शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

सेंद्रीय शेतीशिवाय जीवन धोकादायक: रामदेवबाबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 23:11 IST

शिरटे : येत्या पन्नास वर्षात सेंद्रीय शेतीला महत्त्व दिले नाही, तर मानवी जीवन उद्ध्वस्त होण्यास वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन योगगुरू रामदेवबाबा यांनी केले. कृष्णा कारखान्याची केमिकलविरहित साखर उच्च दर्जाची असून ती मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्याचे संकेतही त्यांनी दिले.रेठरेबुद्रुक (ता. कºहाड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यावर ‘किसान समृध्दी ...

शिरटे : येत्या पन्नास वर्षात सेंद्रीय शेतीला महत्त्व दिले नाही, तर मानवी जीवन उद्ध्वस्त होण्यास वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन योगगुरू रामदेवबाबा यांनी केले. कृष्णा कारखान्याची केमिकलविरहित साखर उच्च दर्जाची असून ती मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्याचे संकेतही त्यांनी दिले.रेठरेबुद्रुक (ता. कºहाड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यावर ‘किसान समृध्दी मेळावा व विषमुक्त शेती’ या विषयावरील व्याख्यानात रामदेवबाबा बोलत होते. यानंतर योग साधना महोत्सवही घेण्यात आला. यावेळी कृष्णा कारखान्यात उत्पादित झालेल्या १४ लाख ५१ हजार १ व्या साखर पोत्याचे पूजन व प्रगतशील शेतकऱ्यांचा गौरव रामदेवबाबा यांच्याहस्ते करण्यात आला. कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले अध्यक्षस्थानी होते.व्यासपीठावर श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, पतंजली योगपीठाचे केंद्रीय प्रभारी डॉ. जयदीप आर्य, विनायक भोसले, कारखान्याचे उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, संचालक दयानंद पाटील, जितेंद्र पाटील, धोंडिराम जाधव, संजय पाटील, सुजित मोरे, गिरीश पाटील, ब्रिजराज मोहिते, अमोल गुरव, पांडुरंग होनमाने, दिलीप पाटील, माणिकराव पाटील, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.रामदेवबाबा म्हणाले, आपल्या देशात ६० कोटीपेक्षा अधिक लोक शेतकरी व शेतीवर अवलंबून असणारे आहेत. पण त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट बनत चालली आहे. याला प्रामुख्याने रासायनिक शेती पद्धती जबाबदार आहे. यापुढील काळात शेतीला सुपीक ठेवण्यासाठी सेंद्रीय शेतीकडे वळणे आवश्यक आहे. या भागात जो शेतकरी सेंद्रीय पद्धतीने साखर अथवा गूळ निर्मिती करेल, त्या शेतकºयांकडून संबंधित उत्पादने आम्ही खरेदी करू. यापुढील काळात आरोग्यदायी जीवनशैलीसाठी सेंद्रीय शेतीशिवाय पर्याय नाही.आजकाल शेतकºयाच्या खिशात जरा पैसे आले की तो तीर्थक्षेत्र, पर्यटनाला प्राधान्य देतो. यापेक्षा सेंद्रीय शेतीचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करावेत. नवे तंत्रज्ञान आत्मसात करून जैविक शेती पद्धतीचा अवलंब करावा. पशुधन सांभाळायला हवे. कमी वयात व जन्मजात अनेक आजार जडत आहेत. यासाठी आहारविहार चांगला हवा. आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.यावेळी बापू पाडळकर, सुधाताई अळ्ळीमोरे, नितीन तावडे, श्रीराम लाखे, बाळासाहेब लाड, मनोज पाटील, प्रदीप थोरात, जालिंदर पाटील, संग्राम पाटील, आनंदराव मोहिते आदी मान्यवरांसह कºहाड व वाळवा तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.