शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

सेंद्रीय शेतीशिवाय जीवन धोकादायक: रामदेवबाबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 23:11 IST

शिरटे : येत्या पन्नास वर्षात सेंद्रीय शेतीला महत्त्व दिले नाही, तर मानवी जीवन उद्ध्वस्त होण्यास वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन योगगुरू रामदेवबाबा यांनी केले. कृष्णा कारखान्याची केमिकलविरहित साखर उच्च दर्जाची असून ती मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्याचे संकेतही त्यांनी दिले.रेठरेबुद्रुक (ता. कºहाड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यावर ‘किसान समृध्दी ...

शिरटे : येत्या पन्नास वर्षात सेंद्रीय शेतीला महत्त्व दिले नाही, तर मानवी जीवन उद्ध्वस्त होण्यास वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन योगगुरू रामदेवबाबा यांनी केले. कृष्णा कारखान्याची केमिकलविरहित साखर उच्च दर्जाची असून ती मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्याचे संकेतही त्यांनी दिले.रेठरेबुद्रुक (ता. कºहाड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यावर ‘किसान समृध्दी मेळावा व विषमुक्त शेती’ या विषयावरील व्याख्यानात रामदेवबाबा बोलत होते. यानंतर योग साधना महोत्सवही घेण्यात आला. यावेळी कृष्णा कारखान्यात उत्पादित झालेल्या १४ लाख ५१ हजार १ व्या साखर पोत्याचे पूजन व प्रगतशील शेतकऱ्यांचा गौरव रामदेवबाबा यांच्याहस्ते करण्यात आला. कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले अध्यक्षस्थानी होते.व्यासपीठावर श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, पतंजली योगपीठाचे केंद्रीय प्रभारी डॉ. जयदीप आर्य, विनायक भोसले, कारखान्याचे उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, संचालक दयानंद पाटील, जितेंद्र पाटील, धोंडिराम जाधव, संजय पाटील, सुजित मोरे, गिरीश पाटील, ब्रिजराज मोहिते, अमोल गुरव, पांडुरंग होनमाने, दिलीप पाटील, माणिकराव पाटील, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.रामदेवबाबा म्हणाले, आपल्या देशात ६० कोटीपेक्षा अधिक लोक शेतकरी व शेतीवर अवलंबून असणारे आहेत. पण त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट बनत चालली आहे. याला प्रामुख्याने रासायनिक शेती पद्धती जबाबदार आहे. यापुढील काळात शेतीला सुपीक ठेवण्यासाठी सेंद्रीय शेतीकडे वळणे आवश्यक आहे. या भागात जो शेतकरी सेंद्रीय पद्धतीने साखर अथवा गूळ निर्मिती करेल, त्या शेतकºयांकडून संबंधित उत्पादने आम्ही खरेदी करू. यापुढील काळात आरोग्यदायी जीवनशैलीसाठी सेंद्रीय शेतीशिवाय पर्याय नाही.आजकाल शेतकºयाच्या खिशात जरा पैसे आले की तो तीर्थक्षेत्र, पर्यटनाला प्राधान्य देतो. यापेक्षा सेंद्रीय शेतीचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करावेत. नवे तंत्रज्ञान आत्मसात करून जैविक शेती पद्धतीचा अवलंब करावा. पशुधन सांभाळायला हवे. कमी वयात व जन्मजात अनेक आजार जडत आहेत. यासाठी आहारविहार चांगला हवा. आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.यावेळी बापू पाडळकर, सुधाताई अळ्ळीमोरे, नितीन तावडे, श्रीराम लाखे, बाळासाहेब लाड, मनोज पाटील, प्रदीप थोरात, जालिंदर पाटील, संग्राम पाटील, आनंदराव मोहिते आदी मान्यवरांसह कºहाड व वाळवा तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.