शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या मानगुटीवर बसून असंघटित कामगारांचे प्रश्न सोडवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:19 IST

इस्लामपूर : कोरोनाकाळात शेतकरी व कामगारांचे हाल झाले. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री घरी बंदिस्त होऊन बसले. त्यांच्या मंत्र्यांमध्ये ताळमेळ नाही. ...

इस्लामपूर : कोरोनाकाळात शेतकरी व कामगारांचे हाल झाले. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री घरी बंदिस्त होऊन बसले. त्यांच्या मंत्र्यांमध्ये ताळमेळ नाही. आमच्या सरकारने कामगारांसाठी लागू केलेली योजनाही बंद करून टाकली असून या सरकारच्या मानगुटीवर बसून असंघटित कामगारांचे प्रश्न सोडविणार असल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी केले.

येथे बहुजन कामगार संघ व रयत क्रांती संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित असंघटित कामगारांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आ. सदाभाऊ खोत, आ. गोपिचंद पडळकर, माजी आ. भगवानराव साळुंखे, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल महाडिक, पृथ्वीराज पवार, जयराज पाटील, सागर खोत, संस्थापक संदीप पाटोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

आ. पाटील म्हणाले, मोदी सरकारने शेतकरी व कामगार वर्गासाठी अनेक योजना लागू केल्या. तीन कोटी लोकांना पक्की घरे दिली. केंद्र सरकारने कोरोनाच्या काळात अनेकांना कोट्यवधींची पॅकेज दिली. मात्र या राज्य सरकारने कोणतेही ठोस पॅकेज जाहीर केले नाही.

आ. सदाभाऊ खोत म्हणाले, दिल्लीतील हिंसाचारात सामील असणारे शेतकरी नाहीत. ते दर देशद्रोही आहेत, कोरोनाच्या काळात राज्य सरकरने असंघटित कामगारांसाठी कोणतीही मदत केली नाही, जी मदत झाली ती फक्त केंद्र सरकारने दिली आहे, राज्य सरकारने कामगारांचे प्रश्न सोडवावेत.

आ. पडळकर म्हणाले, असंघटित कामगारांच्या लढ्यासाठी मी व आ. सदाभाऊ खोत एक पाऊल पुढे असू. सरकारकडे कोट्यवधी रुपये पडून आहेत.

पाटोळे म्हणाले, कामगारांसाठी आणलेल्या योजनामंध्ये सत्ताधारी राज्यकर्त्यांनी खोडा घालण्याचे काम केले. मात्र आ. खोत यांच्या मार्गदर्शनाखाली हा खोडा मी बाजूला केला.

यावेळी अमित कदम, विक्रम पाटील, स्वरूप पाटील, लालासाहेब पाटील, मोहसीन पटवेकर, सुधीर कांबळे, नंदकुमार पाटील, विनायक जाधव, बजरंग भोसले, अरूण गावडे, प्रदीप साठे उपस्थित होते.

बहुजन कामगार संघाचे प्रदेशाध्यक्ष सलिम सय्यद यांनी स्वागत केले. प्रदीप साठे यांनी आभार मानले.

चौकट...

अण्णा भाऊंना भारतरत्न देण्याची मागणी

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी श्रमिकांची चळवळ उभा केली. शाहिरीतून त्यांनी शोषितांच्या मागण्या मांडल्या. कष्टकरी व श्रमिकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या अण्णा भाऊंना भारतरत्न देण्याची मागणी आ. सदाभाऊ खोत यांनी केली.

फोटो ओळी :

इस्लामपूर येथे असंघटित कामगारांच्या मेळाव्यात आ. चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आ. सदाभाऊ खोत, आ. गोपिचंद पडळकर, राहुल महाडिक, माजी आ. भगवानराव साळुंखे, सागर खोत, संदीप पाटोळे उपस्थित होते.