शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

सदाभाऊंचे कासेगावात विधानसभेचे रणशिंग जयंत पाटील ‘टार्गेट’ : इस्लामपूर, शिराळ्यात भाजपचा आमदार निवडून आणण्याचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 01:23 IST

कासेगाव : कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी आमदार जयंत पाटील यांचे ‘होम पिच’ असलेल्या कासेगाव येथेच त्यांना ‘टार्गेट’ करून आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.

प्रताप बडेकर ।कासेगाव : कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी आमदार जयंत पाटील यांचे ‘होम पिच’ असलेल्या कासेगाव येथेच त्यांना ‘टार्गेट’ करून आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. यावेळी झालेल्या भाषणामध्ये त्यांनी आवर्जून इस्लामपूर आणि शिराळ्यामध्ये भाजपचाच आमदार असेल, असे जाहीर करून आ. पाटील यांना आव्हान दिले आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी वर्षाहून अधिक कालावधी असला तरी, वाळवा आणि शिराळा तालुक्यात आतापासूनच याचे वारे वाहू लागले आहेत. अनेक इच्छुकांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. इस्लामपूर मतदार संघात तर आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात जोरदार व्यूहरचना सुरू आहे. यामध्ये दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही सहभागी आहेत. काहीही झाले तरी यावेळी आमदार जयंत पाटील यांचा पराभव करायचा, असाच कानमंत्र त्यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना दिला आहे. त्यामुळेच त्यांनी तालुक्यात विकासकामांचा धुमधडाका सुरू केला आहे. भाजपनेही निधी कमी पडू न देता ठिकठिकाणी रस्त्यांची कामे सुरू केली आहेत.

चार दिवसांपूर्वी कासेगाव येथे विविध विकासकामांच्या उद्घाटन व भूमिपूजनानंतर झालेल्या जाहीर सभेत मंत्री सदाभाऊ खोत यांनी आमदार जयंत पाटील यांच्यावर खरमरीत टीका करत आगामी विधानसभा निवडणुकीचा बिगुलच वाजवला आहे. वाळवा-शिराळा तालुक्यात आमदार जयंत पाटील यांचे वर्चस्व आहे. वाळवा तालुक्यातील ४८ गावे शिराळा मतदार संघात समाविष्ट आहेत. त्यामुळे या गावांची भूमिका नेहमीच महत्त्वाची ठरत आलेली आहे.

शिराळा विधानसभा मतदार संघातून विद्यमान आ. शिवाजीराव नाईक, माजी आमदार मानसिंगराव नाईक, काँग्रेसचे सत्यजित देशमुख यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आमदार शिवाजीराव नाईक आणि सदाभाऊ खोत यांनी शिराळा मतदार संघातील मोठ्या मोठ्या गावात विकासकामांच्या उद्घाटनांचा धडाका लावला असून, आगामी निवडणूक आपलीच असेल, असा दावा केला आहे. त्यातच माजी जि. प. सदस्य, महाडिक युवा शक्तीचे संस्थापक सम्राट महाडिक यांनीही निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे.

यासाठीच त्यांनी शिराळा येथे भव्य प्रमाणात नोकरी मेळावा घेतला होता. याच कार्यक्रमात आमदार नीतेश राणे यांनी स्वाभिमान पक्षाची उमेदवारी सम्राट महाडिक यांना जाहीर करून टाकली. यावेळी काहीही झाले तरी मैदानात उतरणार, असा पवित्रा महाडिक यांनी घेतला आहे. आता सम्राट महाडिक यांच्या उमेदवारीचा फटका नेमका कोणाला बसणार, याबाबतच राजकीय वर्तुळातून मंथन सुरू आहे.

इस्लामपूर मतदार संघात आ. जयंत पाटील यांच्याविरोधात कोण लढणार, यावर अद्याप शिक्कामोर्तब नाही. परंतु नगराध्यक्ष निशिकांत पाटील, सदाभाऊ खोत हेच सध्यातरी दोन चांगले पर्याय भाजपपुढे आहेत. निवडणुकीसाठी अजून कालावधी असल्यामुळे अंतिम क्षणी नेमका कोण उमेदवार असणार, हे सांगता येत नाही.लोकसभा निवडणुकीच्या गणितावर विधानसभेची बेरीज-वजाबाकी ठरणार आहे. एकंदरीत सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटील यांच्या कासेगावातून त्यांना आव्हान देऊन आगामी विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजवल्याची चर्चा आहे. 

२००९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे सत्यजित देशमुख यांनी मानसिंगराव नाईक यांना पाठिंबा देत उमेदवारी माघार घेतली होती. त्यामुळे शिवाजीराव नाईक यांचा पराभव झाला होता. यावेळी मानसिंगराव नाईक यांनी सत्यजित देशमुख यांच्यासाठी माघार घेऊन पैरा फेडावा.- जयदीप पाटील, जिल्हाध्यक्ष काँग्रेस कृषी सेल, सांगली.