शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान चाचणी करायला गेला...! आपल्याच मिसाईलपासून थोडक्यात वाचला, अणु केंद्राजवळ कोसळली
2
"आम्ही शत्रू नाही..." CM देवेंद्र फडणवीस यांनी मानले उद्धव ठाकरे-शरद पवारांचे आभार, पण का?
3
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
4
छोट्या दुकानदारांनी UPI QR कोड काढले, बंगळुरूतील प्रकारानंतर व्यापारी भयभीत, नेमकं काय घडले?
5
घागर भरुनी, दही दूध लोणी विकून...! ही कंपनी २०३५ कोटी रुपयांचा IPO आणणार, सेबीच्या हातात कागदपत्र सोपविले...
6
२००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर किती GST आकारणार? सरकारने संसदेत दिले उत्तर
7
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
8
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex मध्ये २०० अंकांपेक्षा अधिक उसळी, कोणते शेअर्स चमकले?
9
गुरुपुष्यामृतयोग म्हणजे काय? अशुभतेपासून रक्षण, पुण्य फलदायी लक्ष्मी पूजन; सुख-सुबत्ता वृद्धी
10
सीक्रेट मैत्री! 'या' इस्लामिक राष्ट्रानं भारताशी साधली जवळीक; पाकिस्तानसह तुर्कीलाही मोठा धक्का
11
टॅरिफची धमकी देत ट्रम्प यांनी साधली इतिहासातील सर्वात मोठी डील; जगातील मोठी अर्थव्यवस्था झुकली...
12
...तरीही भारत बांगलादेशच्या मदतीला धावला! विमान अपघातातील जखमींवर उपचारासाठी डॉक्टरांचे पथक पाठविणार...
13
ज्या मराठी तरुणीला मारहाण झाली, तिची परिस्थिती गंभीर; डॉक्टर म्हणाले, पॅरालिसीस...'
14
बाजाराचा मोह सोडा! ३ कोटी ९ लाखांचा मालक तर PPF चं बनवेल; फक्त पती-पत्नीला हा फॅार्म्युला वापरावा लागेल
15
दुबईत नोकरी, १० लाखाची ऑफर...; मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी १९ वर्षांनी मोहम्मद शेखची सुटका
16
पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश नाहीच; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
17
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: १० राशींवर अपार धनलक्ष्मी कृपा, पगारवाढ लाभ, स्वामी शुभच करतील!
18
स्वत:च्या कार घेऊन आता ट्रेनने जाता येणार गोव्याला! कसं? जाणून घ्या...
19
Deep Amavasya 2025: दीप पूजन शास्त्रोक्त विधीने कसे करावे आणि दिव्यांची कोणती आरती म्हणावी जाणून घ्या
20
"आपण भारतात राहतो, बंदूक घेऊन ठेवावी लागेल", प्रेग्नंसीवेळी घाबरलेली रिचा चड्डा; कारण काय?

सरकारच्या मानगुटीवर बसून असंघटित कामगारांचे प्रश्न सोडवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:19 IST

इस्लामपूर : कोरोनाकाळात शेतकरी व कामगारांचे हाल झाले. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री घरी बंदिस्त होऊन बसले. त्यांच्या मंत्र्यांमध्ये ताळमेळ नाही. ...

इस्लामपूर : कोरोनाकाळात शेतकरी व कामगारांचे हाल झाले. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री घरी बंदिस्त होऊन बसले. त्यांच्या मंत्र्यांमध्ये ताळमेळ नाही. आमच्या सरकारने कामगारांसाठी लागू केलेली योजनाही बंद करून टाकली असून या सरकारच्या मानगुटीवर बसून असंघटित कामगारांचे प्रश्न सोडविणार असल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी केले.

येथे बहुजन कामगार संघ व रयत क्रांती संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित असंघटित कामगारांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आ. सदाभाऊ खोत, आ. गोपिचंद पडळकर, माजी आ. भगवानराव साळुंखे, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल महाडिक, पृथ्वीराज पवार, जयराज पाटील, सागर खोत, संस्थापक संदीप पाटोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

आ. पाटील म्हणाले, मोदी सरकारने शेतकरी व कामगार वर्गासाठी अनेक योजना लागू केल्या. तीन कोटी लोकांना पक्की घरे दिली. केंद्र सरकारने कोरोनाच्या काळात अनेकांना कोट्यवधींची पॅकेज दिली. मात्र या राज्य सरकारने कोणतेही ठोस पॅकेज जाहीर केले नाही.

आ. सदाभाऊ खोत म्हणाले, दिल्लीतील हिंसाचारात सामील असणारे शेतकरी नाहीत. ते दर देशद्रोही आहेत, कोरोनाच्या काळात राज्य सरकरने असंघटित कामगारांसाठी कोणतीही मदत केली नाही, जी मदत झाली ती फक्त केंद्र सरकारने दिली आहे, राज्य सरकारने कामगारांचे प्रश्न सोडवावेत.

आ. पडळकर म्हणाले, असंघटित कामगारांच्या लढ्यासाठी मी व आ. सदाभाऊ खोत एक पाऊल पुढे असू. सरकारकडे कोट्यवधी रुपये पडून आहेत.

पाटोळे म्हणाले, कामगारांसाठी आणलेल्या योजनामंध्ये सत्ताधारी राज्यकर्त्यांनी खोडा घालण्याचे काम केले. मात्र आ. खोत यांच्या मार्गदर्शनाखाली हा खोडा मी बाजूला केला.

यावेळी अमित कदम, विक्रम पाटील, स्वरूप पाटील, लालासाहेब पाटील, मोहसीन पटवेकर, सुधीर कांबळे, नंदकुमार पाटील, विनायक जाधव, बजरंग भोसले, अरूण गावडे, प्रदीप साठे उपस्थित होते.

बहुजन कामगार संघाचे प्रदेशाध्यक्ष सलिम सय्यद यांनी स्वागत केले. प्रदीप साठे यांनी आभार मानले.

चौकट...

अण्णा भाऊंना भारतरत्न देण्याची मागणी

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी श्रमिकांची चळवळ उभा केली. शाहिरीतून त्यांनी शोषितांच्या मागण्या मांडल्या. कष्टकरी व श्रमिकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या अण्णा भाऊंना भारतरत्न देण्याची मागणी आ. सदाभाऊ खोत यांनी केली.

फोटो ओळी :

इस्लामपूर येथे असंघटित कामगारांच्या मेळाव्यात आ. चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आ. सदाभाऊ खोत, आ. गोपिचंद पडळकर, राहुल महाडिक, माजी आ. भगवानराव साळुंखे, सागर खोत, संदीप पाटोळे उपस्थित होते.