शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

आंदोलनांमधून राज्यकर्त्यांची झोप उडवून देऊ..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 23:51 IST

सांगली : देशातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्माचा सार्थ अभिमान आहे. आपल्या देशात अनेक धर्म आहेत. त्यांना लोकशाही मार्गाने मान्यता मिळाली आहे. परंतु प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेल्या लिंगायत धर्माला मान्यता नाही. ती प्रदान न केल्यास राज्यकर्त्यांची झोप उडवू, प्रसंगी दिल्लीपर्यंत धडक मारली जाईल, असा इशारा लिंगायत समाजातील मुलींनी दिला.विश्रामबाग चौकात मोर्चेकरी ...

सांगली : देशातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्माचा सार्थ अभिमान आहे. आपल्या देशात अनेक धर्म आहेत. त्यांना लोकशाही मार्गाने मान्यता मिळाली आहे. परंतु प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेल्या लिंगायत धर्माला मान्यता नाही. ती प्रदान न केल्यास राज्यकर्त्यांची झोप उडवू, प्रसंगी दिल्लीपर्यंत धडक मारली जाईल, असा इशारा लिंगायत समाजातील मुलींनी दिला.विश्रामबाग चौकात मोर्चेकरी जमल्यानंतर व्यासपीठावर समाजातील मान्यवरांची व काही मोजक्याच मुलींची भाषणे झाली. मुलींची भाषणे प्रभावी झाल्यानंतर समाजबांधवांनी टाळ्या व शिट्ट्यांनी दाद दिली. आस्था महेश चौगुले (मिरज), समृद्धी सुरेश केरीपाळे (सांगली), सिद्धी संतोष पट्टणशेट्टी (जत), रसिका किरण बोडके (तासगाव), कृतिका गाडीवान (नांदेड) व प्रियांका महाजन (सांगली) या मुलींची भाषणे झाली.आस्था चौगुले म्हणाली, स्वातंत्र्यपूर्व काळात आमच्या धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता होती; पण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ती मान्यता काढून घेण्यात आली. म्हणजे जेव्हा देश पारतंत्र्यात होता, तेव्हा लिंगायत धर्म स्वतंत्र होता आणि देशाच्या स्वातंत्र्यानंतर तो पारतंत्र्यात गेला. लोकशाही पद्धतीने आम्ही आमच्या मागण्या व हक्क मांडत आहे. शासनाने याकडे दुर्लक्ष करू नये. आम्हाला स्वतंत्र लिंगायत धर्माची मान्यता द्यावी.समृद्धी केरीपाळे म्हणाली, महात्मा बसवेश्वरांच्या शिकवणीत वाढलेले आम्ही लिंगायत जोपर्यंत शांत आहे, तोपर्यंत शांत आहे, पण असा अथांग महासागररूपी लिंगायत समाज जर खवळला, तर काय होईल. आमचा धर्म आम्हाला मिळाल्याशिवाय हा वाद शमणार नाही. आम्हाला खुर्ची नको, राजकारण नको, खासदारकी नको...आम्हाला हवा आहे फक्त आमचा हक्क आणि स्वतंत्र लिंगायत धर्माची शासनमान्यता.रसिका बोडके म्हणाली, लिंगायत धर्माला कोठेही सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात मान-सन्मान नाही. समाज पिचला आहे. आजपर्यंत हा समाज उपेक्षितच राहिला आहे. आम्ही फक्त आमची ओळख व आमचा हक्क मागत आहोत. शासनदरबारी आमच्या धर्माची स्वतंत्र धर्म म्हणून नोंद करावीनांदेडच्या कृतिकाचे तडाखेबाज भाषणनांदेडच्या कृतिका गाडीवान हिचे तडाखेबाज भाषण झाले. लिंगायत धर्ममान्यतेच्या मागणीकडे दुर्लक्ष केले, तर लिंगायत समाज स्वस्थ बसणार नाही. प्रसंगी राज्यकर्त्यांची झोप उडवून देईल, असे कृतिकाने म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला. आमच्या न्याय्य हक्कांसाठी हा लढा उभा केला आहे. लवकरच मुंबईतही मोर्चा काढणार आहोत. त्यानंतर आम्ही दिल्लीत धडक मारण्यास मागे-पुढे पाहणार नाही, असा इशाराही कृतिकाने दिला. राष्टÑसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी तिचा सत्कार केला.भीक नव्हे, हक्क द्या : सिद्धी पट्टणशेट्टीसिद्धी पट्टणशेट्टी म्हणाली, लिंगायत धर्म नेहमी देशाच्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये प्रगती करीत आहे. आज जगामध्ये आमच्या लिंगायत धर्मानंतर स्थापन झालेल्या धर्माची ओळख आहे. पण नऊशे वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या आमच्या धर्माची ओळख नाहीशी होत आहे. स्वतंत्र धर्ममान्यतेसाठी भीक मागत नसून, आम्ही आमचा हक्क मागत आहोत. प्रियांका महाजन, निशांत मगदूम यांचीही भाषणे झाली.