान्यता, अल्पसंख्याक दर्जा व पोटजातींना आरक्षणासाठी देशभर लढा सुरू आहे. याअंतर्गत महाराष्ट्रात आघाडी आहे; मात्र कर्नाटक सरकारने नागमोहन दास समितीद्वारे स्वतंत्र धर्ममान्यतेची शिफारसही केली. परंतु महाराष्ट्र समितीने याबाबत अद्याप निर्णय घेण्यास विलंब लावत आहे. य्राज्यमंत्री विजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली तोडगा काढण्यासाठी समिती स्थापन झाली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्चशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याबाबत चर्चा झाली. तावडे यांनी अपुऱ्या पुराव्यांच्याआधारे धर्ममान्यता देता येणार नाही, असे जाहीर केले. परंतु त्यांनी येत्या अधिवेशनात चर्चा घडविण्याचे आश्वासन दिले.

वाले म्हणाले, मात्र काहीजणांनी याला खोडा घालण्यासाठी वीरशैव लिंगायत असे वेगळे वळण देऊन अडचणीचा उद्योग सुरू केला आहे. याचा आम्ही निषेध करीत आहोत. राज्य शासनाने धर्ममान्यता, अल्पसंख्याक दर्जाबाबत केंद्र शासनाला शिफारस करावी. अन्यथा देशातील ७ कोटी बांधवांना सरकारविरोधात वेगळा विचार करावा लागेल. यावेळी राजेंद कुंभार, विजयराव धुळूबुळू, अशोक कोष्टी, उद्योजक डी. के. चौगुले, संजीव पट्टणशेट्टी, संजय ठिगळे, सावंता येवारे, सचिन गाडवे, सुरेश गारे, शरद नकाते, शंकर रोकडे उपस्थित होते.जिल्हाधिकाºयांना निवेदनअखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीने राज्य शासनाला भावना कळवाव्यात यासाठी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांना निवेदन दिले. लिंगायत बोर्डिंगचे अध्यक्ष सुधीर सिंहासने म्हणाले, कर्नाटक असो वा महाराष्ट्र, कागदोपत्री पुराव्याच्याआधारे स्वतंत्र धर्म असल्याचे निष्कर्ष पुढे आले. मग केवळ महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्यावर पुराव्यांत बदल कसा होतो? वास्तविक लिंगायत महामोर्चाद्वारे समाजाच्या भावना रस्त्यावर उतरून व्यक्त होत आहेत. यामुळे राज्य शासनानेही सकारात्मक निर्णय घ्यावा. त्याद्वारे महाराष्ट्रानेही केंद्र शासनाकडे धर्ममान्यतेसाठी शिफारस करावी. अन्यथा आंदोलन वेगळी दिशा घेईल.