शहरं
Join us  
Trending Stories
1
BIhar Election 2025: लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
2
"INS विक्रांतच्या नावानेच पाकिस्तानची झोप उडवली होती.."; पंतप्रधान मोदींकडून गौरवोद्गार
3
ऐन दिवाळीत सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; एका झटक्यात चांदी ९ हजारांनी स्वस्त, सोन्याची नवी किंमत काय?
4
"त्या दोघांचा मृत्यू ट्रेनमधून पडून नाही, तर…"; नाशिकमधील अपघाताचं धक्कादायक कारण समोर, जखमीने दिली माहिती
5
शेकडो वर्षे जुने जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर; जाणून घ्या इतिहास आणि मनोरंजक तथ्ये...
6
"मी स्वत:ला भाग्यवान समजतो...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये घरवापसी केल्यानंतर ओंकार भोजनेची पहिली प्रतिक्रिया
7
अजबच! प्रत्येकजण कॉफीमध्ये मीठ का घालतंय? व्हायरल ट्रेंडमागे लपलंय इन्ट्रेस्टिंग सायन्स
8
या भारतीय क्रिकेटरनं घेतली निवृत्ती; रैना-कोहलीच्या कॅप्टन्सीत पदार्पणात रचला होता इतिहास
9
KL Rahul नं खरेदी केलं चालतं-फिरतं हॉटेल! 'ही' लग्जरी इलेक्ट्रिक कार देती ढासू रेंज, जाणून घ्या फीचर अन् किंमत
10
Diwali Sale: आयफोन १७ ला टक्कर देणाऱ्या गुगल पिक्सेल १० च्या खरेदीवर आतापर्यंतची तगडी सूट!
11
‘रो-को’चा फ्लॉप शो! गावसकर म्हणाले, "पुढे दोघांनी ही गोष्ट केली तर आश्चर्यचकित होऊ नका!"
12
युट्यूब शॉर्ट्स की इन्स्टाग्राम रील्स, कुठे होते सर्वाधिक कमाई? जाणून घ्या नेमकं गणित...
13
‘...म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची त्यांच्या सासऱ्यांनी हत्या केली’, बच्चू कडूंचं धक्कादायक विधान  
14
वार्षिक भविष्य २०२५-२६: महालक्ष्मी कृपेने पुढील वर्षभर कोणत्या राशींना धन, यश आणि भाग्याची साथ?
15
'वॉर २'च्या अपयशानंतर अयान मुखर्जीने 'धूम ४'च्या दिग्दर्शनातून घेतली माघार, 'ब्रह्मास्त्र २'ची तयारी सुरु
16
ऐन दिवाळीत माधुरी दीक्षितला करावं लागलेलं टक्कल, खुद्द 'धकधक गर्ल'ने केला खुलासा
17
"मी मोदींचा भक्त, भाजप म्हणजे घर"; महेश कोठारे म्हणाले, "मुंबईवर कमळ फुलणार, महापौरही इथूनच"
18
पाकिस्तानचे सूर बदलले? शाहबाज यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या; जगभरातील हिंदू असा उल्लेख केला, पण...
19
८०० वर्षांनी वैभव लक्ष्मी-महालक्ष्मी योगात लक्ष्मी पूजन: महत्त्व, महात्म्य, लक्ष्मी आरती
20
दहशत माजवणारा साद रिझवी कुठे गायब झाला? पीएम शहबाज शरीफ यांच्याही आणलेले नाकी नऊ!

पंढरीला जाऊ विजेच्या गाडीने... पण चाचणी झाल्यावरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:22 IST

सांगली : पश्चिम महाराष्ट्राला मराठवाड्याशी जोडणाऱ्या मिरज ते लातूर लोहमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम अंतिम चाचणीच्या प्रतीक्षेत आहे. सद्यस्थितीत मिरज ते ...

सांगली : पश्चिम महाराष्ट्राला मराठवाड्याशी जोडणाऱ्या मिरज ते लातूर लोहमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम अंतिम चाचणीच्या प्रतीक्षेत आहे. सद्यस्थितीत मिरज ते कुर्डूवाडीपर्यंतचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून, तेथून लातूरपर्यंतचे अंतिम टप्प्यात आहे.

२०११ मध्ये मिरज-पंढरपूर लोहमार्ग ब्रॉडगेज झाल्यानंतर तुलनेने लवकरच म्हणजे पाच-सहा वर्षांतच विद्युतीकरण सुरू झाले. सध्या ढालगाव-सांगोला, सांगोला-पंढरपूर व पंढरपूर ते कुर्डूवाडी या तीन टप्प्यांतील कामे पूर्ण झाली आहेत. त्यांची अंतिम चाचणी मात्र झालेली नाही. केंद्रीय सुरक्षा आयुक्तांकडून ती होणे अपेक्षित आहे. चाचणीअभावी या मार्गावर प्रवासी गाड्या विजेवर पूर्ण क्षमतेने पळविणे शक्य नाही. सध्या काहीवेळा विद्युत इंजिने या मार्गावर नैमित्तिक कामासाठी सोडली जातात. मालगाड्या मात्र डिझेलवरच धावत आहेत. कोरोना व लॉकडाऊनमुळे गेल्या मार्चपासून प्रवासी गाड्या पूर्णत: बंद आहेत. पंधरवड्यापूर्वी कोल्हापूर-धनबाद ही एकमेव गाडी धावली, तीदेखील डिझेलवर सोडण्यात आली होती.

चौकट

दोन वीज उपकेंद्रे

मिरज ते पंढरपूरदरम्यान ढालगाव आणि पंढरपूर येथे वीज उपकेंद्रे आहेत. तेथून गाडीसाठी वीज पुरवली जाईल. कुर्डूवाडी ते लातूरदरम्यान काही ठिकाणी मास्ट पोल व फिटिंग अद्याप अपूर्ण आहे. कुर्डूवाडी यार्ड व उपकेंद्राचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे.

चौकट

गती व गाड्या वाढतील

मिरज ते लातूरदरम्यान विजेवरील गाड्या सोडण्यास परवानगी मिळाल्यानंतर गाड्यांची गती व संख्या वाढण्याची अपेक्षा आहे. सध्या ९० ते १०० किलोमीटर प्रतितास या गतीने प्रवासी गाड्या धावतात. ही गती १२० किलोमीटर प्रतितासपर्यंत वाढू शकते. त्याशिवाय शटल, एक्सप्रेस, इंटरसिटी व पॅसेंजर गाड्या वाढू शकतात.

चौकट

असा आहे पसारा

मिरज ते ढालगावपर्यंतचे ६३ किलोमीटरचे विद्युतीकरण ६ जानेवारी २०२० रोजी पूर्ण झाले. ढालगाव ते सांगोला (४४.९ किलोमीटर), सांगोला ते पंढरपूर (२९.४ किलोमीटर) व पंढरपूर ते कुर्डूवाडी (५३ किलोमीटर) हे कामदेखील नुकतेच पूर्ण झाले आहे. सुरक्षा आयुक्तांकडून त्यांची चाचणी होणे बाकी आहे. कुर्डूवाडी ते बार्शी (३७ किलोमीटर) व बार्शी ते लातूर (१४९ किलोमीटर) या मार्गाची कामे अद्याप सुरू आहेत.