नेर्ले (ता. वाळवा) येथे ग्रामपंचायत, वनविभाग व प्लॅनेट अर्थ फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित ‘बिबट तथा बिबट्या वन्यजीव सहजीवन’ या प्रबोधनात्मक कार्यक्रमात ते बोलत होते.
सरपंच छाया रोकडे, वनपाल सुरेश चरापले, वाळवा तालुका संजय गांधी योजनेचे अध्यक्ष संजय पाटील, वनरक्षक दीपाली सागावकर, वनरक्षक रायना पाटोळे, वनरक्षक अमोल साठे, प्लॅनेट अर्थचे उपाध्यक्ष प्रणव महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती.
संजय पाटील म्हणाले की, बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत वनविभागाने बिबट्याविषयी घेतलेल्या प्रबोधनाचा कार्यक्रम स्तुत्य आहे.
प्रणव महाजन यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अनिल साळुंखे, विजय पाटील, प्रथमेश शिंदे, अमित पाटील, गणेश निकम, डॉ. दत्ता रोकडे, बाळासाहेब जंगम, कृष्णाजी माने, पोलीसपाटील अतुल बनसोडे, बाळासाहेब रोकडे उपस्थित होते.