शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
7
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
8
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
9
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
10
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
11
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
12
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
13
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
14
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
15
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
16
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
17
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
18
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
19
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
20
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...

'महापूर रोखण्यासाठी अलमट्टी, हिप्परगीसह अभियंत्यांची सांगलीत बैठक घेऊ'

By अशोक डोंबाळे | Updated: June 22, 2024 18:28 IST

सांगलीच्या अधीक्षक अभियंत्यांची ग्वाही : महापूर नियंत्रण समितीबरोबर चर्चा

सांगली : अलमट्टी धरण, हिप्परगी बंधारा (बॅरेज) येथील अधीक्षक अभियंते, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील अधीक्षक अभियंते यांची सांगलीत महापूर रोखण्यासाठी समन्वयाची बैठक लवकरच घेतली जाईल, अशी ग्वाही सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी महापूर नियंत्रण समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिली.कृष्णा नदी महापूर नियंत्रण कृती समितीच्या शिष्टमंडळाने अधीक्षक अभियंता पाटोळे यांची भेट घेतली. यावेळी समितीचे अध्यक्ष सर्जेराव पाटील, निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण, प्रभाकर केंगार, माने, सुयोग हावळ उपस्थित होते.महापूर नियंत्रण समितीतर्फे नुकताच अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधारा येथे अभ्यास दौरा केला आहे. त्याबद्दल माहिती देण्यात आली. कोयना धरणापासून ते अलमट्टी धरणापर्यंत एकात्मिक धरण परिचलनासाठी दोन्ही राज्यांतील अधीक्षक अभियंत्यांची सांगलीत बैठक होणे आवश्यक असल्याचे यावेळी समितीतर्फे सांगण्यात आले. त्यावर चंद्रशेखर पाटोळे यांनी अलमट्टी धरण, हिप्परगी बंधारा यांच्या अधीक्षक अभियंत्यांसह सांगलीत लवकरच समन्वय बैठक घेऊ ,असे सांगितले. यावेळी कोल्हापूर येथील अधीक्षक अभियंत्यांनाही उपस्थित राहण्याची विनंती करू, असेही ते म्हणाले.

केंद्रीय जल आयोगाच्या नियमांकडे दुर्लक्षकोयना धरणापासून ते अलमट्टी धरणापर्यंतच्या सर्व धरणातील दैनिक पाणी पातळी, आवक-जावक, विसर्ग यांच्या माहितीची दोन्ही राज्यांमध्ये देवाणघेवाण व्हावी. कर्नाटकातील अलमट्टी आणि हिप्परगी बंधाऱ्याबाबत केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन होत नाही. धरणातील पाणीसाठा वाढवण्याकडे त्यांचा अधिक भर असतो, असे दिसून येत आहे, असाही निष्कर्ष समितीतर्फे अधीक्षक अभियंता पाटोळे यांच्यासमोर मांडला.

पूर सनियंत्रण समितीची स्थापना करा : विजयकुमार दिवाणसांगली-कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांची पूर सनियंत्रण समिती स्थापन करावी. या समितीत संबंधित सर्व विभागातील प्रमुख अधिकारी, जलविज्ञान, सीडब्ल्यूसीचे तज्ज्ञ असावेत. या समितीच्या माध्यमातून धरणांचे एकात्मिक परिचलन व्हावे, अशी मागणी सेवानिवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण यांनी केली.

आयआयटी रुरकी समितीने अहवाल द्यावामहापुरासंदर्भातील अहवाल तातडीने सादर करावा, अशी सूचना सांगली पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आयआयटी रुरकी संस्थेच्या समितीला केली आहे. महिनाभरात अहवाल सादर करण्याचे आश्वासन समितीच्या सदस्यांनी दिले आहे. महापुराच्या कारणांचा तांत्रिक अभ्यास करून उपाययोजना सुचविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयआयटी रुरकी संस्थेला कळविले होते. त्यानुसार या संस्थेने डॉ. ए. के. लोहानी, डॉ. आर. व्ही. काळे, अभियंता जे. के. पात्रा यांची समिती स्थापन केली.

टॅग्स :Sangliसांगलीfloodपूर