शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

'महापूर रोखण्यासाठी अलमट्टी, हिप्परगीसह अभियंत्यांची सांगलीत बैठक घेऊ'

By अशोक डोंबाळे | Updated: June 22, 2024 18:28 IST

सांगलीच्या अधीक्षक अभियंत्यांची ग्वाही : महापूर नियंत्रण समितीबरोबर चर्चा

सांगली : अलमट्टी धरण, हिप्परगी बंधारा (बॅरेज) येथील अधीक्षक अभियंते, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील अधीक्षक अभियंते यांची सांगलीत महापूर रोखण्यासाठी समन्वयाची बैठक लवकरच घेतली जाईल, अशी ग्वाही सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी महापूर नियंत्रण समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिली.कृष्णा नदी महापूर नियंत्रण कृती समितीच्या शिष्टमंडळाने अधीक्षक अभियंता पाटोळे यांची भेट घेतली. यावेळी समितीचे अध्यक्ष सर्जेराव पाटील, निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण, प्रभाकर केंगार, माने, सुयोग हावळ उपस्थित होते.महापूर नियंत्रण समितीतर्फे नुकताच अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधारा येथे अभ्यास दौरा केला आहे. त्याबद्दल माहिती देण्यात आली. कोयना धरणापासून ते अलमट्टी धरणापर्यंत एकात्मिक धरण परिचलनासाठी दोन्ही राज्यांतील अधीक्षक अभियंत्यांची सांगलीत बैठक होणे आवश्यक असल्याचे यावेळी समितीतर्फे सांगण्यात आले. त्यावर चंद्रशेखर पाटोळे यांनी अलमट्टी धरण, हिप्परगी बंधारा यांच्या अधीक्षक अभियंत्यांसह सांगलीत लवकरच समन्वय बैठक घेऊ ,असे सांगितले. यावेळी कोल्हापूर येथील अधीक्षक अभियंत्यांनाही उपस्थित राहण्याची विनंती करू, असेही ते म्हणाले.

केंद्रीय जल आयोगाच्या नियमांकडे दुर्लक्षकोयना धरणापासून ते अलमट्टी धरणापर्यंतच्या सर्व धरणातील दैनिक पाणी पातळी, आवक-जावक, विसर्ग यांच्या माहितीची दोन्ही राज्यांमध्ये देवाणघेवाण व्हावी. कर्नाटकातील अलमट्टी आणि हिप्परगी बंधाऱ्याबाबत केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन होत नाही. धरणातील पाणीसाठा वाढवण्याकडे त्यांचा अधिक भर असतो, असे दिसून येत आहे, असाही निष्कर्ष समितीतर्फे अधीक्षक अभियंता पाटोळे यांच्यासमोर मांडला.

पूर सनियंत्रण समितीची स्थापना करा : विजयकुमार दिवाणसांगली-कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांची पूर सनियंत्रण समिती स्थापन करावी. या समितीत संबंधित सर्व विभागातील प्रमुख अधिकारी, जलविज्ञान, सीडब्ल्यूसीचे तज्ज्ञ असावेत. या समितीच्या माध्यमातून धरणांचे एकात्मिक परिचलन व्हावे, अशी मागणी सेवानिवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण यांनी केली.

आयआयटी रुरकी समितीने अहवाल द्यावामहापुरासंदर्भातील अहवाल तातडीने सादर करावा, अशी सूचना सांगली पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आयआयटी रुरकी संस्थेच्या समितीला केली आहे. महिनाभरात अहवाल सादर करण्याचे आश्वासन समितीच्या सदस्यांनी दिले आहे. महापुराच्या कारणांचा तांत्रिक अभ्यास करून उपाययोजना सुचविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयआयटी रुरकी संस्थेला कळविले होते. त्यानुसार या संस्थेने डॉ. ए. के. लोहानी, डॉ. आर. व्ही. काळे, अभियंता जे. के. पात्रा यांची समिती स्थापन केली.

टॅग्स :Sangliसांगलीfloodपूर