शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

'महापूर रोखण्यासाठी अलमट्टी, हिप्परगीसह अभियंत्यांची सांगलीत बैठक घेऊ'

By अशोक डोंबाळे | Updated: June 22, 2024 18:28 IST

सांगलीच्या अधीक्षक अभियंत्यांची ग्वाही : महापूर नियंत्रण समितीबरोबर चर्चा

सांगली : अलमट्टी धरण, हिप्परगी बंधारा (बॅरेज) येथील अधीक्षक अभियंते, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील अधीक्षक अभियंते यांची सांगलीत महापूर रोखण्यासाठी समन्वयाची बैठक लवकरच घेतली जाईल, अशी ग्वाही सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी महापूर नियंत्रण समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिली.कृष्णा नदी महापूर नियंत्रण कृती समितीच्या शिष्टमंडळाने अधीक्षक अभियंता पाटोळे यांची भेट घेतली. यावेळी समितीचे अध्यक्ष सर्जेराव पाटील, निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण, प्रभाकर केंगार, माने, सुयोग हावळ उपस्थित होते.महापूर नियंत्रण समितीतर्फे नुकताच अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधारा येथे अभ्यास दौरा केला आहे. त्याबद्दल माहिती देण्यात आली. कोयना धरणापासून ते अलमट्टी धरणापर्यंत एकात्मिक धरण परिचलनासाठी दोन्ही राज्यांतील अधीक्षक अभियंत्यांची सांगलीत बैठक होणे आवश्यक असल्याचे यावेळी समितीतर्फे सांगण्यात आले. त्यावर चंद्रशेखर पाटोळे यांनी अलमट्टी धरण, हिप्परगी बंधारा यांच्या अधीक्षक अभियंत्यांसह सांगलीत लवकरच समन्वय बैठक घेऊ ,असे सांगितले. यावेळी कोल्हापूर येथील अधीक्षक अभियंत्यांनाही उपस्थित राहण्याची विनंती करू, असेही ते म्हणाले.

केंद्रीय जल आयोगाच्या नियमांकडे दुर्लक्षकोयना धरणापासून ते अलमट्टी धरणापर्यंतच्या सर्व धरणातील दैनिक पाणी पातळी, आवक-जावक, विसर्ग यांच्या माहितीची दोन्ही राज्यांमध्ये देवाणघेवाण व्हावी. कर्नाटकातील अलमट्टी आणि हिप्परगी बंधाऱ्याबाबत केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन होत नाही. धरणातील पाणीसाठा वाढवण्याकडे त्यांचा अधिक भर असतो, असे दिसून येत आहे, असाही निष्कर्ष समितीतर्फे अधीक्षक अभियंता पाटोळे यांच्यासमोर मांडला.

पूर सनियंत्रण समितीची स्थापना करा : विजयकुमार दिवाणसांगली-कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांची पूर सनियंत्रण समिती स्थापन करावी. या समितीत संबंधित सर्व विभागातील प्रमुख अधिकारी, जलविज्ञान, सीडब्ल्यूसीचे तज्ज्ञ असावेत. या समितीच्या माध्यमातून धरणांचे एकात्मिक परिचलन व्हावे, अशी मागणी सेवानिवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण यांनी केली.

आयआयटी रुरकी समितीने अहवाल द्यावामहापुरासंदर्भातील अहवाल तातडीने सादर करावा, अशी सूचना सांगली पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आयआयटी रुरकी संस्थेच्या समितीला केली आहे. महिनाभरात अहवाल सादर करण्याचे आश्वासन समितीच्या सदस्यांनी दिले आहे. महापुराच्या कारणांचा तांत्रिक अभ्यास करून उपाययोजना सुचविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयआयटी रुरकी संस्थेला कळविले होते. त्यानुसार या संस्थेने डॉ. ए. के. लोहानी, डॉ. आर. व्ही. काळे, अभियंता जे. के. पात्रा यांची समिती स्थापन केली.

टॅग्स :Sangliसांगलीfloodपूर